शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
2
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
3
हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार
4
५०% सूट, ८०% सूट... कपडे आणि बुटांच्या दुकांनावर आता अशा ऑफर्स दिसणार नाहीत! GST कपातीशी संबंध काय?
5
शाहिद आफ्रिदीचं इरफान पठाणला आव्हान, म्हणाला, ‘’मर्द असशील तर…”, मिळालं असं प्रत्युत्तर
6
नागपूरमध्ये मनोज जायस्वाल यांना अटक, सीबीआयची हॉटेलमध्ये कारवाई; 4000 कोटींची केस काय?
7
मोलकरणीने मालकिणीच्या 'थप्पड'चा असा घेतला बदला, वाचून तुमच्याही भुवया उंचावतील!
8
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
9
'शिंदे, पवार अन् भाजपचे ९०% आमदार मते चोरुन निवडून आले', संजय राऊतांचे टीकास्त्र
10
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
11
मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर...
12
हृदयद्रावक! जुळ्या मुलांनी आईला मारलेली मिठी; ढिगाऱ्याखालील मृतदेह पाहून अख्खं गाव रडलं
13
VIRAL : सलाम तिच्या हिमतीला! 'मौत का कुआं'मध्ये बाईक चालवणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
14
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क
15
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
16
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
17
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा
18
हसत हसतच पाण्याच उतरलेला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जुबीन गर्गचा शेवटचा Video व्हायरल
19
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
20
Akshay Kumar : सातवीत नापास झाला होता अभिनेता अक्षय कुमार; लहानपणी पाहिलेलं 'हे' स्वप्न

उघड्यावरच टाकल्या केबल

By admin | Updated: April 10, 2015 05:36 IST

सुमारे ७ कोटी रुपये खर्च करून बारामती शहरात भूमिगत वीजवाहिन्यांचे काम करण्यात आले आहे. बहुतेक ठिकाणचे काम पूर्ण झाले आहे

बारामती : सुमारे ७ कोटी रुपये खर्च करून बारामती शहरात भूमिगत वीजवाहिन्यांचे काम करण्यात आले आहे. बहुतेक ठिकाणचे काम पूर्ण झाले आहे; परंतु कामाचा दर्जा, त्यासाठी वापरलेले साहित्य निकृष्ट असल्याने वीज महावितरणच्या ठेकेदाराने बारामती नगरपालिकेला ‘चुना’ लावला असल्याचे चित्र आहे. बारामती नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनी या कामाच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. वीजवाहिन्या ‘बर्स्ट’ होण्याचे प्रकार घडले आहेत. त्याची दुरुस्ती करण्याची जबाबदारी मात्र महावितरणच्या कर्मचाऱ्यांवर येऊन पडते. नगरपालिकेत यावर विचारणा केल्यानंतर ८ दिवसांत कामाचा दर्जा तपासण्याचे आदेश देण्यात आले आहेत. बारामती नगरपालिकेची जुनी हद्द आणि नवीन वाढीव हद्दीत भूमिगत वीजवाहिन्यांचे काम दोन वर्षांपासून सुरू आहे. वीजवाहिन्या जमिनीत गाडण्यासाठी खोल चाऱ्या घेण्याची तसदीदेखील ठेकेदाराने पार पाडली नाही. त्याचबरोबर सिमेंटच्या फुटक्या पाईपचा वापर वीजवाहिन्यांवर आच्छादन करण्यासाठी केला आहे. या सिमेंटचे पाईप कामगारांनी उचलतानाच फुटलेले आहेत. या कामाच्या दर्जाकडे कोणाचेच लक्ष नाही. भूमिगत वीजवाहिन्यांचे काम वेगळे, पथदिव्यांसाठी खांब उभे करण्यासाठी वेगवेगळे ठेके देण्यात आले आहेत. त्यामुळे एकाच कामावर दोन वेळा खोदाई करावी लागते. या परिस्थितीत मध्यंतरी झालेल्या अवकाळी पावसात अनेक ठिकाणच्या भूमिगत वीजवाहिन्या ‘बर्स्ट’ झाल्या. त्याचा घोटाळा काढताना महावितरणच्या कर्मचाऱ्यांना नाकी नऊ आले. एका ठिकाणचा घोटाळा काढल्यानंतर दुसऱ्या ठिकाणी पुन्हा तोच प्रकार घडत होता. पावसाळ्यात हा त्रास वाढण्याची शक्यता आहे. भूमिगत वीजवाहिन्या टाकत असताना अरुंद रस्ते, गल्लीबोळांमध्ये मनमानी पद्धतीने काम करण्यात आले आहे. केबल उघड्यावर आहेत. या केबलचा दर्जादेखील तपासण्याची गरज आहे. नगरपालिकेच्या नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत याविरोधात नगरसेवक सुभाष ढोले यांनी विचारणा केली. त्यानंतर नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी संपूर्ण शहरातील कामाचा दर्जा तपासून अहवाल ८ दिवसांत सादर करण्याचा निर्णय घेण्यात आला. या अहवालाची प्रतीक्षा आहे. सद्य:स्थितीला वीजवाहिन्यांचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याचे चित्र आहे. पथदिव्यांसाठी खड्डे खोदून सिमेंटच्या चौथाऱ्यावर खांब उभे करण्याचे काम आहे. ठेकेदाराने त्यामध्येदेखील ‘ठकगिरी’ केली आहे. त्यामुळे आताच खांब वेडेवाकडे होण्याचे प्रकार घडत आहेत. एकूणच, संपूर्ण कामांची चौकशी महावितरणच्या अधिकाऱ्यांनी करण्याची गरज निर्माण झाली आहे. (प्रतिनिधी)