शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

धरणग्रस्तांना प्रत्येकी चार एकर

By admin | Updated: March 26, 2017 01:49 IST

मावळ तालुक्यातील पवना धरणातील धरणग्रस्त खातेदारांना प्रत्येकी चार एकर जमीन देऊन पुनर्वसन करण्याचा आदेश

काले : मावळ तालुक्यातील पवना धरणातील धरणग्रस्त खातेदारांना प्रत्येकी चार एकर जमीन देऊन पुनर्वसन करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिला असल्याची माहिती पवना धरणग्रस्त कृती समितीचे अध्यक्ष मुकुंदराज काऊर यांनी दिली.न्यायालयात सादर केलेल्या कागदपत्रांनुसार, पवना प्रकल्प १९६५मध्ये सुरू झाला. त्या वेळी पुनर्वसन कायदा अस्तित्वात नव्हता. परंतु शासनाच्या धोरणानुसार २९ सप्टेंबर १९६९ व ३१ आॅक्टोबर व ९ मे १९७३ या दिवशी घेतलेल्या प्रशासकीय प्रस्तावानुसार एकूण विस्थापितांपैकी काही विस्थापितांना प्रत्येकी चार एकर जमिनी देऊन त्याचे पुनर्वसन केले व संपादनातील मोबदला दिला गेला आहे. यानंतरच्या काळात सन २०१० मध्ये उर्वरित प्रकल्पग्रस्तांसाठी एक एकर जमीन देऊन पुनर्वसन करण्याचे नवे धोरण ठरवले. परंतु या एक एकर जमिनीची कब्जा हक्क रक्कम म्हणून शासकीय मूल्यांकन धोरणानुसार ठरलेल्या किमतीपैकी ५० टक्के रक्कम भरणे ही अट सूचित केली. याचिका दाखल करणाऱ्यांना प्रकल्पासाठी भूसंपादनाच्या वेळी दिलेला भूसंपादनाचा मोबादला किंमत कैकपटीने कमी होती. अशा अनेक कारणास्तव त्यांना आकारण्यात आलेल्या किमतीचे पैसे भरणे शक्य नाही. पूर्वी पुनर्वसन केलेल्या शासकीय धोरणानुसार उर्वरित खातेदारांचे पुनर्वसन करावे, अशी मागणी कृती समितीच्या वतीने केली होती. उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. (वार्ताहर)