शहरं
Join us  
Trending Stories
1
...म्हणून तर आज सीमेवर शांतता नव्हती ना? भारत-पाकिस्तान युद्धविरामावर DGMO आज चर्चा करणार
2
India Pakistan War :"हमने भेजे कश्मीर में मुजाहिद...", दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारावेळी नमाज पठण करणाऱ्या अब्दुल रौफच्या व्हिडिओने पाकिस्तानचा पर्दाफाश
3
मृत्यूने गाठण्यापूर्वी 'ती' "मला जगायचंय" एवढेच म्हणत राहिली अन् अखेरचा घेतला श्वास
4
ट्रम्पनी म्हटलं खूप छान, चीननं केलं उलट काम; असं काय चाललंय ज्याचा भारतावर थेट होऊ शकतो परिणाम?
5
India Pakistan War:भारत - पाकिस्तानमधील तणाव निवळतोय, रात्री कोणताही हल्ला झाला नाही; लष्कराने दिली माहिती
6
वडिलांना लग्नाला का बोलावलं नाही? प्रतीकने अखेर खरं कारण सांगितलंच, म्हणाला- "आईची इच्छा होती की..."
7
भारत-पाकिस्तान तणाव कमी करण्यासाठी अमेरिकेनं खरंच मध्यस्थी केली? जाणून घ्या, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
8
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
9
मुलांसाठी Post Office ची खास स्कीम, गॅरंटीड रिटर्न; विमा कव्हरसह बोनसही, अनेकांना याबद्दल कल्पनाही नाही
10
कुठलाही भारतीय पायलट ताब्यात नाही, आमच्या एका विमानाचं नुकसान; पाक लष्कराची कबुली
11
आजचे राशीभविष्य १२ मे २०२५ : हरवलेली वस्तू अचानकपणे सापडेल, कोणाच्या नशिबात काय...
12
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
13
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
14
हेअर ट्रान्सप्लांट करणं इंजिनिअरच्या जीवावर बेतलं; इंफेक्शनमुळे मृत्यू, डॉक्टरवर गुन्हा दाखल
15
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
16
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
17
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
18
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
19
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
20
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू

पालिकेकडे माहिती अधिकारात रोज ४५ अर्ज

By admin | Updated: June 15, 2015 06:10 IST

माहिती अधिकार कायद्यांतर्गत दररोज सरासरी ४५ अर्ज महापालिकेमध्ये दाखल होत आहेत. या अर्जातून विचारल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या स्वरूपाच्या माहितीमुळे

दीपक जाधव, पुणेमाहिती अधिकार कायद्यांतर्गत दररोज सरासरी ४५ अर्ज महापालिकेमध्ये दाखल होत आहेत. या अर्जातून विचारल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या स्वरूपाच्या माहितीमुळे प्रत्येक निर्णय नियम व कायद्याच्या चौकटीत बसवून घेण्याची दक्षता पालिकेतील अधिकारी व कर्मचारी घेऊ लागले. तसेच त्याचा वैयक्तिक फायद्यासाठी वापर करण्याचे प्रमाणही जास्त असल्याचे दिसून येत आहे. गोपनियतेच्या नावाखाली माहिती दडवून भ्रष्टाचार, फसवणूक करणाऱ्या शासकीय अधिकारी व कर्मचारी, लोकप्रतिनिधी यांच्यावर अंकुश राहावा, या हेतूने १५ जून २००५ रोजी संसदेमध्ये ऐतिहासिक अशा ‘महिती अधिकार अधिनियम २००५’ या विधेयकास मंजुरी देण्यात आली. त्यानंतर उर्वरित प्रक्रिया पार पाडून १२ आॅक्टोबरपासून या कायद्याची अंमलबजावणी सुरू झाली.प्रशासनाला रीतसर जाब विचारण्याचे हत्यारच या कायद्यामुळे सर्वसामान्य जनतेस उपलब्ध झाले. एखादे काम का झाले नाही, याची विचारणा करण्यासाठी गेलेल्या सर्वसामान्य नागरिकांना उर्मटपणे उत्तरे देऊन हुसकावून लावण्याचे प्रकार सर्रास शासकीय कार्यालयांमधून घडत होते. माहिती अधिकार कायद्याची अंमलबजावणी झाल्यानंतर त्याला जोरदार चाप बसला आहे. अनेक गैरव्यवहार करूनही ते शासकीय कागदपत्रांमध्ये दडून राहत होते, त्याला वाचा फोडण्यास माहिती अधिकाराने सुरुवात झाली.महापालिकेच्या विविध विभागांशी जनतेचा दररोजचा संबंध येतो. विविध प्रकारचे दाखले, परवानग्या मिळविण्यासाठी त्यांना महापालिकेत यावे लागते. माहिती अधिकारांतर्गत काम करणाऱ्या सजग नागरिक मंच, सुराज्य संघर्ष समिती, लोकहित फाउंडेशन या संघटनांच्या जागरूकतेमुळे माहिती अधिकारी अंमलबजावणी पुणे महापालिकेमध्ये व्यवस्थितपणे करणे प्रशासनाला भाग पडले. माहिती अधिकार कायद्यांतर्गत जागृती निर्माण झाल्यानंतर महापालिकेमध्ये माहिती अधिकारांतर्गत अर्जांची संख्या वेगाने वाढू लागली. स्वयंसेवी संघटनांकडून जनतेच्या व्यापक हिताच्या प्रश्नावर माहिती मागविली जात होती. त्याचबरोबर वैयक्तिक अडचणी, हितसंबंध यासाठी माहिती मागविण्याच्या प्रमाणात वाढ झाली.