केंदूर : केंद्र सरकारने कांदा व बटाटा जीवनावश्यक वस्तूंच्या यादीत टाकून व निर्यातमूल्य वाढवून शेतक:यांची मोठी अडचण केली आहे. शासनाच्या या निर्णयाने शेतकरीवर्गात संतापाची लाट निर्माण झाली आहे.
शासनाच्या या निर्णयानंतर खैरे यांनी शिरूर तालुक्यातील कांदा उत्पादक शेतक:यांशी संवाद साधला असता, शेतक:यांमध्ये निर्णय विरोधी वातावरण आहे. यास योग्य हमीभाव न दिल्यास आंदोलन करण्याचा इशारा शेतक:यांनी दिला आहे. कांदा व बटाटा शेतक:यांचे नगदी पीक असून, याच पिकाच्या उत्पादनावर शेतक:याच्या संसाराचे आर्थिक अंदाजपत्रक अवलंबून असते. शासनाच्या अशा धोरणामुळे जानेवारी ते मेदरम्यान कांदा हा मातीमोल दरानेच विकला जात आहे.
शेतक:यांना आधुनिक वखारीत साठा करता येत नसल्याने याचा फायदा व्यापारीवर्गाला होत आहे. त्यामुळे कांदा व बटाटय़ाच्या उत्पादन खर्चाचा विचार करून शेतक:यांना बाजारभाची शाश्वती देऊन दोन ते तीन हजारांचा हमी भाव देण्याची मागणीही त्यांनी केली. (वार्ताहर)
4कांदा व बटाटा जीवनावश्यक वस्तुंच्या यादीत टाकण्याच्या सरकारच्या निर्णयाने शेतकरी वर्गात संतापाची लाट निर्माण झाली आहे. या निर्णयाचा फेरविचार करून कांदा व बटाटय़ाला उत्पादन खर्चाचा विचार करून हमी भाव द्यावा व निर्यातमूल्य घटवावे; अन्यथा शेतकरी रस्त्यावर उतरतील, असा इशारा शेतकरी संघर्ष समितीचे नेते बाळासाहेब खैरे यांनी दिला आहे.
4कांदा जीवनावश्यक नसल्याने शासनाने कांद्याचा व बटाटय़ाचा या यादीत समावेश करण्याचा हा निर्णय अपूर्ण माहितीने घेतला आहे. उत्पादक शेतक:यांची कैफियत शासनाने समजून घेतली नाही, हा निर्णय म्हणजे शेतक:यांची अडवणूक करणारा आहे. शासनाने हा निर्णय मागे घ्यावा अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.