शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

परीक्षा देणा-यांनाही मिळणार एमबीएला प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 04:27 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे: बनावट गुणपत्रिका सादर करून एमबीए अभ्यासक्रमास प्रवेश मिळवणे, गुणपत्रिका पडताळणीसाठी आॅनलाइन सुविधा उपलब्ध न ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे: बनावट गुणपत्रिका सादर करून एमबीए अभ्यासक्रमास प्रवेश मिळवणे, गुणपत्रिका पडताळणीसाठी आॅनलाइन सुविधा उपलब्ध न करून देणे आदी कारणांमुळे अ‍ॅटमा,जी मॅट, मॅट आणि झॅट या चार खासगी प्रवेश परीक्षांद्वारे महाराष्ट्रात प्रवेश घेण्यावर उच्च व तंत्र शिक्षण विभागाने घातलेली बंदी मुंबई उच्च न्यायालयाने उठवली आहे. त्यामुळे आता या चारही परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांच्या ‘एमबीए/ एमएमएस’ अभ्यासक्रमाच्या प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला आहे.

राज्याच्या प्रवेश परीक्षा कक्षातर्फे राज्यातील ‘एमबीए/एमएमएस’ची प्रवेश प्रक्रिया राबविली जाते. एमबीए सेट सह ‘कॅट’, ‘सीमॅट’ या शासकीय परीक्षांसह खासगी संस्थांतर्फे जीमॅट, झॅट, मॉट आणि अ‍ॅटमा या चार परीक्षांचाही अंतर्भाव आहे. परंतु, राज्यात २०१८-१९ या शैक्षणिक वर्षात २६ विद्यार्थ्यांनी तर २०१९-२० मध्ये २९ विद्यार्थ्यांनी अ‍ॅमाची बनावट गुणपत्रिका देऊन प्रवेश घेतला होता. पुण्यात बनावट गुणपत्रिका सादर करून पाच विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता. त्यामुळे खासगी संस्थांद्वारे घेतल्या जाणा-या प्रवेश परीक्षेतून राज्यात एमबीए अभ्यासक्रमास प्रवेश दिले जाणार नसल्याचे उच्च व तंत्र शिक्षण विभागाने स्पष्ट केले होते.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. पराग काळकर म्हणाले, खासगी संस्थांच्या परीक्षा देणारे बरेच विद्यार्थी हे परराज्यातील असतात. परंतु, या विद्यार्थ्यांनी शासकीय परीक्षा न दिल्यामुळे पुण्यासह राज्यातील इतर व्यवस्थापन संस्थांमध्ये त्यांना प्रवेश घेता येत नव्हता. त्यामुळे शैक्षणिक संस्थांचेही नुकसान होत होते. एआयसीटीईने निर्देश देऊनही तंत्र शिक्षण विभागाने याबबात निर्णय घेतला नव्हता. मात्र, उच्च न्यायालयाने याबाबत निर्णय दिल्याने अ‍ॅटमा, जी मॅट, मॅट आणि झॅट या चार खासगी संस्थांच्या प्रवेश परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांचा राज्यातील प्रवेशचा मार्ग मोकळा झाला आहे.

-------------------

एमबीए अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना आता अधिक परीक्षांचे पर्याय उपलब्ध होतील.त्यामुळे विद्यार्थी चांगले गुण मिळवून दर्जेदार संस्थेत प्रवेश घेऊ शकतील.तसेच शैक्षणिक संस्थांनाही अधिकाधिक विद्यार्थी मिळतील.

- रवी चिटणीस, प्र-कुलगुरू, एमआयटी