शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
6
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
7
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
8
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
9
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
10
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
11
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
12
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
13
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
14
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
15
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
16
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
17
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

नगरसेवकांना दिली जाते खोटी माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2016 02:46 IST

महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी एप्रिलच्या मुख्यसभेच्या कार्यक्रम पत्रिकेत लेखी प्रश्नोत्तरामध्ये नगरसेवकांना खोटी माहिती दिल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे.

दीपक जाधव,  पुणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी एप्रिलच्या मुख्यसभेच्या कार्यक्रम पत्रिकेत लेखी प्रश्नोत्तरामध्ये नगरसेवकांना खोटी माहिती दिल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. या चुकीच्या उत्तरांमुळे नगरसेवकांची दिशाभूल होऊन क्षेत्रसभा रखडली जाण्याची भीती आहे. क्षेत्रसभेबाबत तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या असताना तसे काही झाले नसल्याचे उत्तर देण्यात आले.राज्य शासनाच्या उदासीनतेमुळे क्षेत्रसभा रखडल्या असल्याचे ‘लोकमत’ने उजेडात आणले. नागरिकांना त्यांचे प्रश्न मांडता याव्यात याकरिता ‘लोकमत’कडून क्षेत्रसभेचा सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर एप्रिल मुख्यसभेच्या कार्यक्रमपत्रिकेत नगरसेविका विजया वाडकर यांनी क्षेत्रसभेबाबत प्रश्न विचारले होते. क्षेत्रसभा घेण्यात काही तांत्रिक अडचणी आहेत का, त्यासाठी अभिप्रायासाठी प्रस्ताव पाठविला आहे, प्रभागातील दोन नगरसेवकांपैकी क्षेत्रसभेचा अध्यक्ष कोण असणार, अशी माहिती त्यांनी विचारली होती. मात्र, या सर्व प्रश्नांना परिमंडळच्या एकच्या उपायुक्तांनी सरळ नाही म्हणून लेखी उत्तर दिले. महापालिका अधिनियमाच्या सुधारित कायद्यानुसार नगरसेवकांनी दोन वर्षांतून किमान ४ क्षेत्रसभा घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र, क्षेत्रसभा घेण्याबाबत उद्भवलेल्या तांत्रिक अडचणींवर महापालिकेच्या निवडणूक विभागाने राज्य शासनाकडे अभिप्राय मागितला आहे. मात्र, ७ महिने उलटले, तरी शासनाने त्याला प्रतिसाद दिलेला नाही. स्मरणपत्र पाठवूनही त्याची दखल अद्याप घेण्यात आलेली नाही. विभागीय कार्यालयांना या कार्यवाहीची माहिती नसल्याचे त्यांनी नगरसेवकांना दिलेल्या चुकीच्या उत्तरातून समोर आले आहे. पालिकेच्या नियमावलीत प्रश्नोत्तरांना खूप महत्त्व आहे. अधिकाऱ्यांनी दिलेले उत्तर हे आयुक्तांच्या वतीने दिलेले असते. त्यासाठी एका समन्वय अधिकाऱ्याचीही नियुक्ती करण्यात आली आहे. तरीही नगरसेवकांना चुकीचे उत्तर देण्याचा प्रकार घडला आहे. नागरिकांना रस्ते, पाणी, साफ-सफाई, ड्रेनेज, दिवाबत्ती, कचऱ्याची विल्हेवाट आदी मूलभूत सोई सुविधांबाबत तक्रारी मांडण्याचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे, याकरिता क्षेत्रसभेची तरतूद करण्यात आली आहे. या कायद्यातील तरतुदीनुसार क्षेत्रसभा घेण्यापूर्वी पहिल्यांदा प्रत्येक प्रभागातील दोन किंवा त्यापेक्षा जास्त मतदारसंघाचे एक क्षेत्र निश्चित करून ते राजपत्रातून प्रसिद्ध करणे आवश्यक आहे. एका प्रभागातून दोन नगरसेवक निवडून आले आहेत, त्यामुळे त्या क्षेत्रसभेचा अध्यक्ष कोणता नगरसेवक असेल, हेही ठरवून द्यावे लागणार आहे. मात्र, त्यासाठी कोणती कार्यपद्धती अवलंबवावी, याबाबत कायद्यामध्ये स्पष्ट नाही, त्यामुळे राज्याकडे अभिप्राय मागविला आहे.