शहरं
Join us  
Trending Stories
1
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
2
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
3
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
4
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
5
Jolly LLB 3: अ‍ॅडव्होकेट जगदीश त्यागी बनून पुन्हा एकदा अरशद वारसी येतोय भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
6
Health: हाताच्या दोन बोटांवरून लक्षात येतं, शरीरात वाढलेलं कोलेस्ट्रॉल; त्वरित करा 'हे' उपाय 
7
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
8
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
9
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
10
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
11
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
12
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण
13
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
14
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
15
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
16
"लग्न टिकलं असतं तर मला आवडलं असतं...", अरबाज खानसोबतच्या घटस्फोटावर इतक्या वर्षांनी मलायकाचं भाष्य
17
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
18
Gopal Kala 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
19
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
20
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!

आॅक्टोबरमध्येही कारखाने सुरू होण्याची आशा धूसर

By admin | Updated: October 15, 2015 00:57 IST

राज्य सरकारने १५ आॅक्टोेबरला राज्यातील साखर कारखान्यांना हंगाम सुरू करण्याची परवानगी जरी दिली असली, तरीही ऊसतोडणी वाहतूक व मुकादम संघटनांनी संपाचे हत्यार उपसले आहे

सोमेश्वरनगर : राज्य सरकारने १५ आॅक्टोेबरला राज्यातील साखर कारखान्यांना हंगाम सुरू करण्याची परवानगी जरी दिली असली, तरीही ऊसतोडणी वाहतूक व मुकादम संघटनांनी संपाचे हत्यार उपसले आहे. जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत एकही ऊसतोडणी मजूर कारखान्यावर पाठविणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. त्यामुळे आॅक्टोबरमध्ये कारखाने सुरू होण्याची आशा धूसर झाली आहे.गेल्या वर्षी त्यांनी आॅगस्ट महिन्यातच संप पुकारला होता. अडीच महिने संपर्क करूनही संघटनांना काहीच फलित मिळाले नाही. याही वर्षी गेल्या वर्षीच्या मागण्या घेऊन या संघटना रस्त्यावर उतरणार आहेत.याबाबत संघटनांनी राज्य सरकार व साखर संघ यांना लेखी कळविले आहे. कारखाने लवकर सुरू करून एप्रिलअखेर ऊस संपविण्याच्या आशेवर ऊसतोडणी संघटनांनी पाणी फिरविले आहे.हा संप लवकर न मिटल्यास गाळप हंगाम लांबण्याची चिन्हे आहेत. मार्च महिन्याच्या पुढे पाण्याअभावी कारखाने चालविणे कारखान्यांपुढे एक आव्हान असेल. गेल्या वर्षी भाजपा सरकार सत्तेवर नवीन आले होते; त्यामुळे ग्र्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या विनंतीवरून बीडच्या संघटनेने संपामधून माघार घेतल्याने संपामध्ये फूट पडली होती. मात्र, या वर्षी संघटना आपल्या भूमिकांवर ठाम असल्याचे चित्र आहे.याबाबत संघटनांनी राज्य सरकार व साखर संघ यांना लेखी कळविले आहे. मात्र, संघटनांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप संघटना करीत आहेत. (वार्ताहर)