शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

परीक्षा रद्दचा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:10 IST

पुणे : राज्य शासनाने इयत्ता दहावीच्या परीक्षा रद्द करून अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे निकाल जाहीर करण्याचा निर्णय घेतल्यामुळे विद्यार्थ्यांच्या एकूण ...

पुणे : राज्य शासनाने इयत्ता दहावीच्या परीक्षा रद्द करून अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे निकाल जाहीर करण्याचा निर्णय घेतल्यामुळे विद्यार्थ्यांच्या एकूण शैक्षणिक भवितव्यावर परिणाम होणार आहे. तसेच दहावीच्या परीक्षेनंतर वाढणा-या आत्मविश्वासला अनेक विद्यार्थी मुकणार आहेत, असे शिक्षण तज्ज्ञांकडून सांगितले जात आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाला इयत्ता दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घ्यावा लागला. परंतु, या निर्णयाचे अनेक उलटसुलट परिणाम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्यावर होणार आहेत. ''परीक्षा रद्द झाली तेव्हापासून अभ्यासावरील मन उडाले'', असे कारण सांगत काही विद्यार्थी आपले अपयश झाकण्याचा प्रयत्न पुढील काळात करताना दिसतील, असेही मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

राज्याचे माजी प्राथमिक शिक्षण संचालक डॉ. गोविंद नांदेडे म्हणाले, दहावीची परीक्षा विद्यार्थ्यांच्या बौद्धिक आणि भावनिक सामर्थ्याचे सुयोग्य व्यवस्थापन करते. तर्क अनुमान, ज्ञान आणि आकलनाला ती सामर्थ्यशाली करते. परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थी व्यक्तिमत्वाला जो भक्कम पायावर आधार मिळायला हवा होता त्यापासून तो वंचित राहिला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा कमकुवत होणारा आत्मविश्वास कोरोनानंतर विविध उपक्रमांच्या माध्यमातून भक्कम पायावर उभा करावा लागेल.

ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. अ. ल. देशमुख म्हणाले, सतरा नंबरचा अर्ज भरून परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांच्या निकालाबाबत अडचणी येऊ शकतात. परीक्षा रद्द झाल्याने महत्त्वाकांक्षी विद्यार्थ्यांच्या मनात निराशा निर्माण झाली आहे, ती दूर करता येणार नाही. काही विद्यार्थी पुढील शैक्षणिक जीवनात येणारे अपयश याचे खापर कोरोनामुळे रद्द झालेल्या दहावीच्या परीक्षांवर सोपवणार आहेत. अभ्यासामध्ये मागे असणा-या विद्यार्थ्यांना सवय लागून जाईल की आपण काहीही केले नाही तरी आपण पुढे जातो. ही मानसिकता समाजासाठी घातक आहे.

-----------------

परीक्षा रद्दमुळे विद्यार्थी केवळ एका इयत्तेतून दुसऱ्या इयत्तेत गेले आहेत. त्यांना मी कुठे आहे, हे समजण्याची संधीच मिळाली नाही. त्यामुळे शर्यतीत उतरून स्वतःची क्षमता दाखवण्यापासून विद्यार्थी मुकले आहेत. त्याचा निश्चितच त्यांच्या शैक्षणिक भवितव्यावर परिणाम होईल.

- एन. के. जरग, माजी माध्यमिक शिक्षण संचालक, महाराष्ट्र राज्य