शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

हृदयरोग, ॲलर्जी असली, तरी लस घ्यायलाच हवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:12 IST

पुणे : कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. शहरात बुधवारी कोरोनाग्रस्त रुग्णांचा आतापर्यंतचा उच्चांकी आकडा नोंदवला गेला. अशा परिस्थितीत लसीकरण ...

पुणे : कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. शहरात बुधवारी कोरोनाग्रस्त रुग्णांचा आतापर्यंतचा उच्चांकी आकडा नोंदवला गेला. अशा परिस्थितीत लसीकरण हा सध्या संरक्षणाचा एकमेव उपाय मानला जात आहे. मात्र, लस कोणी घ्यावी आणि कोणी घेऊ नये, याबाबत अजूनही सामान्यांमध्ये बऱ्याच शंका आहेत. गर्भवती महिला, सर्दी-खोकला यांसारखी लक्षणे असलेले रुग्ण, केमोथेरपीचे उपचार सुरू असलेले रुग्ण, सध्या कोरोनाग्रस्त असलेले रुग्ण वगळता सर्वांनी लस घ्यायलाच हवी असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. रक्त पातळ करण्याच्या गोळ्या सुरु असलेल्या रुग्णांची आपल्या डॉक्टरांशी सल्लामसलतळ्रून लस घ्यावी.

हृदयरोगी, रक्त पातळ होण्याच्या गोळ्या घेणारे, वेगवेगळी ॲलर्जी असलेले असा कुठलाही आजार असलेल्या सर्वांनीच कोरोना प्रतिबंधक लस घ्यायला हवी, त्यांना कोठलाही धोका नाही, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. याबाबत शासनाने मार्गदर्शन सूचनाही जारी केल्या आहेत. त्याप्रमाणे आपापल्या डॉक्टरांचा सल्ला घेऊन लसीसंदर्भातील शंकांचे निरसन करून घ्यावे, असे वैद्यकतज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे.

--

लस घेऊ शकत नाही, असे खूप कमी आजार यादीत नोंदवले गेले आहेत. कोरोनाचा प्रसार झपाट्याने होत आहे. आपल्या आजूबाजूला कोरोना नाहीच, अशा आविर्भावात लोक सार्वजनिक ठिकाणी वावरत आहेत. ८०-९० टक्के लोकांमध्ये लसीकरण झाल्याशिवाय आपल्याकडे हर्ड इम्युनिटी येणार नाही. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी लसीकरण करुन घेण्यावर भर द्यावा. केमोथेरपीसारखे उपचार, सर्दी, खोकला यांसारखी लक्षणे आणि गर्भवती महिलांनी यांनी लस घेऊ नये.

- डॉ. अच्युत जोशी, जनरल फिजिशियन

---

कोरोनाचा उद्रेक दिसत असताना लसीकरण हा सध्याचा एकमेव पर्याय आहे. आपल्याकडील लोकसंख्येचा विचार करता जास्तीत जास्त लोकांपर्यंत लस पोहोचणे गरजेचे आहे. मधुमेहाच्या रुग्णांमधील प्रतिकारशक्ती क्षीण झालेली असते. त्यांना संसर्गाचा जास्त धोका असतो. त्यामुळे मधुमेहाच्या ४५ वर्षावरील सर्व व्यक्तींनी लस प्राधान्याने घ्यायला हवी. रुग्णांना अँटीकॉग्युलंट गोळया सुरु असतील तर त्यांनी लसीच्या दोन-तीन दिवस आधी ती औषधे थांबवावीत. प्रत्येक रुग्णाने लसीकरणापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.

- डॉ. अमित वाळिंबे, मधुमेह रोगतज्ज्ञ

---

रक्त पातळ होण्याची किंवा गुठळी प्रतिबंधक गोळया सुरु असल्यास लसीकरणाच्या दोन दिवस आधी गोळया थांबवाव्यात. लसीकरणानंतर एक-दोन दिवसांनी गोळया पुन्हा सुरु कराव्यात. ह्रदयरोग, रक्तदाब, कोलेस्टेरॉलच्या गोळया सुरु असतील तर लस घ्यायला काहीच हरकत नाही आणि या गोळया थांबवण्याचीही गरज नाही. कोणताही अत्यवस्थ रुग्ण किंवा एक-दोन दिवसांत बायपास, अँजिओप्लास्टीसारखी शस्त्रक्रिया असलेल्या रुग्णांनी लगेच त्याच दिवशी लस घेऊ नये. बायपास सर्जरीनंतर रक्त पातळ होण्याच्या गोळया बंद केल्या =जातात, तर अ‍ॅजिओप्लास्टीनंतर गोळया वाढवल्या जातात. धातूची झडप घातली असल्यास गुठळी प्रतिबंधक गोळया दिल्या जातात. अशा रुग्णांना लगेच लसीकरण करुन घेता येत नाही. त्यासाठी डॉक्टरांचा सल्ला आवश्यक ठरतो.

- डॉ. अभिजीत वैद्य, ह्रदयरोगतज्ज्ञ

---

थंडी-ताप आला तरी घाबरू नये...

लसीकरणानंतर थंडी ताप आला तरी घाबरण्याचे कारण नाही. लसीकरणानंतर घेतलेल्या गोळ्या वेळेत घ्याव्यात, असे आवाहन तज्ज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून करण्यात आले आहे.