शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
3
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
4
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
5
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
6
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
7
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
8
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
9
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
10
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
11
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
12
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
13
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
14
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
15
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
16
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
17
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
18
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
19
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
20
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
Daily Top 2Weekly Top 5

मृत्यूनंतरही मजुराने दिले पाच जणांना जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 04:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्क आजच्या युगात माणूस पैशासाठी काहीही करायला तयार असतो. एवढेच काय आपले अवयवसुद्धा विकायला तयार असतो. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

आजच्या युगात माणूस पैशासाठी काहीही करायला तयार असतो. एवढेच काय आपले अवयवसुद्धा विकायला तयार असतो. मात्र, बेल्हा येथील एका कुटुंबाने मुलाच्या मृत्यूनंतर चक्क त्याचे अवयव दान करत समाजापुढे आदर्श निर्मण केला आहे. डोळे, फुफ्फुस, हृदय, यकृत, किडनी गरजूंना दान करत या कुटुंबाने चार जणांना जीवदान देत अवयव दानाचे महत्व स्पष्ट केले आहे.

संतोष धोंडिभाऊ बांगर (वय ४३) असे या दानशूर मजुराचे नाव आहे. बेल्हा (ता. जुन्नर) येथील एका बांधकाम व्यावसायिकाकडे संतोष हा मजूर म्हणून काम करत होता. काम करत असतांना एका लाकडी परातीच्या फळीवरुन त्याचा पाय घसरला. त्याच्या मेंदूला मार लागल्याने तो बेशुद्ध झाला. त्याला उपचारासाठी पुण्यातील एका खाजगी रूग्ग्णालयात दाखल केले. परंतु दोनच दिवसात उपचारादरम्यान संतोषचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूमुळे कुटूंबाचे छत्र हरवले.

संतोषला वडील नाहीत वृद्ध आई,पत्नी व एक ७ व्या इयत्तेत शिकत असलेला मुलगा आहे. फक्त ११ गुंठेच जमिन. त्यात एक लहान भाऊ सगळ काही मजुरीवरच चालायच. त्यात कमावता गेल्याने दुःखाचा डोंगर कोसळला अशाही परिस्थितीत स्वतःचे डोंगराएवढे दुःख बाजुला त्यांनी ठेवले. अन्नाचं, कपड्यांचं दान सगळ्यांना माहित आहे. मात्र अवयवांचं दान होऊ शकतं आणि त्यामुळे दुसऱ्यांचे प्राण वाचू शकतात याची जाणीव अजुनही समाजात रूजलेली नाही. मात्र या अशिक्षित मजुराच्या अशिक्षित कुटुंबीयांनी दाखवलेल्या औदार्यामुळं डॉक्टरांना चार जणांचे प्राण वाचवण्यात यश मिळाले. त्याच्या कुटुंबाच्या मदतीसाठी समाजाने पुढं यावं असं आवाहन जानकू डावखर,बबन औटी, विकास बढे यांनी केलं आहे.

चौकट

संतोषच्या दशक्रिया विधीच्या वेळी ब्राम्हण, नाभिक समाज, प्रवचनकार, स्पिकरव्यवस्था या सर्वांनी निशुल्क सेवा देऊन स्वतः रोख मदतही दिली. मजुरांना काम करताना सुरक्षितता वाटेल तसेच मजुरांचा सामुहिक विमा परंतु या सर्व गोष्टींचा अभाव असल्याचे दिसून येते. त्यामुळे कुटूंबातील एकमेव कमावता आधार गेल्यानंतर कुटूंब उघड्यावर पडते. दोन ते चार दिवस इतर लोक चुकचुकतात नंतर मात्र त्या कुटूंबाकडे दुर्लक्ष होते किंवा समाज विसरुन जातो.यासाठी बांधकाम व्यवसायिकांनी मजुरांच्या सुरक्षेकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे असे मत माजी पंचायत समिती सदस्य जयवंत घोडके यांनी व्यक्त केले.