शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
2
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
3
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
4
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
5
टीम इंडियाचा ICC क्रमवारीत धुमधडाका! एक-दोन नव्हे, तब्बल ५ स्टार क्रिकेटर रँकिंगमध्ये अव्वल
6
अतिशय गुप्तपणे भारताने बंगालच्या खाडीत केला मोठा धमाका; कित्येक किमी पसरला आवाज, चीनला धडकी
7
"भगवा झेंडा पाहून TMC चा लाठीचार्ज, गुंडांना पोलिसांच्या मागे लपवणं..."; ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
8
Viral Video: भगवान विष्णूची कंबोडियातील मूर्ती लष्कराने पाडली, व्हायरल होत असलेला व्हिडीओचे सत्य काय?
9
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
10
भाजपाला धक्का, महादेव जानकरांची काँग्रेससोबत आघाडी, एकत्र निवडणूक लढवणार  
11
Eknath Shinde: आपली पोरं सांभाळू शकत नाहीत, मुंबई काय सांभाळणार? एकनाथ शिंदेंची ठाकरे बंधूंवर टीका
12
'धुरंधर'च्या यशावर रणवीर सिंह गप्प का? सिनेमातील 'डोंगा'नेच दिली प्रतिक्रिया; म्हणाला...
13
Taurus Yearly Horoscope 2026: वृषभ राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल, प्रतिभा आणि संयमाची कसोटी; 'या' वर्षात कुटुंबाची साथ ठरेल यशाची गुरुकिल्ली!
14
"पराभव समोर दिसताच भाजप पैसा आणि जातीचे राजकारण सुरू करते" आदित्य ठाकरेंची बोचरी टीका!
15
विराट सेंच्युरी! किंग कोहलीनं मोडला मास्टर ब्लास्टर सचिनचा रेकॉर्ड; वेगाने गाठला १६००० धावांचा पल्ला
16
नितेश राणे, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना कोर्टाचा दणका, बजावलं अजामिनपात्र वॉरंट
17
जपानमध्ये शंभरी पार करणार्‍यांची संख्या लक्षावधी, महिलांचे प्रमाण अधिक; दीर्घायुष्याचे गुपित काय?
18
युतीची घोषणा मात्र जागांचा सस्पेन्स; उद्धवसेना-मनसेत जागावाटपावर 'असा' ठरलाय फॉर्म्युला?
19
सोनं थांबेना, चांदी आवरेना! सोन्याच्या दरात ७०% तर चांदीत १५० टक्क्यांची वाढ; पाहा कुठे पोहोचतील किमती?
20
राष्ट्रवादीचे नेते राहुल कलाटे भाजपमध्ये;पक्षातील कार्यकर्त्यांचा विरोध डावलून दिला प्रवेश
Daily Top 2Weekly Top 5

बाह्यवळणाची कामे प्रलंबित; टोलनाका सुरू

By admin | Updated: March 16, 2017 01:58 IST

खेड ते सिन्नर या दुसऱ्या टप्प्यातील चौपदरीकरणात खेड ते चाळकवाडी ४९.३ किमीचा रस्ता आहे. यापैकी बाह्यवळणाचे २६.९ किमीचे काम प्रलंबित

नारायणगाव : खेड ते सिन्नर या दुसऱ्या टप्प्यातील चौपदरीकरणात खेड ते चाळकवाडी ४९.३ किमीचा रस्ता आहे. यापैकी बाह्यवळणाचे २६.९ किमीचे काम प्रलंबित असताना तसेच बाधित शेतकऱ्यांना संपादित क्षेत्राचा पूर्ण मोबदला अद्याप मिळालेला नाही. असे असतानादेखील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व ठेकेदार यांनी संगनमत करून टोलनाका दि़ २१ फेब्रुवारीपासून सुरू केला आहे़ टोलनाका सुरू झाल्यानंतर बाह्यवळणाचे काम संथ गतीने सुरू आहे़ अधिकाऱ्यांनी खेड ते सिन्नर दरम्यानचे काम ७५ टक्के पूर्ण दाखवून दोन टोलनाके सुरू केले आहेत़ वास्तविक पहिल्या टोलनाक्याचे काम ५० टक्क्यांपेक्षा जास्त प्रमाणात प्रलंबित असताना चाळकवाडी येथील सुरू केलेला टोलनाका हा बेकायदेशीररीत्या सुरू केल्याची जुन्नर तालुक्यातील नागरिकांची तक्रार आहे़ सुरू करण्यात आलेला चाळकवाडी येथील टोलनाका बाह्यवळणाचे काम पूर्ण होईपर्यंत बंद करण्यात यावा व आजतागायत वसूल केलेला टोल शासनाकडे जमा करण्यात यावा, अशी मागणी जुन्नर तालुक्यातील नागरिकांकडून होत आहे.राष्ट्रीय राजमार्ग क्र. ५० मधील चौपदरीकरणाचे काम खेडपासून (किमी ४२) ते सिन्नर (किमी १७७) असा १३७.४२ किमीच्या रस्त्याचे रुंदीकरण व ४ लेन बनवण्याचे काम एनएचडीपी भाग ४ अंतर्गत ‘बांधा, वापरा व हस्तांतरित करणे’ या तत्त्वानुसार करण्यात आलेले आहे़ रस्त्याच्या कामासंदर्भात झालेल्या अटी व शर्तींमध्ये टोलनाक्याचे अंतर तडजोडीनुसार ६० किमी अंतरावर करण्यात आले आहे़ चाळकवाडी येथील टोलनाक्याला अनेकांचा विरोध होता़ हा टोलनाका बोटाखिंडीमध्ये हलविण्यात यावा, अशी मागणी होती़ परंतु नगर किंवा कल्याणकडे जाणाऱ्या वाहनांना केवळ ५ ते १० किमीसाठी नाहक टोलचा भुर्दंड पडला आहे़ नगर-कल्याण भागातून जुन्नर तालुक्यातील येणाऱ्या वाहनांनादेखील नाहक टोल द्यावा लागणार आहे़ चाळकवाडी येथील टोलनाक्यातून जुन्नर तालुक्यातील वाहनांसाठी टोल आकारणी केली जात नसली तरीही जुन्नर तालुक्यात येणाऱ्या जड वाहनांना तसेच पाहुण्यांना नाहक टोलचा भुर्दंड पडत आहे़ चाळकवाडी येथे सुरू करण्यात आलेला टोल हा अधिकाऱ्यांना हाताशी धरून प्रलंबित कामे असताना व केंद्र शासनाला चुकीची माहिती सादर करून टोल सुरू करण्यात आला आहे़ मनसेचे उपजिल्हा प्रमुख मकरंद पाटे तसेच सामाजिक कार्यकर्ते डी़ बी. वाळुंज यांनी चाळकवाडी येथील चुकीच्या टोल आकारणीबद्दल उच्च न्यायालयात जनहिताची याचिका दाखल करण्यासाठी प्रक्रिया सुरू केलेली आहे़ या टोलनाक्यापासून स्थानिकांना रोजगार उपलब्ध होईल, असे सांगण्यात येते होते़ मात्र, प्रत्यक्षात स्थानिक रोजगार तर लांबच, या टोलनाक्यामुळे अनेकांची घरे, व्यवसाय संपुष्टात आले आहेत़ स्थानिक रोजगार उपलब्ध करून देऊ, असा भुलभुलय्या करून स्थानिकांना रोजगार देण्यास लागू नये व टोलनाक्यास विरोध होऊ नये म्हणून प्रशासनाने आचारसंहितेच्या काळात म्हणजेच दि. २१ फेब्रुवारी २०१७ रोजी मध्यरात्री टोलनाका सुरू केला.