शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

शाळा बंद असून देखील कोपीवर मिळते शिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:13 IST

सोमेश्वरनगर: कोरोना साथरोगामुळे शाळा बंद आहेत. साखर कारखाना परिसरात ऊसतोड मजुरांच्या मुलांना देखील पालकांच्या मागे यावे लागले. कोरोनाची ...

सोमेश्वरनगर: कोरोना साथरोगामुळे शाळा बंद आहेत. साखर कारखाना परिसरात ऊसतोड मजुरांच्या मुलांना देखील पालकांच्या मागे यावे लागले. कोरोनाची भीती वाटत होती. शाळा बंद असून देखील काही समाजसेवा संस्थांच्या माध्यमतून या मजुरांची मुले शिक्षण घेत आहे. शाळा बंद असली तरी आपली मुले शिकत असल्याचे पाहून समाधान वाटत असल्याचे विष्णू सुळे आणि आजिनाथ सुळे या मुळच्या बीड येथील पालकांनी सांगितले.

सोमेश्वर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात ऊसतोड कामगारांच्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शालेय शिक्षण विभाग व टाटा ट्रस्टस मुंबई, जनसेवा ग्रामीण विकास व शिक्षण प्रतिष्ठान आणि सोमेश्वर सहकारी साखर कारखाना याच्या सहकार्याने ‘आशा प्रकल्प’ काम करत आहे. कोरोना काळात मुल शाळेपासून दुरावली जाऊ नये या करिता प्रकल्पाच्या माध्यमातून लेखन, वाचन उपक्रम तळावर राबवला जात आहे. दरवर्षी विदर्भ- मराठवाडा या भागातून ऊसतोड करण्यासाठी कारखान्याकडे स्थलांतर करत असतात. ऊसतोड करण्यासाठी येताना मुले गावाकडे नातेवाईक, वस्तीगृह अश्या ठिकाणी शाळेच्या सोयीसाठी ठेवत असतात. तर काहीची सोय होत नाही ते सोबत घेऊन येतात. परंतु यंदाच्या वर्षी कोरोनामुळे शाळा बंद असल्याने बहुतांश ऊसतोड कामगार मुलांना सोबत घेऊन आले आहेत.

शाळा सुरु असताना या ऊसतोड कामगारांच्या मुलांना नजिकच्या शाळेत दाखल करण्याचे काम प्रकल्पाच्या माध्यमातून करण्यात येत होते. शाळा बंद असल्याने या मुलांना शाळेत दाखल करणे अशक्य झाले. परंतु ‘आशा प्रकल्पाच्या’ माध्यमातून या मुलांना त्यांच्या कोपीवर जाऊन कार्यकर्ते मुलांना साक्षर करण्यासाठी धडे घेत आहेत. कार्यकर्ते हातातील कोयता बोधट करण्याच्या दृष्टीने ७८ तळावर जाऊन लेखन -वाचन वर्ग घेत आहेत. दरवर्षी सोमेश्वर कारखान्यावर मुले आली की, आशाचे कार्यकर्ते मुलाना शाळेत दाखल करत. आणि तळावर खेळ, गाणी, शैक्षणिक उपक्रम घेत. परंतु यंदा शाळा बंद असल्याने कोप्यावर जाऊन रात्रीच्या वेळी लेखन-वाचन उपक्रम राबत अभ्यास वर्ग घेऊन मुलांना साक्षर करण्यासाठी त्यांचे दूत बनले आहेत.

‘आशा प्रकल्पा’च्या माध्यमातून सोमेश्वर कारखान्यावर आलेल्या ऊसतोड कामगारांचे सर्वेक्षण करण्यात आले. यामध्ये १ हजार ८५३ कुटुंबाचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून अहमदनगर, औरंगाबाद , बीड, बुलडाणा ,धुळे जळगाव, जालना ,नंदुरबार ,नाशिक ,उस्मानाबाद ,परभणी ,पुणे ,रायगड ,सोलापूर, यवतमाळ या जिल्ह्यातील तर मध्यप्रदेश मधून सुद्धा ऊसतोड कामगार आले आहेत. मुलांचे केलेल्या सर्वेक्षणात ० ते १८ वयाची २२२७ मुले आढळून आली आहेत. यामध्ये ० ते ६ ची ७०५, ६ ते १४ ची १ हजार २५२ तर १५ ते १८ वयाची २७० मुले असल्याची सर्वेक्षणाअंती दिसून आले. ‘आशा प्रकल्पा’ ने गेल्या चार वर्षातील तुलनेत केलेल्या सर्वेक्षणात ६ ते १४ वयाची सर्वाधिक १ हजार २५२ मुले तळावर आढळून आली आहेत.