शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
2
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
3
'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
4
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
5
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
6
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
7
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
8
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
9
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
10
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
11
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
12
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
13
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
14
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
15
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
16
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बदलापूरमधील घटना
17
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?
18
Laura Wolvaardt Century : लॉराचा शतकी तोरा! वर्ल्ड कपमध्ये मिताली राजच्या वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी
19
जिल्हाधिकाऱ्यांना मुख्य सचिव बनून केला फोन, दिले असे आदेश, पिता-पुत्रासह तिघांना अटक, असं फुटलं बिंग
20
हॉटेलमध्ये आलेल्या 'त्या' डॉक्टर तरूणीची अवस्था काय होती?; मालकाने सांगितला घटनाक्रम

एका विश्वस्तासह तीन उपाध्यक्षांची हकालपट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कार्यकारिणी किंवा अध्यक्षपदामध्ये कोणताही बदल करण्यात आला नाही. परंतु, परिषदेशी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कार्यकारिणी किंवा अध्यक्षपदामध्ये कोणताही बदल करण्यात आला नाही. परंतु, परिषदेशी वर्षानुवर्षे नाळ जुळलेल्या आणि परिषदेच्या अडीअडचणीत धावून येणा-या एका विश्वस्ताची आणि तीन उपाध्यक्षांची कोणतीही पूर्वसूचना न देता हकालपट्टी केल्याने त्यांच्याकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.

परिषदेच्या कार्यकारी मंडळाची आॅनलाइन सभा नुकतीच पार पडली. त्यात परिषदेच्या काही विश्वस्तांची नव्याने निवड करीत जुन्या विश्वस्ताला कोणतीही पूर्वसूचना न देता काढून टाकण्यात आले. त्यात तीन उपाध्यक्षांचीही अशाच प्रकारे हकालपट्टी करण्यात आली. त्यात परिषदेमध्ये अनेक वर्षे सक्रीय असलेले संत वाड्मयाचे अभ्यासक, माजी आमदार उल्हास पवार यांच्यासह ज्येष्ठ साहित्यिक तारा भवाळकर, चंद्रकांत शेवाळे आणि निर्मला ठोकळ यांना उपाध्यक्षपदावरून डिच्चू देण्यात आला आहे. परिषदेने कार्यकारिणीला कोणताही धक्का न लावता ती तशीच कार्यरत ठेवली आहे. केवळ मनमानीपणे काहीच व्यक्तींची सोयीनुसार हकालपट्टी केल्यामुळे त्यांच्यात नाराजी आहे. कार्यकारी मंडळाला पाच वर्षे मुदतवाढीबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नसताना परिषदेने हे केलेले बदल अनेकांच्या भुवया उंचावणारे ठरले आहेत. दरम्यान, कार्यकारिणी मंडळाने अत्यंत विचारपूर्वक काही व्यक्तींची नियुक्ती केली आहे. भविष्यात कार्याध्यक्षपदाला आव्हान उभे राहू नये म्हणून राजीव बर्वे यांची उपाध्यक्षपदी वर्णी लावण्यात आली असल्याची चर्चा साहित्य वर्तुळात ऐकायला मिळत आहे. कोरोना काळात परिषदेचेअनुदान कमी झाले आहे. त्यामुळे निधी संकलित करणे अवघड झाले आहे. त्यामुळे विश्वस्तपदावर प्रतिष्ठित व्यक्तींची निवड करून परिषदेने हित साधल्याची चर्चाही सुरू आहे.

------------------------------------

आम्हाला केवळ पत्र पाठविली की आपली मुदत संपली आहे. मग तशी मुदत ही कार्यकारी मंडळाची देखील संपली आहे. मात्र कोणतीही पूर्वसूचना न देता आम्हाला काढून टाकण्यात आले. जे मला खटकले आहे. ही गोष्ट मला वृत्तपत्रातून कळली. परिषदेने वेळोवेळी अडचणीत सापडली की मला बोलावले. पण विश्वस्तपदावरून काढताना विचार केला नाही. - उल्हास पवार, माजी विश्वस्त

---------------------------------------------

आम्हाला काढायचे होते तर सांगायचे ना? आम्ही स्वत:हून राजीनामे दिले असते. परिषदेच्या कार्यकारी मंडळाने जे केले ते योग्य केले नाही. बदलायची तर पूर्ण कार्यकारिणी बदलायची ना? काही लोक काढून काही लोक सोयीनुुसार ठेवले. ही मनमानी झाली. त्यापेक्षा मग निवडणूक घ्यायची ना? जे चाललं आहे ते ठीक चालले नाही. - चंद्रकांत शेवाळे, माजी उपाध्यक्ष

--------------------------------------