शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
5
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
6
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
7
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
8
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
9
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
10
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
11
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
12
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
13
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
14
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
15
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
16
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
17
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
18
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
19
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
20
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?

धरणग्रस्तांना प्रत्येकी चार एकर

By admin | Updated: March 26, 2017 01:49 IST

मावळ तालुक्यातील पवना धरणातील धरणग्रस्त खातेदारांना प्रत्येकी चार एकर जमीन देऊन पुनर्वसन करण्याचा आदेश

काले : मावळ तालुक्यातील पवना धरणातील धरणग्रस्त खातेदारांना प्रत्येकी चार एकर जमीन देऊन पुनर्वसन करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिला असल्याची माहिती पवना धरणग्रस्त कृती समितीचे अध्यक्ष मुकुंदराज काऊर यांनी दिली.न्यायालयात सादर केलेल्या कागदपत्रांनुसार, पवना प्रकल्प १९६५मध्ये सुरू झाला. त्या वेळी पुनर्वसन कायदा अस्तित्वात नव्हता. परंतु शासनाच्या धोरणानुसार २९ सप्टेंबर १९६९ व ३१ आॅक्टोबर व ९ मे १९७३ या दिवशी घेतलेल्या प्रशासकीय प्रस्तावानुसार एकूण विस्थापितांपैकी काही विस्थापितांना प्रत्येकी चार एकर जमिनी देऊन त्याचे पुनर्वसन केले व संपादनातील मोबदला दिला गेला आहे. यानंतरच्या काळात सन २०१० मध्ये उर्वरित प्रकल्पग्रस्तांसाठी एक एकर जमीन देऊन पुनर्वसन करण्याचे नवे धोरण ठरवले. परंतु या एक एकर जमिनीची कब्जा हक्क रक्कम म्हणून शासकीय मूल्यांकन धोरणानुसार ठरलेल्या किमतीपैकी ५० टक्के रक्कम भरणे ही अट सूचित केली. याचिका दाखल करणाऱ्यांना प्रकल्पासाठी भूसंपादनाच्या वेळी दिलेला भूसंपादनाचा मोबादला किंमत कैकपटीने कमी होती. अशा अनेक कारणास्तव त्यांना आकारण्यात आलेल्या किमतीचे पैसे भरणे शक्य नाही. पूर्वी पुनर्वसन केलेल्या शासकीय धोरणानुसार उर्वरित खातेदारांचे पुनर्वसन करावे, अशी मागणी कृती समितीच्या वतीने केली होती. उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. (वार्ताहर)