शहरं
Join us  
Trending Stories
1
“युद्धाची गरजच भासणार नाही, एक दिवस POKतील जनता म्हणेल की आम्ही भारतवासी आहोत”: राजनाथ सिंह
2
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
3
नेपाळ, फ्रान्सनंतर आता फिलिपिन्समध्येही भडका! लोक रस्त्यावर; धुमश्चक्रीत ९५ पोलीस जखमी, २१६ जणांना अटक
4
५ कपन्यांमधील हिस्सा विकण्याच्या विचारात मोदी सरकार! लिस्ट मध्ये आहेत या सरकारी कंपन्यांची नावं
5
इस्रायल-अमेरिकेचं टेन्शन वाढलं; इराणने १० हजार किमीपर्यंत मारा करणाऱ्या ICB मिसाईलची केली चाचणी
6
अशी धुलाई कधीच पाहिली नव्हती...; अभिषेक शर्माच्या फटकेबाजीनंतर पाकिस्तानी पत्रकाराची कबुली
7
परदेशी उपग्रहाच्या हालचालींवर भारताची करडी नजर; ५० बॉडीगार्ड उपग्रहांची तयारी
8
'मला बायको हवीय, माझं लग्न लावून द्या,कारण…’, तरुणाने थेट पंचायत समितीला दिलं पत्र, त्यानंतर...
9
Navratri 2025: नवरात्रीत अनवाणी चालण्याची प्रथा कशी सुरू झाली? खरंच लाभ होतो का?
10
भारतीय सैन्याने पाडलेले...श्रीनगरमधील डल सरोवरात सापडले पाकिस्तानचे 'फुसकी' क्षेपणास्त्र
11
खळबळजनक! बंद फ्लॅटमध्ये ३ दिवसांपासून पडून होता आईचा मृतदेह, शेजारी बसलेला मुलगा
12
नवरात्री २०२५: विलक्षण, अद्भूत, आत्मबोधाचे अनोखे पर्व नवरात्र; पाहा, नवदुर्गांचे महात्म्य
13
प्रणित मोरेला पाहून काजोलने विचारलं, 'हा कोण?', सलमानचं उत्तर ऐकून झाली शॉक; म्हणाली...
14
हेल्थ घ्या किंवा टर्म इन्शुरन्स, आता शून्य GST; ₹३०,००० च्या प्रीमिअमवर वाचतील ५४०० रुपये
15
टी-२० मध्ये सुपरफास्ट ५० षटकार; भारताचा अभिषेक शर्मा यादीत अव्वल, सूर्यकुमार टॉप-५ मध्ये!
16
नवरात्रीच्या मुहूर्तावर सोने खरेदीवर भरघोस ऑफर्स; मेकिंग चार्जवर ५०% सूट आणि फ्री सोन्याचे नाणे
17
ऐकावं ते नवलच! 'या' शहरात हिल्स घालून फिरायला घ्यावी लागते सरकारची परवानगी
18
नवरात्री २०२५: ९ गोष्टी अजिबात करू नका, नवदुर्गांची वक्रदृष्टी-अवकृपा संभव; चूक घडलीच तर...
19
भारतीय IT कंपन्यांवर नवं संकट! ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे दरवर्षी होणार कोट्यवधींचा खर्च, नोकऱ्यांवर गदा?
20
डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST?

परीक्षा रद्दचा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:10 IST

पुणे : राज्य शासनाने इयत्ता दहावीच्या परीक्षा रद्द करून अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे निकाल जाहीर करण्याचा निर्णय घेतल्यामुळे विद्यार्थ्यांच्या एकूण ...

पुणे : राज्य शासनाने इयत्ता दहावीच्या परीक्षा रद्द करून अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे निकाल जाहीर करण्याचा निर्णय घेतल्यामुळे विद्यार्थ्यांच्या एकूण शैक्षणिक भवितव्यावर परिणाम होणार आहे. तसेच दहावीच्या परीक्षेनंतर वाढणा-या आत्मविश्वासला अनेक विद्यार्थी मुकणार आहेत, असे शिक्षण तज्ज्ञांकडून सांगितले जात आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाला इयत्ता दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घ्यावा लागला. परंतु, या निर्णयाचे अनेक उलटसुलट परिणाम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्यावर होणार आहेत. ''परीक्षा रद्द झाली तेव्हापासून अभ्यासावरील मन उडाले'', असे कारण सांगत काही विद्यार्थी आपले अपयश झाकण्याचा प्रयत्न पुढील काळात करताना दिसतील, असेही मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

राज्याचे माजी प्राथमिक शिक्षण संचालक डॉ. गोविंद नांदेडे म्हणाले, दहावीची परीक्षा विद्यार्थ्यांच्या बौद्धिक आणि भावनिक सामर्थ्याचे सुयोग्य व्यवस्थापन करते. तर्क अनुमान, ज्ञान आणि आकलनाला ती सामर्थ्यशाली करते. परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थी व्यक्तिमत्वाला जो भक्कम पायावर आधार मिळायला हवा होता त्यापासून तो वंचित राहिला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा कमकुवत होणारा आत्मविश्वास कोरोनानंतर विविध उपक्रमांच्या माध्यमातून भक्कम पायावर उभा करावा लागेल.

ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. अ. ल. देशमुख म्हणाले, सतरा नंबरचा अर्ज भरून परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांच्या निकालाबाबत अडचणी येऊ शकतात. परीक्षा रद्द झाल्याने महत्त्वाकांक्षी विद्यार्थ्यांच्या मनात निराशा निर्माण झाली आहे, ती दूर करता येणार नाही. काही विद्यार्थी पुढील शैक्षणिक जीवनात येणारे अपयश याचे खापर कोरोनामुळे रद्द झालेल्या दहावीच्या परीक्षांवर सोपवणार आहेत. अभ्यासामध्ये मागे असणा-या विद्यार्थ्यांना सवय लागून जाईल की आपण काहीही केले नाही तरी आपण पुढे जातो. ही मानसिकता समाजासाठी घातक आहे.

-----------------

परीक्षा रद्दमुळे विद्यार्थी केवळ एका इयत्तेतून दुसऱ्या इयत्तेत गेले आहेत. त्यांना मी कुठे आहे, हे समजण्याची संधीच मिळाली नाही. त्यामुळे शर्यतीत उतरून स्वतःची क्षमता दाखवण्यापासून विद्यार्थी मुकले आहेत. त्याचा निश्चितच त्यांच्या शैक्षणिक भवितव्यावर परिणाम होईल.

- एन. के. जरग, माजी माध्यमिक शिक्षण संचालक, महाराष्ट्र राज्य