शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
4
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
5
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
6
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
7
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
8
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
9
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
10
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
11
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
12
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
13
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
14
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
15
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
16
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
17
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
18
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
19
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
20
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या

आधुनिकतेतही सोहळ्यात वाढ

By admin | Updated: June 19, 2017 05:16 IST

मोरे म्हणाले, ‘‘श्री संत तुकाराममहाराज पालखी सोहळा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. याचा ताण संस्थानासह प्रशासकीय यंत्रणेवरही येत असल्या, तरी देशाचा व राज्याचा सांस्कृतिक

मोरे म्हणाले, ‘‘श्री संत तुकाराममहाराज पालखी सोहळा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. याचा ताण संस्थानासह प्रशासकीय यंत्रणेवरही येत असल्या, तरी देशाचा व राज्याचा सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी शासन व प्रशासन खंबीर पणे पाठीशी निश्चितपणे उभे राहिलेले आहे. यामध्ये पालखी तळांचा प्रश्न असेल, पालखी महामार्गाचा विकास तीर्थक्षेत्रांचा विकास ही महत्त्वपूर्ण कामे केली आहेतच; याशिवाय आषाढी वारीच्या दरम्यान जवळपास महिनाभर वारकऱ्यांच्या सेवेशी दिवस-रात्र हजर असल्याचे जाणवते. दिवसेंदिवस भाविक वाढत आहेत, त्यांच्यासाठी सध्याचे पालखी तळ कमी पडत आहेत.गेल्या दोन-तीन वर्षांत यांचा विकास केला जात आहे. त्यांना सोयी सुविधा पुरविण्यासाठी दगडूशेठ हलवाई ट्रस्ट, वनराई, देवराई, विश्व हिंदू परिषद यांसारख्या संस्थांचा सहभाग आहे. वारी दरम्यान पिण्याच्या पाण्याचा महत्त्वाचा प्रश्न असतो. हा प्रश्न शासनाने लोकसहभागातून व विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून सोडविण्याचा प्रयत्न झाला आहे. आरोग्यविषयक वारकऱ्यांमध्ये अजूनही जागरुकता वाढण्याची गरज आहे. हे करताना वारीची परंपरा जपणे हे मोठे आव्हान आहे. अलीकडे वारीचे स्वरूप बदलत असून गर्दी होत आहे. पूर्वी वारीसमवेत लोक कमी असत. त्यामुळे गरजाही कमी होत्या. पालखी वेगात पुढे सरकत होती. अलीकडे पालखीसमवेत भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने पालखीचा वेग प्रचंड मंदावत असून, पुढील मुक्कामी पालखी वेळेत नेणे हे मोठे आव्हान ठरत आहे. भविष्यात याच्यावर विचार करणे आवश्यक होणार आहे. यासाठी संस्थानच्या पालखी सोहळ्यासमवेत सध्याच्या ३३२ दिंड्या चालत आहेत. वारीचे नियोजन करण्यासाठी सोहळ्यात नव्याने दिंड्यांचा समावेश करणे बंद केले आहे. सोहळ्यासाठी भाविक पूर्वी पायी येत होता. आत्ता मात्र वाहनांची संख्या वाढली आहे. हे भाविक आपापल्या गावी परत जात असताना परतीच्या प्रवासात अपघाताचे प्रमाणही वाढले आहे. हा प्रश्नही ऐरणीवर आहे. आधुनिकतेची कास धरत असताना जग अधिक जवळ आले आहे.वारी व्हॉट्स अ‍ॅप व फेसबुकच्या माध्यमातून जलद गतीने जगभर पसरत आहे. यातून आपला सांस्कृतिक वारसा जगापुढे जात आहे. ही चांगली बाब आहे. यासाठी संस्थानानेही फेसबुक दिंडीसारखा उपक्रम हाती घेतला आहे. सध्या समाजाला भेडसावत असलेले स्त्रीभ्रूणहत्या, पर्यावरणरक्षण हे उपक्रम विविध सामाजिक संस्थांच्या सहकार्याने राबविले जात आहेत. यासाठी निर्मल वारी, हरित वारी व महिला सन्मान करण्यासाठी ‘ती’ची वारी असे विविध उपक्रम राबविले जात आहे. हरित वारी राबवीत असताना सर्वच पालखी तळावर वृक्षारोपण केले जात आहे.महिलांसाठी सन्मान व्हावा यासाठी ‘ती’ची वारी डिजिटल पद्धतीने समाजासमोर मांडली जात आहे. निर्मल वारी आरएसएसच्या पुढाकाराने राबविली जात असून, यासाठी शासनाने तीन कोटी रुपये मंजूर करून हातभार लावला आहे. वारीची वाटचाल सुरू होत आजूबाजूच्या गावांतही गर्दीचे प्रमाण वाढले आहे.सध्या शासनाने फक्त पालखी तळांचाच विकास लक्षात घेतला आहे. परंतु पालखीसोबत असलेले भाविक हे पालखी मुक्कामाच्या गावांच्या पाच किलोमीटरच्या परिघातील गावांमध्ये विकास होणे आवश्यक आहे. भविष्यात शासनाने याचाही विचार करणे आवश्यक आहे, असे मत मोरे यांनी व्यक्त केले.