शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे ठप्प; मेट्रो सेवा सुरळीत, प्रवाशांना अल्प दिलासा
2
'नेहरूंनी पाकिस्तानला मदत केली होती', 'सिंधू जल' करारावरुन पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
3
पाकिस्तानची खोटी बडबड! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये गुडघे टेकले, आता परदेशात जाऊन मारतायत थापा
4
उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी विरोधकांकडून उमेदवार जाहीर; सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती रिंगणात
5
ऑटो कंपन्यांवरील अरिष्ट टळले...! चीनने दरवाजे उघडले; रेअर अर्थ मेटलसह दोन वस्तूंवरील निर्बंध हटविले
6
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधू बाजी मारणार की महायुती मात देणार? निकालाची उत्सुकता शिगेला
7
GST बदलाच्या घोषणेनंतर 'या' ५ शेअर्समध्ये होणार मोठी वाढ? ब्रोकरेजकडून खरेदीचा सल्ला!
8
दिलीप प्रभावळकरांचा रोमांचक 'दशावतार'; कोकणातल्या मातीत घडणाऱ्या सिनेमाचा अंगावर काटा आणणारा ट्रेलर
9
"साहेब माझी आई हरवली"; तक्रार नोंदवण्यासाठी मुलगा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला, तपास सुरू होताच सगळ्यांना धक्का बसला!
10
१९४६ च्या कलकत्ता दंगलीत हजारो हिंदूंचे प्राण वाचवणारे गोपाल पाठा कोण होते? कोण मानतं हिरो, तर कुणी म्हणतं व्हिलन  
11
पापा की परी... सावधान! स्कुटरच्या हँडलमधून साप निघाला साप, तरुणीने उडीच मारली...
12
इंडियन ऑइलने अमेरिकेला दाखवला 'ठेंगा', रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी सुरुच राहणार...
13
VIDEO : किन्नरच्या सौंदर्यावर नेटकरी 'फिदा'! व्हिडिओ पाहून युजर्स म्हणतायत...; तुम्हीही थक्क व्हाल!
14
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
15
Mangalagauri 2025: मंगळगौरीचे पावित्र्य आणि माधुर्य दर्शवणारे दीनानाथ दलाल यांचे चित्र; पहा बारकावे!
16
ऋतुराजनं बॉलिंगमध्ये आजमावला हात; सिक्सर मारल्यावर विकेट्स घेत हिशोब केला चुकता (VIDEO)
17
ती गुढ आग... ज्यात भारताचं सेमीकंडक्टर बनवण्याचं स्वप्न झालं होतं जळून खाक, ७ फेब्रुवारी १९८९ रोजी नेमकं काय झालं होतं?
18
सावधान! अनोळखी व्यक्तीला कॅशच्या बदल्यात पैसे ट्रान्सफर करताय? 'या' एका चुकीमुळे जावं लागेल थेट तुरुंगात
19
Himachal Pradesh: हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटी; अनेक घरे, गाड्या गेल्या वाहून, ४०० रस्ते बंद!
20
Miss Universe India: २२ वर्षांच्या मनिका विश्वकर्माने जिंकला 'मिस युनिव्हर्स इंडिया २०२५' चा खिताब, कोण आहे ही सुंदरी?

लॉकडाऊन हटला तरी निर्बंध राहणारच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : “कोरोना संसर्गाची त्या-त्या जिल्ह्यातील स्थिती कशी आहे यावर निर्बंध कोणते आणि किती हे अवलंबून ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : “कोरोना संसर्गाची त्या-त्या जिल्ह्यातील स्थिती कशी आहे यावर निर्बंध कोणते आणि किती हे अवलंबून असेल. प्रत्येक जिल्ह्यासाठीची स्थिती वेगळी असू शकते. साथ कमी झाल्याचे आकडेवारीतून दिसत असले तर निर्बंध काही प्रमाणात शिथिल करता येतील. मात्र सर्व निर्बंध तत्काळ उठवण्याची स्थिती आजही नाही,” असे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले.

कोरोना उपचाराचा ‘प्रोटोकॉल’ पाळला गेला नाही तर काही समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे यासंबंधीच्या सर्व मार्गदर्शक सूचनांचे पालन केले जावे, असा प्रयत्न असल्याचे टोपे म्हणाले. शुक्रवारी (दि. २८) ते पुण्यातील साखर संकुल येथे पत्रकारांशी बोलत होते.

कोरोना होऊन गेल्यानंतर आता म्युकरमायकोसिससारखा आजार होत असल्याचे निदर्शनास आले आहे. याबाबत विचारले असता टोपे म्हणाले, “कोरोनावरील उपचारांचे नियम ठरवून दिले आहेत. त्यानुसार रुग्णाच्या कोणत्या स्थितीत कोणती औषधे द्यायची हे निश्चित आहे. याच पद्धतीने उपचार व्हावेत यासाठी डॉक्टरांना वारंवार सांगण्यात येते. प्रशिक्षणही घेतले जाते. उपचाराची औषधे, त्याचे प्रमाण आदीत फरक पडत असेल तर कदाचित त्याचे परिणाम होऊ शकतात.”

कोरोनापश्चात स्थितीमध्ये काहींना उच्च रक्तदाबाचा विळखा पडलेला दिसतो. याचे कारण बदललेली जीवनशैली असल्याचे टोपे म्हणाले. मुंबईसह अनेक शहरांमध्ये या विकाराने ग्रासलेल्यांची संख्या वाढत आहे. जीवनशैली बदलणे, ताण कमी करणे हाच त्यावरचा उपाय असल्याचे ते म्हणाले.