शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
2
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
3
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
4
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
5
जातगणना : मॅजिक की मंडल?
6
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
7
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
8
हंड्रेड डेज’ : पास कोण? नापास कोण?
9
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
10
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका
11
‘अमेरिकन आहात? - बिलावर १०४% सेवाशुल्क द्या!
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

आजही २0 वर्षांपूर्वीच्या धोक्याचे सावट कायम

By admin | Updated: July 5, 2017 02:34 IST

जिल्ह्यात अनेक गावे भूस्खलनाच्या कोसळणाऱ्या संकटाच्या आपत्तीने घेरली गेली आहेत. खेड तालुक्यात भोमाळे, पदरवाडी, शेंदुर्ली, पाबे, नायफडच्या

अयाज तांबोळी / लोकमत न्यूज नेटवर्कडेहणे : जिल्ह्यात अनेक गावे भूस्खलनाच्या कोसळणाऱ्या संकटाच्या आपत्तीने घेरली गेली आहेत. खेड तालुक्यात भोमाळे, पदरवाडी, शेंदुर्ली, पाबे, नायफडच्या अनेक वाड्या कड्याखाली आहेत. ही गावे केव्हाही डोंगराच्या पोटात गायब होतील, अशी धोकादायक परिस्थिती आहे. भोमाळे गावात २0 वर्षांपूर्वी झालेल्या भूस्खलनाने गावाचा थरकाप उडाला होता. सुदैवाने या घटनेत जीवित हानी झाली नाही, परंतु तो धोका आजही कायम आहे. अनेक गावे अशीच कमकुवत डोंगराच्या पायथ्याशी वसलेली आहेत. या गावाला पुन्हा भूस्खलनाचा धोका निर्माण झाला आहे. तालुक्यातले भोमाळे, पदरवाडी, शेंदुर्ली, पाबे, नायफड च्या अनेक वाड्या, वांद्रेजवळ पंढरवाडी, तोरणे या गावांना भूस्खलनाचा धोका आहे. डोंगराच्या पायथ्याशी असल्याने त्या डोंगराच्या सुट्या झालेल्या धोकादायक कड्याखाली या गावांमधील शेकडो कुटुंबे मृत्यूची टांगती तलवार असतानाही राहत आहेत. भीमा व भामा खोऱ्यातली बहुतेक वाड्या कड्याखाली आहेत. भोमाळे गाव अदिवासी बहुल सुमारे ४५० लोकसंख्या असलेले गाव. अगदी पायथ्याशी भीमानदी तर डोक्यावर आ वासून उभा असलेला महाकाय आणि तेवढाच ढिसाळ कमकुवत डोंगर. ७० ते ७५ कुटुंबे कुशीत घेतलेल्या गावाने जुलै १९९५ मध्ये पहाटे कोसळलेल्या डोंगराच्या संकटाचा थरकाप उडवणारा अनुभव घेतला आहे. तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी या गावाला भेट दिली होती, त्यानंतर समिती नेमण्यात आली होती , पण गाव आजही त्याच परिस्थितीत आहे. ]भोमाळेचा सर्व्हे होऊन वीस वर्षे झाली, आम्ही लहान होतो, आतापण माळीणनंतर एकदा समिती आली होती, पुनर्वसन करण्यात येईल असे सांगितले. भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेकडून २३ गावांमध्ये भोमाळेपण आहे . जिल्हाधिकाऱ्यांची जीएसआय कमिटी येणार होती, पण दोन वर्षांत इकडे कोणी फिरकले नाही. या धोकादायक गावांचे पुनर्वसन व उपाययोजना करण्यात याव्यात हीच अपेक्षा आहे.- मनोहर शिंदे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष, भोमाळे