शहरं
Join us  
Trending Stories
1
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
3
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
4
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती
5
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
6
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
7
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
8
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
9
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
10
Operation Sindoor Live Updates: इंडिगो कंपनीकडून जम्मू, अमृतसर, चंडीगड, लेह, श्रीनगर आणि राजकोटला जाणारी विमाने रद्द
11
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
12
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
13
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
14
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
15
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
16
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
17
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
18
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
19
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
20
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार

निर्यात, जीवनावश्यक वस्तूंची उत्पादन साखळी अबाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पिंपरी : जीवनावश्यक वस्तू आणि निर्यात करणारे उद्योग आणि त्यांची उत्पादन साखळी अबाधित राहील. कोरोना नियमांचे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पिंपरी : जीवनावश्यक वस्तू आणि निर्यात करणारे उद्योग आणि त्यांची उत्पादन साखळी अबाधित राहील. कोरोना नियमांचे पालन करून कामावर येणाऱ्या कोणत्याही कामगारांची आणि पुरवठादारांची अडवणूक होणार नाही याची दक्षता घेण्याचे आश्वासन विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी बुधवारी (दि.१४) दिले.

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी राज्य सरकारने बुधवारी रात्री आठ वाजल्यापासून पंधरा दिवसांची टाळेबंदी जाहीर केली आहे. त्यात संदिग्धता असल्याने त्यावर चर्चा करण्यासाठी मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड ऍग्रीगकल्चर (एमसीसीआयएने) वेबिनार आयोजित केला होता. त्यात विभागीय आयुक्त राव बोलत होते. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त राजेश पाटील, पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, उद्योग विभागाचे सहसंचालक सदाशिव सुरवसे, अविनाश हदगल, एमसीसीआयएचे अध्यक्ष सुधीर मेहता, महासंचालक प्रशांत गिरबने उपस्थित होते.

टाळेबंदी निर्बंधाबाबत निर्माण झालेला गोंधळ दूर व्हावा. नियमांचे पालन करणे सोयीचे जावे यासाठी संभ्रम दूर करण्याचे आवाहन, मेहता यांनी केले. तर, पुण्यातून दरमहा पाच ते सहा हजार कोटी रुपयांचा माल निर्यात होतो याकडे गिरबने यांनी लक्ष वेधले.

विभागीय आयुक्त राव म्हणाले, जीवनावश्यक वस्तू आणि सेवा अबाधित राहतील. तसेच त्यांना पुरवठा करणारी उत्पादन साखळी सुरळीत राहील. गेल्या वर्षीच्या टाळेबंदी मार्गदर्शक सूचनेत निर्यात केल्या जाणाऱ्या उत्पादनांचा समावेश नव्हता. निर्यात केले जाणारे उद्योग सुरू राहील याची काळजी घेतली जाईल.

ऑटो उद्योगातून मोठी निर्यात

औषध, शेतमाल आणि शेतमाल प्रक्रिया उद्योग, डेअरी, फोर्जिंग, स्टील, पेंट उद्योग सुरू राहतील. तसेच त्यांना पुरवठा करणारी उत्पादन साखळी अबाधित राहील. तसेच निर्यातक्षम उद्योग सुरु राहतील. पुण्यामध्ये ऑटो उद्योग मोठ्या प्रमाणावर असून त्यांचे निर्यातीचे प्रमाण चांगले आहे. त्यामुळे हा उद्योग सुरू राहील. कामगारांना कामावर जाण्यासाठी अडचण येणार नाही. त्यांचे ओळखपत्र ग्राह्य धरले जाईल, असे उद्योग सहसंचालक सुरवसे यांनी स्पष्ट केले.

---

उद्योगांवर उगाचच कोणतेही निर्बंध घातले जाणार नाहीत. कोरोना नियमांचे पालन केल्यास बाधितांचा आकडा निश्चितच खाली येईल. मात्र, ते आपण किती निर्बंध पाळतो त्यावर अवलंबून आहे. निर्बंध पाळले न गेल्यास नाईलाजाने टाळेबंदीचा कालावधी वाढविला जाऊ शकतो. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने आपल्या घराचा उंबरठा केव्हाच ओलांडला आहे. त्यामुळे प्रत्येकाने नियमांचे प्रामाणिकपणे पालन ठरावे.

- सौरभ राव, विभागीय आयुक्त