शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

अखेर १७ गावांची तहान भागली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2016 01:08 IST

मोरगाव प्रादेशिक योजनेच्या जलवाहिनीतून बारामतीच्या जिरायती भागातील १७ गावांना पाच दिवसांनंतर अखेर बुधवारी (दि. २०) पाणी मिळाले

मोरगाव : मोरगाव प्रादेशिक योजनेच्या जलवाहिनीतून बारामतीच्या जिरायती भागातील १७ गावांना पाच दिवसांनंतर अखेर बुधवारी (दि. २०) पाणी मिळाले. मागील पाच दिवसांपासून ग्रामस्थांचे होणारे हाल थांबल्याने सुटकेचा नि:श्वास टाकला. ही जलवाहिनी फुटल्याने १७ गावे व १० वाड्यांना पाणीपुरवठा करणे जिकिरीचे झाले होते. त्यात येथे टँकर नसल्याने पाण्याचा प्रश्न गंभीर झाला होता. मोरगाव प्रादेशिक नळ योजनेवरील नवीन जलवाहिनीवर आंबी बु., आंबी खुर्द, जोगवडी, भोंडवेवाडी, चांदगुडेवाडी, सुपा, मोरगाव, तरडोली, लोणीभापकर, अंजनगाव, कऱ्हावागज, जळगाव भिलारवाडी, बाबुर्डी, काऱ्हाटी ही १७ गावे आहेत, तर जुन्या जलवाहिनीवर मासाळवाडी, लोणी पाटी, गोलांडेवस्ती क्र. १, क्र. २, बोरावकेमळा, लोणकरमळा, बारवकरमळा आदी वाड्या अवलंबून आहेत. > या जलवाहिन्यांमधून नाझरे जलाशयातून दिवसाआड पाणी पुरवठा होतो. मात्र, नाझरे येथे नवीन जलवाहिनी फुटल्याने व मोरगाव येथे जलवाहिनीचा जोड निसटल्याने पाच दिवस येथील ग्रामस्थांना पाणी पाणी करावे लागले होते. पिण्यासाठी, जनावरांसाठी पाणी नसल्याने ग्रामस्थ पाण्यासाठी वनवन फिरत होते. हातपंप, विहिरी, कुपनलिका कोरड्या असल्याने वरील सर्व गावांमध्ये पाणीप्रश्न गंभीर झाला होता. त्यातच गावोगावी अद्याप टँकर मिळत नसल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी आहे. अखेर तब्बल पाच दिवसांनी आज पाणी आल्याने ग्रामस्थांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. नाझरे जलाशयातून पाणी मिळणार असल्याने काही प्रमाणात प्रश्न सुटेल.> टँकर बंद; ग्रामस्थांचे हाल पारवडी : परिसरातील मागील ३ दिवसांपासून वाड्या-वस्त्यांवरील टँकर बंद असल्याने वाड्या-वस्त्यांवर तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. येथील शेतकऱ्याने ओढ्याच्या बंधाऱ्यातील बेकायदा उपसा केल्याने पाणीपुरवठा विहिरीचे पाणी आटले आहे. त्यामुळे पाण्याचा प्रश्न गंभीर झाला होता. त्यावर येथे टँकरही सुरू करण्यात आला. मात्र, तीन दिवसांपासून टँकर बंद झाल्याने ग्रामस्थांचे पाण्यासाठी हाल सुरू झाले आहेत. त्यामुळे भाड्याने वाहन ठरवून ग्रामस्थ बाहेर गावाहून पाणी आणत आहेत. मागील आठवड्यापासून सुरू आसलेले पाणी टँकर गावठाण वगळता वाड्या-वस्त्यांवरील टँकर पूर्णपणे बंद आहेत. त्यामुळे वाड्या-वस्तींवर तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. याला पर्यायी व्यवस्था म्हणून ग्रामस्थांनी पैसे मोजून पाणी वाहत आहेत.