शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादाची अतिरेकी भावना घातक - दलाई लामा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2018 01:30 IST

कोणत्या धर्माचे पालन करायचे हा प्रत्येकाचा वैयक्तिक निर्णय आहे, परंतु राष्ट्रवादाची अतिरेकी भावना ही भविष्यासाठी घातक आहे. धार्मिक शिकवणीच्या आधारावर कोणताही समाज प्रगती करू शकत नाही. म्हणूनच धर्माची शिकवण दूर सारून, आधुनिक शिक्षण ही काळाची गरज असल्याचे मत ज्येष्ठ अध्यात्मिक गुरू दलाई लामा यांनी व्यक्त केले.

पुणे : कोणत्या धर्माचे पालन करायचे हा प्रत्येकाचा वैयक्तिक निर्णय आहे, परंतु राष्ट्रवादाची अतिरेकी भावना ही भविष्यासाठी घातक आहे. धार्मिक शिकवणीच्या आधारावर कोणताही समाज प्रगती करू शकत नाही. म्हणूनच धर्माची शिकवण दूर सारून, आधुनिक शिक्षण ही काळाची गरज असल्याचे मत ज्येष्ठ अध्यात्मिक गुरू दलाई लामा यांनी व्यक्त केले.एमआयटी स्कूल आॅफ गव्हर्नमेंट आणि एमआयटी विश्वशांती विद्यापीठातर्फे आयोजित करण्यात आलेल्या दुसºया ‘नॅशनल टीचर्स काँग्रेस’चे उद्घाटन दलाई लामा यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. या प्रसंगी महापौर मुक्ता टिळक, ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ.अनिल काकोडकर, एमआयटी विश्वशांती विद्यापीठाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ कराड, कार्याध्यक्ष प्रा.राहुल कराड आदी उपस्थित होते.डॉ. काकोडकर म्हणाले, आपण आज ज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगात आहोत. त्यामुळे पारंपरिक शिक्षण पद्धतीमध्ये बदल व्हायला हवेत. संशोधनात्मक शिक्षण देण्यावर भर द्यायला हवा. टेक्नोसॅव्ही पिढी ज्या वेगाने धावते आहे, त्या वेगाने त्यांना शिक्षण देण्यासाठी शिक्षकांनी नवे तंत्र अंगीकारले पाहिजे. जागतिक स्तरावर शिक्षण क्षेत्रात होत असलेल्या बदलांची देवाण-घेवाण झाली आणि शिक्षण व औद्योगिक क्षेत्र एकत्रित आले, तर राष्ट्र उभारणीचा वेगही वाढेल. त्यासाठी संशोधनात्मक शिक्षण पद्धतीचे वातावरण तयार केले पाहिजे. आयआयटीच्या थिन फिल्म लॅबोरेटरीचे संस्थापक, समन्वयक आणि सल्लागार कस्तुरीलाल चोप्रा, विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. अरुण निगवेकर, मुंबईच्या आयआयटीचे माजी सहसंचालक प्रा. एस. सी सहस्त्रबुद्धे आणि कानपूरच्या आयआयटीचे माजी संचालक डॉ. संजय धांडे यांना ‘जीवनगौरव पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले.प्रेम, सहिष्णुता आणि दयाभाव याची शिकवण प्रत्येक धर्माने दिली आहे. धर्माबद्दलच्या चुकीच्या समजुतीमुळे आज द्वेष आणि तिरस्काराची भावना नागरिकांमध्ये रुजली आहे. जगभरातील धार्मिकतेवरून वाद उद्भवत आहेत. अशा वेळी शिक्षकांची भूमिका महत्त्वाची असून, त्यांनी शिक्षणातून मानवतावाद आणि आपण सर्व मानव एक आहोत, ही भावना विद्यार्थ्यांमध्ये रुजवायला हवी. पैसा आणि प्रसिद्धी या पलीकडे जाऊन आजच्या शिक्षणपद्धतीने नैतिक मूल्ये, प्रामाणिकपणा, सत्य आणि सद्भाव शिकविला पाहिजे. विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण केला पाहिजे. आपली शिक्षणपद्धती सक्षम करण्यासाठी प्रत्येकाने स्वत:पासून सुरुवात करून योगदान दिले पाहिजे. - दलाई लामा

टॅग्स :Dalai Lamaदलाई लामा