शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

अखेर १७ गावांची तहान भागली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2016 01:08 IST

मोरगाव प्रादेशिक योजनेच्या जलवाहिनीतून बारामतीच्या जिरायती भागातील १७ गावांना पाच दिवसांनंतर अखेर बुधवारी (दि. २०) पाणी मिळाले

मोरगाव : मोरगाव प्रादेशिक योजनेच्या जलवाहिनीतून बारामतीच्या जिरायती भागातील १७ गावांना पाच दिवसांनंतर अखेर बुधवारी (दि. २०) पाणी मिळाले. मागील पाच दिवसांपासून ग्रामस्थांचे होणारे हाल थांबल्याने सुटकेचा नि:श्वास टाकला. ही जलवाहिनी फुटल्याने १७ गावे व १० वाड्यांना पाणीपुरवठा करणे जिकिरीचे झाले होते. त्यात येथे टँकर नसल्याने पाण्याचा प्रश्न गंभीर झाला होता. मोरगाव प्रादेशिक नळ योजनेवरील नवीन जलवाहिनीवर आंबी बु., आंबी खुर्द, जोगवडी, भोंडवेवाडी, चांदगुडेवाडी, सुपा, मोरगाव, तरडोली, लोणीभापकर, अंजनगाव, कऱ्हावागज, जळगाव भिलारवाडी, बाबुर्डी, काऱ्हाटी ही १७ गावे आहेत, तर जुन्या जलवाहिनीवर मासाळवाडी, लोणी पाटी, गोलांडेवस्ती क्र. १, क्र. २, बोरावकेमळा, लोणकरमळा, बारवकरमळा आदी वाड्या अवलंबून आहेत. > या जलवाहिन्यांमधून नाझरे जलाशयातून दिवसाआड पाणी पुरवठा होतो. मात्र, नाझरे येथे नवीन जलवाहिनी फुटल्याने व मोरगाव येथे जलवाहिनीचा जोड निसटल्याने पाच दिवस येथील ग्रामस्थांना पाणी पाणी करावे लागले होते. पिण्यासाठी, जनावरांसाठी पाणी नसल्याने ग्रामस्थ पाण्यासाठी वनवन फिरत होते. हातपंप, विहिरी, कुपनलिका कोरड्या असल्याने वरील सर्व गावांमध्ये पाणीप्रश्न गंभीर झाला होता. त्यातच गावोगावी अद्याप टँकर मिळत नसल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी आहे. अखेर तब्बल पाच दिवसांनी आज पाणी आल्याने ग्रामस्थांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. नाझरे जलाशयातून पाणी मिळणार असल्याने काही प्रमाणात प्रश्न सुटेल.> टँकर बंद; ग्रामस्थांचे हाल पारवडी : परिसरातील मागील ३ दिवसांपासून वाड्या-वस्त्यांवरील टँकर बंद असल्याने वाड्या-वस्त्यांवर तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. येथील शेतकऱ्याने ओढ्याच्या बंधाऱ्यातील बेकायदा उपसा केल्याने पाणीपुरवठा विहिरीचे पाणी आटले आहे. त्यामुळे पाण्याचा प्रश्न गंभीर झाला होता. त्यावर येथे टँकरही सुरू करण्यात आला. मात्र, तीन दिवसांपासून टँकर बंद झाल्याने ग्रामस्थांचे पाण्यासाठी हाल सुरू झाले आहेत. त्यामुळे भाड्याने वाहन ठरवून ग्रामस्थ बाहेर गावाहून पाणी आणत आहेत. मागील आठवड्यापासून सुरू आसलेले पाणी टँकर गावठाण वगळता वाड्या-वस्त्यांवरील टँकर पूर्णपणे बंद आहेत. त्यामुळे वाड्या-वस्तींवर तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. याला पर्यायी व्यवस्था म्हणून ग्रामस्थांनी पैसे मोजून पाणी वाहत आहेत.