शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

अणुचाचण्यांमुळेच असुरक्षितता

By admin | Updated: February 4, 2015 00:29 IST

जगात शांतता नांदण्याऐवजी असुरक्षितता वाढीस लागली आहे. यामागचे प्रमुख कारण हे अणुचाचण्या आहे. शत्रुराष्ट्रांवर वचक ठेवण्यासाठी अनेक देशांनी अणुचाचण्या घेतल्या.

पुणे : जगात शांतता नांदण्याऐवजी असुरक्षितता वाढीस लागली आहे. यामागचे प्रमुख कारण हे अणुचाचण्या आहे. शत्रुराष्ट्रांवर वचक ठेवण्यासाठी अनेक देशांनी अणुचाचण्या घेतल्या. यामधून अणुचाचण्या घेण्याची स्पर्धा निर्माण झाली आणि कोणताही देश कोणावरही अण्वस्त्र डागू शकतो, ही भीती निर्माण झाली असून, ती दिवसेंदिवस वाढतच चालली आहे, असे मत भाभा अ‍ॅटोमिक एनर्जीतील माजी अधिकारी व अणुशास्त्रज्ञ प्रकाश बुरटे यांनी व्यक्त केले.अणुविध्वंसविरोधी समितीच्या वतीने आज ‘अण्वस्त्रमुक्त जग शक्य आहे’ या विषयावर आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. या वेळी आरोग्य सेनेचे डॉ. अभिजित वैद्य, लोकायतचे नीरज जैन व्यासपीठावर उपस्थित होते. बुरटे म्हणाले, विसाव्या शतकात अण्वस्त्रे निर्माण करण्यात आली आणि पहिल्या ५० वर्षांत जगाला अस्थिरतेकडे नेण्याच्या घटना घडल्या. अमेरिका आणि रशियाने एकमेकांना शह देण्यासाठी अण्वस्त्रांची निर्मिती केली. अमेरिकेने जपानच्या हिरोशिमा व नागासाकी या दोन शहरांवर अण्वस्त्रे टाकली आणि यात लाखो नागरिकांचा मृत्यू झाला. यावरून याची दाहकता लक्षात आली. मात्र, त्यानंतरही शत्रुराष्ट्रांना शह देण्यासाठी अनेक राष्ट्रांनी अण्वस्त्रांची निर्मिती केली. यामुळे १९८५ मध्ये जगात तब्बल ६७ हजार अण्वस्त्रे झाली. या अण्वस्त्रांच्या तपासणीसाठी स्फोट घडवून आणल्याने जगाच्या बहुतांशी भागात त्याचे किरणोत्सार पोहोचले. या अण्वस्त्रे निर्माण करण्याच्या स्पर्धेमुळे अनेक राष्ट्रांमधील शत्रुत्व वाढत गेले आणि असुरक्षिततेची भावना वाढीस लागली. याचे गंभीर परिणाम समोर येऊ लागल्याने अण्वस्त्रमुक्त जग ही संकल्पना समोर आली आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर युनोच्या माध्यमातून ती साकारण्यासाठी प्रयत्न केले जाऊ लागले. यात अनेक देशांनी भाग घेतला. मात्र भारतासह अजूनही काही देश अण्वस्त्रमुक्त होण्यास तयार नाहीत. असे असतानाही २०१३ पर्यंत जगातील अण्वस्त्रांची संख्या ६७ हजारांवरून १७ हजारांपर्यंत खाली आली. यातील ७ हजार अण्वस्त्रे काही महिन्यांमध्ये आणखी कमी होतील, असे मत बुरटे यांनी व्यक्त केले. (प्रतिनिधी)४जगाला खरोखरच अण्वस्त्रमुक्त करायचे असेल, तर सर्व देशांमधील नागरिकांनी सरकारवर यासाठी दबाव आणायला हवा. अमेरिके तील नागरिकांनी रस्त्यावर उतरत अण्वस्त्रे कमी करण्याची जोरदार मागणी केली. यामुळे अमेरिकेचे सरकार झुकले आणि ते कमी करण्यास सुरुवात केली. ४अशा पद्धतीने भारतासह सर्व देशांमधील नागरिकांनी रस्त्यावर उतरून आंदोलन करून अण्वस्त्रमुक्त देशाची मागणी केली तर प्रत्येक सरकार झुकेल आणि हे शक्य होईल, असे मत बुरटे यांनी व्यक्त केले.