शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
4
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
5
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
6
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
7
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
8
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
9
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
10
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
11
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
12
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
13
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
14
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
15
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
16
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
17
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
18
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
19
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज

नगरसेवकांना दिली जाते खोटी माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2016 02:46 IST

महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी एप्रिलच्या मुख्यसभेच्या कार्यक्रम पत्रिकेत लेखी प्रश्नोत्तरामध्ये नगरसेवकांना खोटी माहिती दिल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे.

दीपक जाधव,  पुणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी एप्रिलच्या मुख्यसभेच्या कार्यक्रम पत्रिकेत लेखी प्रश्नोत्तरामध्ये नगरसेवकांना खोटी माहिती दिल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. या चुकीच्या उत्तरांमुळे नगरसेवकांची दिशाभूल होऊन क्षेत्रसभा रखडली जाण्याची भीती आहे. क्षेत्रसभेबाबत तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या असताना तसे काही झाले नसल्याचे उत्तर देण्यात आले.राज्य शासनाच्या उदासीनतेमुळे क्षेत्रसभा रखडल्या असल्याचे ‘लोकमत’ने उजेडात आणले. नागरिकांना त्यांचे प्रश्न मांडता याव्यात याकरिता ‘लोकमत’कडून क्षेत्रसभेचा सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर एप्रिल मुख्यसभेच्या कार्यक्रमपत्रिकेत नगरसेविका विजया वाडकर यांनी क्षेत्रसभेबाबत प्रश्न विचारले होते. क्षेत्रसभा घेण्यात काही तांत्रिक अडचणी आहेत का, त्यासाठी अभिप्रायासाठी प्रस्ताव पाठविला आहे, प्रभागातील दोन नगरसेवकांपैकी क्षेत्रसभेचा अध्यक्ष कोण असणार, अशी माहिती त्यांनी विचारली होती. मात्र, या सर्व प्रश्नांना परिमंडळच्या एकच्या उपायुक्तांनी सरळ नाही म्हणून लेखी उत्तर दिले. महापालिका अधिनियमाच्या सुधारित कायद्यानुसार नगरसेवकांनी दोन वर्षांतून किमान ४ क्षेत्रसभा घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र, क्षेत्रसभा घेण्याबाबत उद्भवलेल्या तांत्रिक अडचणींवर महापालिकेच्या निवडणूक विभागाने राज्य शासनाकडे अभिप्राय मागितला आहे. मात्र, ७ महिने उलटले, तरी शासनाने त्याला प्रतिसाद दिलेला नाही. स्मरणपत्र पाठवूनही त्याची दखल अद्याप घेण्यात आलेली नाही. विभागीय कार्यालयांना या कार्यवाहीची माहिती नसल्याचे त्यांनी नगरसेवकांना दिलेल्या चुकीच्या उत्तरातून समोर आले आहे. पालिकेच्या नियमावलीत प्रश्नोत्तरांना खूप महत्त्व आहे. अधिकाऱ्यांनी दिलेले उत्तर हे आयुक्तांच्या वतीने दिलेले असते. त्यासाठी एका समन्वय अधिकाऱ्याचीही नियुक्ती करण्यात आली आहे. तरीही नगरसेवकांना चुकीचे उत्तर देण्याचा प्रकार घडला आहे. नागरिकांना रस्ते, पाणी, साफ-सफाई, ड्रेनेज, दिवाबत्ती, कचऱ्याची विल्हेवाट आदी मूलभूत सोई सुविधांबाबत तक्रारी मांडण्याचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे, याकरिता क्षेत्रसभेची तरतूद करण्यात आली आहे. या कायद्यातील तरतुदीनुसार क्षेत्रसभा घेण्यापूर्वी पहिल्यांदा प्रत्येक प्रभागातील दोन किंवा त्यापेक्षा जास्त मतदारसंघाचे एक क्षेत्र निश्चित करून ते राजपत्रातून प्रसिद्ध करणे आवश्यक आहे. एका प्रभागातून दोन नगरसेवक निवडून आले आहेत, त्यामुळे त्या क्षेत्रसभेचा अध्यक्ष कोणता नगरसेवक असेल, हेही ठरवून द्यावे लागणार आहे. मात्र, त्यासाठी कोणती कार्यपद्धती अवलंबवावी, याबाबत कायद्यामध्ये स्पष्ट नाही, त्यामुळे राज्याकडे अभिप्राय मागविला आहे.