शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
2
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
3
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
4
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
5
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
6
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
7
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
8
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
9
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
10
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
11
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
12
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
13
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
14
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
15
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
16
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
17
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
18
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
19
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
20
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."

आजही २0 वर्षांपूर्वीच्या धोक्याचे सावट कायम

By admin | Updated: July 5, 2017 02:34 IST

जिल्ह्यात अनेक गावे भूस्खलनाच्या कोसळणाऱ्या संकटाच्या आपत्तीने घेरली गेली आहेत. खेड तालुक्यात भोमाळे, पदरवाडी, शेंदुर्ली, पाबे, नायफडच्या

अयाज तांबोळी / लोकमत न्यूज नेटवर्कडेहणे : जिल्ह्यात अनेक गावे भूस्खलनाच्या कोसळणाऱ्या संकटाच्या आपत्तीने घेरली गेली आहेत. खेड तालुक्यात भोमाळे, पदरवाडी, शेंदुर्ली, पाबे, नायफडच्या अनेक वाड्या कड्याखाली आहेत. ही गावे केव्हाही डोंगराच्या पोटात गायब होतील, अशी धोकादायक परिस्थिती आहे. भोमाळे गावात २0 वर्षांपूर्वी झालेल्या भूस्खलनाने गावाचा थरकाप उडाला होता. सुदैवाने या घटनेत जीवित हानी झाली नाही, परंतु तो धोका आजही कायम आहे. अनेक गावे अशीच कमकुवत डोंगराच्या पायथ्याशी वसलेली आहेत. या गावाला पुन्हा भूस्खलनाचा धोका निर्माण झाला आहे. तालुक्यातले भोमाळे, पदरवाडी, शेंदुर्ली, पाबे, नायफड च्या अनेक वाड्या, वांद्रेजवळ पंढरवाडी, तोरणे या गावांना भूस्खलनाचा धोका आहे. डोंगराच्या पायथ्याशी असल्याने त्या डोंगराच्या सुट्या झालेल्या धोकादायक कड्याखाली या गावांमधील शेकडो कुटुंबे मृत्यूची टांगती तलवार असतानाही राहत आहेत. भीमा व भामा खोऱ्यातली बहुतेक वाड्या कड्याखाली आहेत. भोमाळे गाव अदिवासी बहुल सुमारे ४५० लोकसंख्या असलेले गाव. अगदी पायथ्याशी भीमानदी तर डोक्यावर आ वासून उभा असलेला महाकाय आणि तेवढाच ढिसाळ कमकुवत डोंगर. ७० ते ७५ कुटुंबे कुशीत घेतलेल्या गावाने जुलै १९९५ मध्ये पहाटे कोसळलेल्या डोंगराच्या संकटाचा थरकाप उडवणारा अनुभव घेतला आहे. तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी या गावाला भेट दिली होती, त्यानंतर समिती नेमण्यात आली होती , पण गाव आजही त्याच परिस्थितीत आहे. ]भोमाळेचा सर्व्हे होऊन वीस वर्षे झाली, आम्ही लहान होतो, आतापण माळीणनंतर एकदा समिती आली होती, पुनर्वसन करण्यात येईल असे सांगितले. भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेकडून २३ गावांमध्ये भोमाळेपण आहे . जिल्हाधिकाऱ्यांची जीएसआय कमिटी येणार होती, पण दोन वर्षांत इकडे कोणी फिरकले नाही. या धोकादायक गावांचे पुनर्वसन व उपाययोजना करण्यात याव्यात हीच अपेक्षा आहे.- मनोहर शिंदे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष, भोमाळे