शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
3
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
4
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
5
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
6
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
7
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
8
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
9
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
10
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
11
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
12
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
13
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
14
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
15
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
16
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
17
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
18
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
19
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
20
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

सहामाही आली, तरी आरटीई प्रवेश सुरु

By admin | Updated: October 12, 2016 02:32 IST

शाळांमधील प्रवेशित झालेल्या काही विद्यार्थ्यांची सहामाही परीक्षा सुरू झाली असून, काहींची परीक्षा आठवड्याभरात सुरू होणार आहे; मात्र

पुणे : शाळांमधील प्रवेशित झालेल्या काही विद्यार्थ्यांची सहामाही परीक्षा सुरू झाली असून, काहींची परीक्षा आठवड्याभरात सुरू होणार आहे; मात्र तरीही शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) २५ टक्के आरक्षित जागांवरील प्रवेशप्रकिया अद्याप पूर्ण झालेली नाही. आरटीई प्रवेशापासून वंचित असलेल्या पुणे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना येत्या १५ आॅक्टोबरपर्यंत प्रवेशासाठी अर्ज करता येणार आहे. राज्य शासनाकडून आरटीई प्रवेशाकडे दुर्लक्ष केले जाते. त्यातच आॅनलाइन प्रवेशप्रक्रियेत अनेक त्रुटी असल्याने प्रवेशअर्ज करूनही अनेक विद्यार्थ्यांना प्रवेश मिळत नाही. शिक्षण विभागाकडूनही प्रवेशाच्या फेऱ्या घेण्याबाबत अनास्था दाखविली जाते. दरम्यानच्या काळात बहुतेक शाळा सुरू होत असल्याने आरटीई प्रवेशाचा विचार न करता, पालक मिळेल त्या शाळेत आपल्या पाल्याला प्रवेश घेऊन देतात. यंदाही प्रवेशप्रक्रिया धिम्या गतीने राबविण्यात आली. त्यामुळे सहामाही परीक्षा सुरू झाल्यानंतरही, शिक्षण विभागाला आरटीई प्रवेशप्रक्रिया राबवावी लागत आहे.विद्यार्थ्यांना पुढील आठ वर्षे मोफत शिक्षण मिळावे म्हणून आॅक्टोबर महिन्यातही प्रवेशपरीक्षा राबविली जात असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगितले जात आहे. आता प्रवेशापासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांना येत्या १५ आॅक्टोबरपर्यंत अर्ज करता येणार आहे. शाळा बदलून हव्या असणाऱ्या विद्यार्थ्यांनाही या फेरीसाठी अर्ज करता येईल.(प्रतिनिधी)...तर अर्ज बाद करणार४जिल्ह्यातील ७८० शाळांमध्ये आरटीई प्रवेश राबविले जातात. त्यात २० हजार ५८१ विद्यार्थी प्रवेशास पात्र झाले असून, त्यातील ८ हजार २२२ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला आहे. रिक्त जागांवर अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. ज्यांचे प्रवेश झाले आहेत, त्यांनी अर्ज करू नये; तसेच दोन किंवा अधिक अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांचे अर्ज बाद केले जाणार आहेत, असे शिक्षण विभागातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.