शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
2
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
3
विमान कराचीला जाणार होते पण सौदी अरेबियाला कसे पोहोचले? पाकिस्तान एअरलाइन्सचा निष्काळजीपणा
4
नाशिकमध्ये महिलेने पतीचा झोपेतच दाबला गळा, हत्या करून फेकले जंगलात; गावात खळबळ
5
'तीन दिवसापूर्वीच कट रचला होता'; राधिका हत्या प्रकरणात मैत्रिणीचा धक्कादायक खुलासा
6
समुद्र किनारी फिरताना सापडला गिफ्ट बॉक्स, उघडून बघताच बसला धक्का, थेट गाठलं पोलीस ठाणं, आतमध्ये नेमकं होतं काय?  
7
आतापर्यंत कुठे-कुठे फुटला ट्रम्प 'टॅरिफ बॉम्ब'? पाहा संपूर्ण यादी..; भारताबाबत मोठी अपडेट
8
विरोधकांच्या हल्ल्यात ऐन तारुण्यात दोन पाय गमावले, पण समाजकार्य नाही सोडले, आता राज्यसभेवर नियुक्ती, कोण आहेत सदानंदन मास्टर
9
शेअर बाजारात नुकसान होतंय? '५५:२३:२२' चा फॉर्म्युला वापरा, पोर्टफोलिओ सुरक्षित ठेवून नफा कमवा!
10
आता 'चलाखी' चालणार नाही! कारच्या काचेवर FASTag शी छेडछाड केल्यावर होईल कारवाई...
11
'PM मोदी म्हणाले, मराठीत बोलू की हिंदीत आणि नंतर...'; उज्ज्वल निकमांना खासदारकी मिळण्यापूर्वी मोदींचा फोन, काय झालं बोलणं?
12
झरदारींना हटवून असीम मुनीर पाकिस्तानचे राष्ट्रपती होणार? शाहबाज शरीफ स्पष्टच बोलले...
13
जीवावर आलं ते पायावर निभावलं, इराणच्या राष्ट्रपतीना मारण्यासाठी आलं इस्राइलचं विमान, ६ क्षेपणास्त्रेही डागली, पण...  
14
वो बुलाती है मगर...! स्पा सेंटरच्या तरुणींनी इशारे करताच हा गेला..., स्वत:चा पाय मोडून आला
15
रिलायन्स, TCS ला कोटींचे नुकसान!! घसरणीतही 'या' २ कंपन्यांनी कमावला नफा, कसं शक्य झालं?
16
Crime: कुराण शिकवण्याच्या नावाखाली घरी नेलं आणि...; सख्ख्या मावशीच्या कृत्यानं उत्तर प्रदेश हादरलं!
17
विरारमधील मराठी द्वेष्ट्या रिक्षाचालकाला शिवसेना कार्यकर्त्यांनी चांगलेच चोपले
18
"छत्रपती शिवाजी महाराजांची गादी माझीच...", अभिजीत बिचकुलेंच्या वक्तव्याने नवा वाद, काय म्हणाले?
19
बिहार हादरले! भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या! दोन तरुणांनी झाडल्या चार गोळ्या
20
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती

उघड्यावरच टाकल्या केबल

By admin | Updated: April 10, 2015 05:36 IST

सुमारे ७ कोटी रुपये खर्च करून बारामती शहरात भूमिगत वीजवाहिन्यांचे काम करण्यात आले आहे. बहुतेक ठिकाणचे काम पूर्ण झाले आहे

बारामती : सुमारे ७ कोटी रुपये खर्च करून बारामती शहरात भूमिगत वीजवाहिन्यांचे काम करण्यात आले आहे. बहुतेक ठिकाणचे काम पूर्ण झाले आहे; परंतु कामाचा दर्जा, त्यासाठी वापरलेले साहित्य निकृष्ट असल्याने वीज महावितरणच्या ठेकेदाराने बारामती नगरपालिकेला ‘चुना’ लावला असल्याचे चित्र आहे. बारामती नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनी या कामाच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. वीजवाहिन्या ‘बर्स्ट’ होण्याचे प्रकार घडले आहेत. त्याची दुरुस्ती करण्याची जबाबदारी मात्र महावितरणच्या कर्मचाऱ्यांवर येऊन पडते. नगरपालिकेत यावर विचारणा केल्यानंतर ८ दिवसांत कामाचा दर्जा तपासण्याचे आदेश देण्यात आले आहेत. बारामती नगरपालिकेची जुनी हद्द आणि नवीन वाढीव हद्दीत भूमिगत वीजवाहिन्यांचे काम दोन वर्षांपासून सुरू आहे. वीजवाहिन्या जमिनीत गाडण्यासाठी खोल चाऱ्या घेण्याची तसदीदेखील ठेकेदाराने पार पाडली नाही. त्याचबरोबर सिमेंटच्या फुटक्या पाईपचा वापर वीजवाहिन्यांवर आच्छादन करण्यासाठी केला आहे. या सिमेंटचे पाईप कामगारांनी उचलतानाच फुटलेले आहेत. या कामाच्या दर्जाकडे कोणाचेच लक्ष नाही. भूमिगत वीजवाहिन्यांचे काम वेगळे, पथदिव्यांसाठी खांब उभे करण्यासाठी वेगवेगळे ठेके देण्यात आले आहेत. त्यामुळे एकाच कामावर दोन वेळा खोदाई करावी लागते. या परिस्थितीत मध्यंतरी झालेल्या अवकाळी पावसात अनेक ठिकाणच्या भूमिगत वीजवाहिन्या ‘बर्स्ट’ झाल्या. त्याचा घोटाळा काढताना महावितरणच्या कर्मचाऱ्यांना नाकी नऊ आले. एका ठिकाणचा घोटाळा काढल्यानंतर दुसऱ्या ठिकाणी पुन्हा तोच प्रकार घडत होता. पावसाळ्यात हा त्रास वाढण्याची शक्यता आहे. भूमिगत वीजवाहिन्या टाकत असताना अरुंद रस्ते, गल्लीबोळांमध्ये मनमानी पद्धतीने काम करण्यात आले आहे. केबल उघड्यावर आहेत. या केबलचा दर्जादेखील तपासण्याची गरज आहे. नगरपालिकेच्या नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत याविरोधात नगरसेवक सुभाष ढोले यांनी विचारणा केली. त्यानंतर नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी संपूर्ण शहरातील कामाचा दर्जा तपासून अहवाल ८ दिवसांत सादर करण्याचा निर्णय घेण्यात आला. या अहवालाची प्रतीक्षा आहे. सद्य:स्थितीला वीजवाहिन्यांचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याचे चित्र आहे. पथदिव्यांसाठी खड्डे खोदून सिमेंटच्या चौथाऱ्यावर खांब उभे करण्याचे काम आहे. ठेकेदाराने त्यामध्येदेखील ‘ठकगिरी’ केली आहे. त्यामुळे आताच खांब वेडेवाकडे होण्याचे प्रकार घडत आहेत. एकूणच, संपूर्ण कामांची चौकशी महावितरणच्या अधिकाऱ्यांनी करण्याची गरज निर्माण झाली आहे. (प्रतिनिधी)