शहरं
Join us  
Trending Stories
1
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
2
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
3
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
4
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
5
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार
6
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत
7
"...तोपर्यंत मी तुरुंगात राहण्यास तयार आहे"; सोनम वांगचुक यांनी जोधपूरहून भावाकडे पाठवला मेसेज
8
INDW vs PAKW: अचानक मैदानात पसरला पांढरा धूर: भारत-पाक सामन्यात नेमकं काय घडलं?
9
IND W vs PAK W : पुरुष असो वा महिला, नो हँडशेक फॉर्म्युला! हरमनप्रीतनं पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ
10
‘’२०२७ चा वर्ल्डकप खेळायला मिळाला तर…’’, बोलता बोलता रोहित झाला होता भावूक, तो व्हिडीओ होतोय व्हायरल  
11
बिहारमध्ये केव्हा होणार विधानसभा निवडणूक? CEC ज्ञानेश कुमार यांची घोषणा; SIR संदर्भातही मोठं विधान
12
गुजरातमधून आणलेला सिंह तामिळनाडूच्या प्राणीसंग्रहालयातून पळाला; स्थानिकांमध्ये घबराट...
13
EMI थकवला तर फोन, लॅपटॉप होणार लॉक! RBI चा नवा नियम; कर्ज वसुलीसाठी बँकांना मिळणार 'हे' अधिकार
14
अनिल परबांचे आरोप, ज्योती रामदास कदम पहिल्यांदाच मीडियासमोर आल्या; आगीची घटना कशी घडली?
15
"केस ओढले, इस्रायलच्या ध्वजाला किस करायला लावलं"; ग्रेटा थनबर्गला अमानुष वागणुकीचा आरोप, प्रकरण काय?
16
अनर्थ टळला! लँडिंगपूर्वी एअर इंडिया विमानाचं RAT एक्टिव्ह; बर्मिघम रनवेवर विमान सुरक्षित उतरवलं
17
देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी खिशात किती कॅश ठेवतात? स्वतःच केला खुलासा
18
Nashik Crime: टोळी संघर्षातून गोळीबार, भाजप नेत्यानंतर म्होरक्या विकी वाघसह साथीदार अडकला जाळ्यात
19
रोहित शर्माला कर्णधार पदावरून हटवण्यामागचं 'गंभीर' कनेक्शन; जाणून घ्या सविस्तर
20
Rape Case: पार्टीसाठी बोलावलं, शिक्षकेवर चार जीम ट्रेनर्संनी केला सामूहिक बलात्कार; आरोपींची नावे आली समोर

शाळा बंद असून देखील कोपीवर मिळते शिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:13 IST

सोमेश्वरनगर: कोरोना साथरोगामुळे शाळा बंद आहेत. साखर कारखाना परिसरात ऊसतोड मजुरांच्या मुलांना देखील पालकांच्या मागे यावे लागले. कोरोनाची ...

सोमेश्वरनगर: कोरोना साथरोगामुळे शाळा बंद आहेत. साखर कारखाना परिसरात ऊसतोड मजुरांच्या मुलांना देखील पालकांच्या मागे यावे लागले. कोरोनाची भीती वाटत होती. शाळा बंद असून देखील काही समाजसेवा संस्थांच्या माध्यमतून या मजुरांची मुले शिक्षण घेत आहे. शाळा बंद असली तरी आपली मुले शिकत असल्याचे पाहून समाधान वाटत असल्याचे विष्णू सुळे आणि आजिनाथ सुळे या मुळच्या बीड येथील पालकांनी सांगितले.

सोमेश्वर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात ऊसतोड कामगारांच्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शालेय शिक्षण विभाग व टाटा ट्रस्टस मुंबई, जनसेवा ग्रामीण विकास व शिक्षण प्रतिष्ठान आणि सोमेश्वर सहकारी साखर कारखाना याच्या सहकार्याने ‘आशा प्रकल्प’ काम करत आहे. कोरोना काळात मुल शाळेपासून दुरावली जाऊ नये या करिता प्रकल्पाच्या माध्यमातून लेखन, वाचन उपक्रम तळावर राबवला जात आहे. दरवर्षी विदर्भ- मराठवाडा या भागातून ऊसतोड करण्यासाठी कारखान्याकडे स्थलांतर करत असतात. ऊसतोड करण्यासाठी येताना मुले गावाकडे नातेवाईक, वस्तीगृह अश्या ठिकाणी शाळेच्या सोयीसाठी ठेवत असतात. तर काहीची सोय होत नाही ते सोबत घेऊन येतात. परंतु यंदाच्या वर्षी कोरोनामुळे शाळा बंद असल्याने बहुतांश ऊसतोड कामगार मुलांना सोबत घेऊन आले आहेत.

शाळा सुरु असताना या ऊसतोड कामगारांच्या मुलांना नजिकच्या शाळेत दाखल करण्याचे काम प्रकल्पाच्या माध्यमातून करण्यात येत होते. शाळा बंद असल्याने या मुलांना शाळेत दाखल करणे अशक्य झाले. परंतु ‘आशा प्रकल्पाच्या’ माध्यमातून या मुलांना त्यांच्या कोपीवर जाऊन कार्यकर्ते मुलांना साक्षर करण्यासाठी धडे घेत आहेत. कार्यकर्ते हातातील कोयता बोधट करण्याच्या दृष्टीने ७८ तळावर जाऊन लेखन -वाचन वर्ग घेत आहेत. दरवर्षी सोमेश्वर कारखान्यावर मुले आली की, आशाचे कार्यकर्ते मुलाना शाळेत दाखल करत. आणि तळावर खेळ, गाणी, शैक्षणिक उपक्रम घेत. परंतु यंदा शाळा बंद असल्याने कोप्यावर जाऊन रात्रीच्या वेळी लेखन-वाचन उपक्रम राबत अभ्यास वर्ग घेऊन मुलांना साक्षर करण्यासाठी त्यांचे दूत बनले आहेत.

‘आशा प्रकल्पा’च्या माध्यमातून सोमेश्वर कारखान्यावर आलेल्या ऊसतोड कामगारांचे सर्वेक्षण करण्यात आले. यामध्ये १ हजार ८५३ कुटुंबाचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून अहमदनगर, औरंगाबाद , बीड, बुलडाणा ,धुळे जळगाव, जालना ,नंदुरबार ,नाशिक ,उस्मानाबाद ,परभणी ,पुणे ,रायगड ,सोलापूर, यवतमाळ या जिल्ह्यातील तर मध्यप्रदेश मधून सुद्धा ऊसतोड कामगार आले आहेत. मुलांचे केलेल्या सर्वेक्षणात ० ते १८ वयाची २२२७ मुले आढळून आली आहेत. यामध्ये ० ते ६ ची ७०५, ६ ते १४ ची १ हजार २५२ तर १५ ते १८ वयाची २७० मुले असल्याची सर्वेक्षणाअंती दिसून आले. ‘आशा प्रकल्पा’ ने गेल्या चार वर्षातील तुलनेत केलेल्या सर्वेक्षणात ६ ते १४ वयाची सर्वाधिक १ हजार २५२ मुले तळावर आढळून आली आहेत.