शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

मृत्यूनंतरही मजुराने दिले पाच जणांना जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 04:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्क आजच्या युगात माणूस पैशासाठी काहीही करायला तयार असतो. एवढेच काय आपले अवयवसुद्धा विकायला तयार असतो. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

आजच्या युगात माणूस पैशासाठी काहीही करायला तयार असतो. एवढेच काय आपले अवयवसुद्धा विकायला तयार असतो. मात्र, बेल्हा येथील एका कुटुंबाने मुलाच्या मृत्यूनंतर चक्क त्याचे अवयव दान करत समाजापुढे आदर्श निर्मण केला आहे. डोळे, फुफ्फुस, हृदय, यकृत, किडनी गरजूंना दान करत या कुटुंबाने चार जणांना जीवदान देत अवयव दानाचे महत्व स्पष्ट केले आहे.

संतोष धोंडिभाऊ बांगर (वय ४३) असे या दानशूर मजुराचे नाव आहे. बेल्हा (ता. जुन्नर) येथील एका बांधकाम व्यावसायिकाकडे संतोष हा मजूर म्हणून काम करत होता. काम करत असतांना एका लाकडी परातीच्या फळीवरुन त्याचा पाय घसरला. त्याच्या मेंदूला मार लागल्याने तो बेशुद्ध झाला. त्याला उपचारासाठी पुण्यातील एका खाजगी रूग्ग्णालयात दाखल केले. परंतु दोनच दिवसात उपचारादरम्यान संतोषचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूमुळे कुटूंबाचे छत्र हरवले.

संतोषला वडील नाहीत वृद्ध आई,पत्नी व एक ७ व्या इयत्तेत शिकत असलेला मुलगा आहे. फक्त ११ गुंठेच जमिन. त्यात एक लहान भाऊ सगळ काही मजुरीवरच चालायच. त्यात कमावता गेल्याने दुःखाचा डोंगर कोसळला अशाही परिस्थितीत स्वतःचे डोंगराएवढे दुःख बाजुला त्यांनी ठेवले. अन्नाचं, कपड्यांचं दान सगळ्यांना माहित आहे. मात्र अवयवांचं दान होऊ शकतं आणि त्यामुळे दुसऱ्यांचे प्राण वाचू शकतात याची जाणीव अजुनही समाजात रूजलेली नाही. मात्र या अशिक्षित मजुराच्या अशिक्षित कुटुंबीयांनी दाखवलेल्या औदार्यामुळं डॉक्टरांना चार जणांचे प्राण वाचवण्यात यश मिळाले. त्याच्या कुटुंबाच्या मदतीसाठी समाजाने पुढं यावं असं आवाहन जानकू डावखर,बबन औटी, विकास बढे यांनी केलं आहे.

चौकट

संतोषच्या दशक्रिया विधीच्या वेळी ब्राम्हण, नाभिक समाज, प्रवचनकार, स्पिकरव्यवस्था या सर्वांनी निशुल्क सेवा देऊन स्वतः रोख मदतही दिली. मजुरांना काम करताना सुरक्षितता वाटेल तसेच मजुरांचा सामुहिक विमा परंतु या सर्व गोष्टींचा अभाव असल्याचे दिसून येते. त्यामुळे कुटूंबातील एकमेव कमावता आधार गेल्यानंतर कुटूंब उघड्यावर पडते. दोन ते चार दिवस इतर लोक चुकचुकतात नंतर मात्र त्या कुटूंबाकडे दुर्लक्ष होते किंवा समाज विसरुन जातो.यासाठी बांधकाम व्यवसायिकांनी मजुरांच्या सुरक्षेकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे असे मत माजी पंचायत समिती सदस्य जयवंत घोडके यांनी व्यक्त केले.