शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
2
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
3
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
4
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
5
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
6
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
7
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
8
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
9
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
10
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
11
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
12
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
13
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
14
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
15
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
16
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
17
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
18
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
19
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
20
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी

सहामाही आली, तरी आरटीई प्रवेश सुरु

By admin | Updated: October 12, 2016 02:32 IST

शाळांमधील प्रवेशित झालेल्या काही विद्यार्थ्यांची सहामाही परीक्षा सुरू झाली असून, काहींची परीक्षा आठवड्याभरात सुरू होणार आहे; मात्र

पुणे : शाळांमधील प्रवेशित झालेल्या काही विद्यार्थ्यांची सहामाही परीक्षा सुरू झाली असून, काहींची परीक्षा आठवड्याभरात सुरू होणार आहे; मात्र तरीही शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) २५ टक्के आरक्षित जागांवरील प्रवेशप्रकिया अद्याप पूर्ण झालेली नाही. आरटीई प्रवेशापासून वंचित असलेल्या पुणे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना येत्या १५ आॅक्टोबरपर्यंत प्रवेशासाठी अर्ज करता येणार आहे. राज्य शासनाकडून आरटीई प्रवेशाकडे दुर्लक्ष केले जाते. त्यातच आॅनलाइन प्रवेशप्रक्रियेत अनेक त्रुटी असल्याने प्रवेशअर्ज करूनही अनेक विद्यार्थ्यांना प्रवेश मिळत नाही. शिक्षण विभागाकडूनही प्रवेशाच्या फेऱ्या घेण्याबाबत अनास्था दाखविली जाते. दरम्यानच्या काळात बहुतेक शाळा सुरू होत असल्याने आरटीई प्रवेशाचा विचार न करता, पालक मिळेल त्या शाळेत आपल्या पाल्याला प्रवेश घेऊन देतात. यंदाही प्रवेशप्रक्रिया धिम्या गतीने राबविण्यात आली. त्यामुळे सहामाही परीक्षा सुरू झाल्यानंतरही, शिक्षण विभागाला आरटीई प्रवेशप्रक्रिया राबवावी लागत आहे.विद्यार्थ्यांना पुढील आठ वर्षे मोफत शिक्षण मिळावे म्हणून आॅक्टोबर महिन्यातही प्रवेशपरीक्षा राबविली जात असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगितले जात आहे. आता प्रवेशापासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांना येत्या १५ आॅक्टोबरपर्यंत अर्ज करता येणार आहे. शाळा बदलून हव्या असणाऱ्या विद्यार्थ्यांनाही या फेरीसाठी अर्ज करता येईल.(प्रतिनिधी)...तर अर्ज बाद करणार४जिल्ह्यातील ७८० शाळांमध्ये आरटीई प्रवेश राबविले जातात. त्यात २० हजार ५८१ विद्यार्थी प्रवेशास पात्र झाले असून, त्यातील ८ हजार २२२ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला आहे. रिक्त जागांवर अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. ज्यांचे प्रवेश झाले आहेत, त्यांनी अर्ज करू नये; तसेच दोन किंवा अधिक अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांचे अर्ज बाद केले जाणार आहेत, असे शिक्षण विभागातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.