शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
2
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
3
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
4
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
5
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
6
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
7
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
8
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
9
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
10
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
11
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
12
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
13
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे एकाच मंचावर येणार,नेमकं कारण काय?
14
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
15
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
16
एकही सामना न खेळता Rohit Sharma ला अचानक 'प्रमोशन'; पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने केली मदत
17
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!
18
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
19
अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने
20
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार

कारखान्यांची साखरविक्री मंदावली

By admin | Updated: April 14, 2017 04:19 IST

केंद्र सरकारने घेतलेल्या पाच लाख टन कच्च्या साखरेच्या आयातीचा परिणाम राज्यातील साखर कारखानदारीवर होताना दिसत आहे. अनेक साखर कारखान्यांची

सोमेश्वरनगर : केंद्र सरकारने घेतलेल्या पाच लाख टन कच्च्या साखरेच्या आयातीचा परिणाम राज्यातील साखर कारखानदारीवर होताना दिसत आहे. अनेक साखर कारखान्यांची साखर विक्री मंदावली आहे. साखर आयातीचा धसका घेत भविष्यात साखरेचे दर पडतात की काय, अशी भीती बाळगून कारखानदार क्विंटलमागे ५० ते १०० रुपयांचा तोटा सहन करत साखरेची विक्री करत आहेत. शासनाच्या या निर्णयामुळे राज्यातील कारखानदारांसह ऊसउत्पादक नाराजी व्यक्त करीत आहेत. नुकत्याच पार पडलेल्या हंगामात साखरधंद्याला ‘अच्छे दिन’ आले होते. आॅक्टोबर ते जानेवारी या चार महिन्यांत साखरेची क्विंटलमागे तब्बल ४०० रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे साखर कारखान्यांनी वाढलेल्या दराच्या पैशांचा उपयोग गेटकेन ऊस मिळविण्यासाठी केला होता. जानेवारी महिन्यात पंजाब आणि उत्तर प्रदेशसह पाच राज्यांत होणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सरकार अधिकच संवेदनशील झाल्यामुळे घाऊक बाजारपेठेत साखेरचे दर ४० रुपयांवर गेल्याने साखर कारखान्यांची शिखर संघटना असलेल्या इस्मावर बडगा उगारला होता. साखरेचे दर रोखा, अन्यथा टोकाची पावले उचलावी लागतील असा इशारा दिला होता. मात्र, साखरेचे दर आवाक्यात येत नसल्याचे निदर्शनास आल्याने केंद्र सरकारने ५ लाख टन साखर निर्यातीचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. केंद्र सरकारने कच्च्या साखरेच्या आयातीला परवानगी दिली आहे. त्यामुळे कच्ची साखर आयात केली जाणार आहे. या निर्णयामुळे साखरेचे दर कमी होण्याची शक्यता आहे.राज्यातील अनेक कारखान्यांनी याची धास्ती घेतली आहे. कच्ची साखर आयात होताच साखरेचे दर पडतील, यामुळे अनेक कारखान्यांनी ५० ते १०० रुपये दर कमी करत साखरविक्रीचा सपाटा लावला आहे. १२ जूनच्या आत साखर आयात केल्यास साखरेचा आयातकर माफ करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. यंदा देशातील साखरेचं उत्पादन अंदाजे २ कोटी ३ लाख टनाच्या आसपास होण्याची शक्यता आहे. १२ जूनपर्यंत आयात केलेली कच्ची साखर भारतामध्ये येणार आहे. त्यावर प्रक्रिया करून ती साखर प्रत्यक्ष ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी महिना ते दीड महिन्याचा कालावधी लोटणार आहे. सध्या तरी साखर कारखान्यांना या साखरेची भीती नसली, तरी भविष्यात राहणार आहे. (वार्ताहर)- देशाची साखरेची गरज ही २ कोटी ४० लाख टन इतकी आहे. देशात मागील हंगामातील ७७ लाख टन साखर शिल्लक आहे. शिवाय, उत्पादित २ कोटी ३ लाख टन अशी मिळून २ कोटी ८० लाख टन साखर शिल्लक असताना केंद्राने ५ लाख टन कच्ची साखर आयात करण्याची काय गरज होती, असा सवाल कारखानदार आणि ऊसउत्पादक शेतकरी करत आहेत.नवीन हंगाम सुरू होईपर्यंत देशाला साखर पुरून शिल्लक साठा राहील, अशी परिस्थिती असताना साखर आयातीचा निर्णय घाईत घेतलेला दिसत आहे. साखरेचे दर चांगले राहिले, तर शेतकऱ्यांना दोन पैसे जादा मिळाले असते. शिवाय, कारखान्यांनी एफआरपीसाठी घेतलेले सरकारचे कर्ज फेडण्यासाठी मदत झाली असती. या निर्णयाचा फायदा होण्यापेक्षा तोटाच झाल्याचे दिसते. - अशोक पवार(अध्यक्ष, घेडगंगा कारखाना)एकदम साखर आयातीचा निर्णय हा घाईगडबडीने घेतला गेला. यापेक्षा कोटा पद्धत ही याची पहिली पायरी होती. याबाबत सरकारने विचार करायला हवा होता. नवीन हंगाम पाच महिन्यांत येणार आहे. त्यामुळे साखर कमी पडणार होती, असे काही नाही नवीन साखर येणारच होती. याचा फायदा व्यापारी घेत आहेत. विक्रीसाठी ठेवलेली साखर उचलली जात नाही. - पुरुषोत्तम जगताप (अध्यक्ष, सोमेश्वर कारखाना)