शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
2
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
3
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
4
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
5
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
6
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
7
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
8
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
9
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
10
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
11
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
12
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
13
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
14
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
15
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
16
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
17
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
18
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
19
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
20
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान

रहाटणीकरांचा अस्तित्व मोर्चा

By admin | Updated: September 25, 2016 05:45 IST

रहाटणीगाव या नावाच्या अस्तित्वासाठी गावकऱ्यांनी लढा सुरू केला असून येथील छत्रपती शिवाजी पुतळा ते साई चौकापर्यंत मूक मोर्चा काढण्यात आला. त्यात आबालवृद्धांसह

रहाटणी : रहाटणीगाव या नावाच्या अस्तित्वासाठी गावकऱ्यांनी लढा सुरू केला असून येथील छत्रपती शिवाजी पुतळा ते साई चौकापर्यंत मूक मोर्चा काढण्यात आला. त्यात आबालवृद्धांसह तरुणही मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. स्थानिक नगरसेवक, पोलीस प्रशासन व महावितरणच्या अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. महापालिकेच्या नकाशावरून रहाटणीगावचे नाव हद्दपार करण्याचा परिसरातील व्यापारी, प्रशासन, व्यावसायिक, बांधकाम व्यावसायिक यांचा डाव असून, तो हाणून पाडण्यासाठी ग्रामस्थांनी मोर्चा काढला. छत्रपती शिवाजी चौकातून सकाळी मोर्चाला सुरुवात झाली. कार्यकर्ते रहाटणी हद्दीतील दुकानांवर ‘ही रहाटणी आहे.’’ असे स्टीकर चिटकवीत होते. पुढे हा मोर्चा कोकणे चौक, शिवार चौक ते साई चौकात पोहोचला. तिथे सांगता झाली. या वेळी अनेक ग्रामस्थांनी संतप्त प्रतिक्रिया नोंदविल्या. एक नागरिक म्हणाला, ‘‘रहाटणी हे गाव पिंपळे सौदागरच्या ४० वर्षे अगोदरचे आहे. रहाटणी चौक ते साई चौक रस्त्यावर विविध प्रकारचे मॉल्स आहेत. स्पॉट १८, साई चौक, शिवार चौक , ड क्षेत्रीय कार्यालय, कोकणे चौकात मॉल्स फक्त रहाटणी भागात आहेत. हा पूर्ण रस्ता रहाटणीच्या हद्दीतून जातो. तरी पालिका प्रशासनाने बीआरटी रस्त्यावरील पीएमपी थांब्याला शिवार चौक, पिंपळे सौदागर बस थांबा, साई चौक, पिंपळे सौदागर बस थांबा असे लिहिले आहे, हे का?.’’(वार्ताहर)गावाच्या नावासाठी एकवटले ग्रामस्थ मतभेद दूर सारत सर्व ग्रामस्थ या मूक मोर्चात सहभागी झाले होते. गावाची ओळख मिटविण्याचा डाव हाणून पाडण्यासाठी रहाटणी ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. अगदी शिस्तबद्ध पद्धतीने मोर्चा काढला. यादरम्यान कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये म्हणून वाकड पोलीस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी तैनात होते. मोर्चा मार्गावरील वाहतूक सुरळीत राहावी म्हणून सांगवी वाहतूक विभागाचे अधिकारी, कर्मचारी तैनात होते. मोर्चा कशासाठी? हॉटेल्स, रुग्णालये, शाळा, मोठेमोठे गृहप्रकल्प, विविध खासगी कार्यालये, आपल्या पत्रव्यवहाराच्या पाट्यावर सर्रास जाणूनबुजून पिंपळे सौदागर असा उल्लेख करीत आहेत. त्यामुळे रहाटणी गावाच्या नावाचा अस्तित्वाचाच प्रश्न निर्माण झाला होता. आंदोलन तीव्र करू संबंधित व्यापारी, व्यावसायिक , बांधकाम व्यावसायिक, पालिका प्रशासन, तसेच इतरही शासकीय, निमशासकीय कार्यालये यांनी दखल घेतली नाही, तर पुन्हा आम्हाला रस्त्यावर उतरावे लागणार आहे, असा इशाराही या वेळी देण्यात आला.