शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor : "ऑपरेशन सिंदूरमध्ये IC-814 प्लेन हायजॅक आणि पुलवामा हल्ल्यातील मास्टरमाइंडचा खात्मा"
2
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
3
छत्रपती शिवरायांच्या कर्तृत्वाला साजेसा पुतळा; राजकोट किल्ल्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलं पूजन
4
Vikram Misri: भारत- पाकिस्तान युद्धविरामानंतर परराष्ट्र सचिव मिस्री ट्रोल, मुलीबद्दल आक्षेपार्ह कमेंट
5
'भारतीय सैन्याने 35-40 पाकिस्तानी सैनिक मारले', ऑपरेशन सिंदूरबाबत DGMO यांची मोठी माहिती
6
India Pakistan Latest Update: भारत पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उडवणार, अमेरिकेला आठ दिवस आधीच होती माहिती
7
Eknath Shinde: ...तर जगाच्या नकाशातून पाकिस्तानचं नाव कायमचं गायब केलं जाईल, एकनाथ शिंदे पेटले
8
Operation Sindoor : "दहशतवाद्यांचा खात्मा करणं हे 'ऑपरेशन सिंदूर'चं उद्दिष्ट, १०० हून अधिक दहशतवाद्यांना केलं ठार"
9
...तर पाकिस्तानची खैर नाही, आणखी टेन्शन वाढणार; आता दरवर्षी 100 ब्रह्मोस तयार होणार! 
10
पन्हाळगडावर पावसाची जोरदार हजेरी, पहिल्याच पावसात मुख्य रस्त्यावर २ मोठ्या शिळा कोसळल्या
11
"वहां से गोली चलेगी, यहां से गोला चलेगा"; PM मोदींचा उच्चस्तरीय बैठकीत लष्कराला स्पष्ट मेसेज
12
"२६ जणांच्या मृत्यूचा बदला घेतला, आम्हाला मोदींचा अभिमान..."; आदिल हुसेनच्या भावाचं विधान
13
Operation Sindoor Live Updates: दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी भारत कोणत्याही थराला जाऊ शकतो
14
कर्जावर जगणारा पाकिस्तान लढाऊ विमानं, ड्रोन अन् बॉम्ब खरेदीसाठी एवढा पैसा आणतो कुठूण? सैन्याचे उद्योगधंदे जाणून थक्क व्हाल!
15
"गर्व वाटतो... जे मी करू शकलो नाही, ते मुलानं करून दाखवलं...!"; हुतात्मा मेजर पवन यांच्या वडिलांचे शब्द वाचून तुमचेही डोळे पाणावतील
16
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
17
लोणावळ्यात गुलाबी सुटकेसमध्ये आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले, दोघांना अटक, हत्येचे कारण...
18
दहशतवाद्यांना स्थानिकांची मदत; काश्मीरमध्ये 20 ठिकाणी छापे, स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश
19
मंदिरात दिवा लावण्यासाठी गेलेल्या वृद्ध महिलेची 8 ग्रँम सोने व १० ग्रँम चांदीसाठी हत्या
20
Seema Haider : "तुला कोणीही मारणार नाही, तू परत ये"; ढसाढसा रडली सीमाची बहीण, मोदींकडे मागितली मदत

टंचाईमधून वीजबिल माफ करा

By admin | Updated: February 24, 2016 03:30 IST

रंदर उपसा सिंचन योजना तसेच जनाई शिरसाई उपसा सिंचन योजनांद्वारे टंचाईग्रस्त भागात जनावरांना चारा पिकविण्यासाठी जो पाणीपुरवठा केला जातो,

नारायणपूर : पुरंदर उपसा सिंचन योजना तसेच जनाई शिरसाई उपसा सिंचन योजनांद्वारे टंचाईग्रस्त भागात जनावरांना चारा पिकविण्यासाठी जो पाणीपुरवठा केला जातो, त्यासाठी येणारे वीजबिल माफ करण्यात यावे, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह पुरंदर तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. मागील कार्यवाहीची माहिती घेऊन निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी या वेळी दिले.पुरंदर तालुक्यामध्ये १२ टँकर चालू असल्याची कागदोपत्री नोंद आहे. परंतु नियोजनाअभावी कमी खेपा होतात, याबाबतही नाराजी व्यक्त करण्यात आली.सासवड (ता. पुरंदर) येथील पंचायत समितीच्या संभाजी सभागृहात १६ फेब्रुवारी रोजी टंचाई आढावा बैठक घेण्यात आली होती. या वेळी पाण्यासंदर्भात समस्यांचा पाढा वाचला होता. त्या वेळी सुळे यांनी आपण जिल्हाधिकारी यांच्याशी याबाबत बोलून काहीतरी मार्ग काढू, असे आश्वासन दिले होते. त्यानुसार सोमवारी ही बैैठक घेण्यात आली. गुरुवारी होणाऱ्या बैैठकीत तातडीने निर्णय घेतले जातील, असेही या वेळी राव यांनी सांगितले.या वेळी इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे, राष्ट्रवादीचे पुणे जिल्हाध्यक्ष जालिंदर कामठे, माजी आमदार अशोक टेकवडे, सुदाम इंगळे, जिल्हा बँकेचे संचालक दिगंबर दुर्गाडे, राष्ट्रवादीचे महिला पुणे जिल्हाध्यक्षा वैशाली नागवडे, जि. प. सभापती सारिका इंगळे, तालुकाध्यक्ष शिवाजी पोमण, विराज काकडे, माजी सभापती गौरी कुंजीर, माणिकराव झेंडे, सोमेश्वर कारखान्याचे संचालक मोहन जगताप, ईश्वर बागमार, बापू भोर, बाजीराव कुंजीर, गणेश होले, महादेव शेंडकर, जितेंद्र देवकर, विजय कुंजीर, राजेंद्र धुमाळ आदी उपस्थित होते.चारा छावण्या चालू व्हाव्यात, ही मागणी काही सरपंचांनी केली. यावर प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी करून शासनाला अहवाल सादर केला आहे. संबंधित सरपंच व पदाधिकारी यांना बोलावून निर्णय घेतला जाईल.पुरंदर उपसामधून सोडले जाणारे पाणी अतिशय दूषित झाल्यामुळे आरोग्याचा धोका संभवतो. त्यामुळे फिल्टर प्लान्ट शिंदेवाडी येथे बसविण्यात यावा, अशी मागणी माजी आमदार अशोक टेकवडे यांनी केली. यावर राज्यशासनाकडे पाठपुरावा करू, असे आश्वासन दिले.महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या योजना उद्भव चुकल्यामुळे बंद पडल्या आहेत. सदर योजना कार्यान्वित झाल्यास पाणीटंचाईची तीव्रता कमी होईल, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य विराज काकडे व पदाधिकाऱ्यांनी केली. सदर योजनांचा नव्याने सर्व्हे करून कार्यान्वित करण्याच्या सूचना दिल्या.