शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

वृक्षारोपण उद्दिष्ट गाठण्यात अपयश

By admin | Updated: April 22, 2016 00:57 IST

दर वर्षी महापालिका उद्यान विभाग पावसाळ्याच्या तोंडावर वृक्षारोपण करण्याचे उद्दिष्ट ठेवते. मात्र, अनेक अडथळ्यांची शर्यत होऊनही वृक्षारोपणाचे उद्दिष्ट दर वर्षी फोल ठरते.

पिंपरी : दर वर्षी महापालिका उद्यान विभाग पावसाळ्याच्या तोंडावर वृक्षारोपण करण्याचे उद्दिष्ट ठेवते. मात्र, अनेक अडथळ्यांची शर्यत होऊनही वृक्षारोपणाचे उद्दिष्ट दर वर्षी फोल ठरते. जागतिक वसुंधरा दिनानिमित्त वृक्षारोपणाचा घेतलेला आढावा-या वर्षी उद्यान विभागाने अवघे ६० टक्के उद्दिष्ट पूर्ण केले. वृक्षारोपणासाठी दर वर्षी लाखाच्या घरात बजेट मंजूर होते. मात्र, अंमलबजावणी कागदोपत्रीच राहते. वृक्ष प्राधिकरण समितीच्या उद्दिष्टालाही हरताळ फासला जातो. वृक्ष समिती नावालाच आहे की काय, असा प्रश्न वृक्षप्रेमींनी उपस्थित केला आहे. उद्यान विभागाच्या तक्रारीमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. त्यामध्ये वृक्षारोपणाच्या टेंडर प्रक्रियेचा गोंधळ, उद्यान स्थापत्यविषयक अपूर्ण कामे, वृक्षांना अपुरा मातीपुरवठा, अपुरे मनुष्यबळ, वृक्षारोपण व लागवड करण्यात टाळाटाळ अशा कित्येक अडचणी उद्यान विभागासमोर उभ्या आहेत. दर वर्षी पावसाळ्यात वृक्षारोपण करताना वृक्ष खरेदी उद्यान विभागाला करावी लागते. पालिकेकडे रोपवाटिका असूनही नियोजनाच्या अभावामुळे रोपे कमी पडतात. गतवर्षी पाच हजार झाडे उद्यान विभागाने विकत घेतली. तर या वर्षी दहा हजार झाडे विकत घेण्याचा मानस उद्यान विभागाने ठेवला आहे. त्यामुळे झाडे विकत घेऊनही त्याचे पुरेसे संवर्धन होत नसल्याने शहरात वृक्षवल्लीचे प्रमाण कमी झाले आहे. उच्च प्रतीची झाडे लावून त्याचे संवर्धन करण्याची जबाबदारी उद्यान विभागाची आहे. मात्र, ठरावीकच परवडणारी झाडे दर वर्षी लावली जातात. यामध्ये वड, पिंपळ, कडूनिंब, अर्जुन, बेल, रामफळ, फणस, आपटा, कांचन, बहावा, शिसम, पिंपळ, मोहगनी, पिंगारा, अशोक आदी झाडे दर वर्षी लावली जातात. उद्यान विभागाला ज्या भागात वृक्ष लावण्यास अडथळे निर्माण झाले, त्या भागातील वृक्षलागवड अद्यापपर्यंत पूर्ण झाली नाही. स्थापत्यविषयक कामे रेंगाळल्याने वृक्ष लावण्यास अडचणी निर्माण होत आहे,असे कारण उद्यान विभागाने सांगितले आहे. औंध रावेत बीआरटीएस रस्ता, दिघी गायरान, मोशी, बोऱ्हाडेवाडी, शहरातील अंतर्गत रस्ते, चिखली, सीएमईतील काही भाग अशा भागातील वृक्षारोपण अद्यापही रखडलेले आहे. त्यानंतर त्या ठिकाणी वृक्षारोपणच केले गेले नाही. वृक्षारोपणाच्या उद्दिष्टांमध्येही उद्यान विभागाने घट केली आहे. २०१३ या वर्षी एक लाख वृक्षारोपणाचे उद्दिष्ट होते. आता दर वर्षी ५० हजार वृक्ष लावण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. उद्दिष्ट कमी करूनही वृक्षारोपण पूर्ण झाले नाही. २०१४-१५ या कालावधीत वृक्षारोपण हे निम्म्यापेक्षा जास्त झाले. मात्र, २०१५-१६ या वर्षी ५० हजारांमधील ३४ हजार वृक्षारोपण पूर्ण झाले. उर्वरित १६ हजार वृक्षारोपण झालेच नाही. अवघे ६० टक्के उद्दिष्ट पूर्ण झाले. (प्रतिनिधी)> पालिकेला पडला विसरउद्यान विभाग व पर्यावर विभागाला जागतिक वसुंधरा दिनाचा विसर पडला आहे. यापैकी दोन्ही विभागालाही हा दिवस साजरा करण्याचे परिपत्रकच आलेले नाही, असे उत्तर देण्यात आले आहे. त्यामुळे वसुंधरा दिनाचा कोणताही कार्यक्रम पालिकेमार्फत केला गेला नाही, हे स्पष्ट दिसून येते.