शहरं
Join us  
Trending Stories
1
इसकी टोपी उसके सर और उसकी...; कोकाटे आणि दत्तात्रय भरणे यांच्यातील मंत्रि‍पदाची आदलाबदली!
2
प्रांजल खेवलकरच्या लॅपटॉपमध्ये अनेक महिलांचे पार्टी अन् त्यानंतरचे आक्षेपार्ह व्हिडिओ!
3
IND vs ENG 5th Test Day 1 Stumps: नायर-वॉशिंग्टन जोडी जमली अन् टीम इंडियावरील मोठं संकट टळलं!
4
विधानसभेच्या निकालांमध्ये तफावत नाही; ईव्हीएम तपासणीनंतर निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण
5
माल चाहिए क्या? xxx वाला? विचारल्यानंतर खेवलकर म्हणाले होते, 'ठेवून घ्या'! चॅटिंग आलं समोर
6
Karun Nair Fifty : 'त्रिशतकवीर' करुण नायरच्या भात्यातून ३१४६ दिवसांनी आली 'फिफ्टी'!
7
Nashik Crime: भयंकर! पत्नीला गुंगीचे औषध पाजून नग्नावस्थेत बनवले व्हिडिओ, दोन वर्ष डान्स बारमध्ये नाचायला लावले
8
उत्तर प्रदेशमधील मंत्र्यांनी आपल्याच सेक्रेटरीला पाठवलं तुरुंगात, कारण वाचून तुम्ही म्हणाल...
9
सरकारी नोकरी शोधणाऱ्यांसाठी उत्तम संधी, लवकरच ओआयसीएलमध्ये मोठी भरती!
10
IND vs ENG: टीम इंडियासोबत पाचव्या कसोटीत 'चिटींग'? पंच कुमार धर्मसेना यांच्यावर नेटकऱ्यांचा आरोप
11
"भगवा नाही, सनातनी किंवा हिंदुत्ववादी दहशतवाद म्हणा"; अमित शाहांचा उल्लेख करत पृथ्वीराज चव्हाणांचे गंभीर विधान
12
सात वर्षांत ४२ वेळा तिने दिला नकार, अखेर ४३व्यावेळी त्यानं केलं असं काही, नकारच देऊ शकली नाही ती
13
Shubman Gill Run Out : साईला कॉल देत गिलनं उगाच केली घाई! इंग्लंडला फुकटात मिळाली विकेट (VIDEO)
14
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजपची रणनीती! माजी खासदार-आमदारांवर सोपवली मोठी जबाबदारी
15
IND vs ENG : 'ती' साथ देणार अशा परिस्थितीत त्यानं विश्रांती घेतली; सोशल मीडियावर बुमराह झाला ट्रोल
16
आमदाराच्या कारची दुचाकीला धडक, रेल्वे पुलावरून खाली कोसळून तरुणाचा मृत्यू, मृत तरुण भाजपा नेत्याचा भाऊ  
17
बांगलादेशी मॉडेलला भारतात अटक! पोलिसांनी राहत्या घरावर टाकली धाड अन् आत जे सापडलं...
18
Anilkumar Pawar ED Raid: अनिलकुमार पवार यांना त्यांच्या आईने गिफ्ट केलेला नाशिकमधील प्लॉट जप्त
19
कृषीखातं पुन्हा धनंजय मुंडेंकडे? सह्याद्री अतिथीगृहावर भेटीगाठींना वेग!
20
निवडणूक जिंकणं कठीण की पत्नीचं मन? राघव चड्डांनी दिलं असं उत्तर, परिणीतीही झाली अवाक्

समुपदेशनानंतरही १००४ जोडप्यांचा नांदण्यास नकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:10 IST

पुणे : लॉकडाऊन काळात पगारात झालेली कपात आणि नोकऱ्या गेल्यामुळे आलेले नैराश्य, कुटुंबावर झालेला परिणाम, घरात काम ...

पुणे : लॉकडाऊन काळात पगारात झालेली कपात आणि नोकऱ्या गेल्यामुळे आलेले नैराश्य, कुटुंबावर झालेला परिणाम, घरात काम करण्यावरून सातत्याने होणारे शीतयुद्ध, एकमेकांचा अहंकार, मित्र-मैत्रिणींना चॅटिंग करण्यावरून संशयाचे वातावरण आदी कारणांमुळे वर्षभरात शिवाजीनगर कौटुंबिक न्यायालयात मार्च २०२० ते फेब्रुवारी २०२१ दरम्यान घटस्फोट मिळविण्यासाठी ११९२ दावे दाखल झाले. त्यापैकी १००४ दाव्यांत परस्पर संमतीने घटस्फोट घेतले आहेत, तर त्यातील ८१ जोडपी समुपदेशनानंतर पुन्हा नांदायला गेली आहेत.

लॉकडाऊन खरंतर कुटुंबाबरोबर वेळ घालवण्याची निवांत संधी होती. मात्र, या संधीचे सोने करण्याऐवजी अनेक जोडप्यांमध्ये खटके उडाल्याचे पाहायला मिळाले आणि त्याची परिणिती घटस्फोटांमध्ये झाली. याविषयी विवाह समुपदेशक लीना कुलकर्णी सांगतात, केवळ लॉकडाऊनमध्येच नव्हे तर गेल्या काही वर्षांमध्येच घटस्फोटाचे प्रमाण वाढले आहे. आपण ‘कुटुंबकेंद्रित’ रचनेकडून ‘व्यक्ती’केंद्रित समाजरचनेकडे चाललो आहोत. मी, माझी प्रगती झाली पाहिजे. जो प्रवास ‘आम्ही’कडे व्हायला हवा होता तो ‘मी’पणाकडे येऊन ठेपला आहे. यातच माणसाला स्वीकरण्याची आणि सहन करण्याची क्षमता पूर्णपणे कमी झाली आहे. शेअरिंग देखील कमी झालंय. सुना किंवा तरुण मंडळी जेव्हा नोकरीनिमित्त घराबाहेर पडतात. तेव्हा घरातील ज्येष्ठांनी स्वत:चं एक विश्व तयार केलेले असते. पण जेव्हा २४ तास एकमेकांबरोबर राहायची वेळ येते. तेव्हा त्यातील बारीक धागेदोरे समजून घेण्याची आणि सहन करण्याची क्षमताच कमी झाल्याचे पाहायला मिळते. आपण जेव्हा ‘स्पेस’ असे म्हणतो, तेव्हा त्याची व्याख्या प्रत्येकाच्या मनात पक्की झालेली असते. ज्या वेळी जोडपी अपरिहार्यतेने एकत्र आली, त्या वेळी ती एकमेकांच्या स्पेसमध्ये शिरकाव करायला लागली. त्यांचे एक रूटीन डिस्टर्ब झाले. अवकाशाचा संकोच व्हायला लागला. विशेष म्हणजे, लॉकडाऊनकाळात एकमेकांचे विवाहबाह्य संबंध खुले झाले. माझ्याकडे गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात लग्न झालेल्या तीन केसेस आल्या. लग्नानंतर लगेचच त्यांना टाळेबंदीचा सामना करावा लागला. तिन्हीही तरुणी करिअरिस्ट होत्या. त्या काळात त्यांना घरच्या कामाची सवय नसल्याचे कुटुंबाला कळून चुकले. तरुणींमध्ये ऐकण्याची वृत्ती राहिलेली नाही. काही तरुणींना समुपदेशनातून हे पटते.

------

काय व्हायला हवंय...

* एकमेकांशी पारदर्शी संवाद हवा.

* एकमेकांना निरपेक्षपणे स्वीकारण्याची वृत्ती हवी.

* एकमेकांवर विश्वास हवा.

* एकमेकांशी जुळवून घ्यायला हवं.

---

टाळेबंदीच्या काळात अनेक लोकांच्या विशेषत: आयटीमधील तरुण-तरुणींच्या नोकऱ्या गेल्या. पगारकपात झाली. त्यामुळे प्रापंचिक आणि पैशावरून वाद सुरू झाले. घरात काम कुणी करायचे? यावरून एकमेकांचा अहंकार आडवा यायला लागला. छोटी भांडणे देखील विकोपाला गेली. मुलीच्या कुटुंबाचा देखील नको तेवढा हस्तक्षेप वाढला. या कारणांमुळे परस्पर संमतीने घटस्फोट घेण्याचे प्रमाण वाढले आहे. गेल्या अडीच वर्षांत परस्परसंमतीने घटस्फोट मिळविण्यासाठी ३ हजार ३५२ दावे दाखल आहेत. त्यातील १ हजार ९१२ घटस्फोटांचे दावे पस्स्परसंमतीने निकाली काढले आहेत. दाव्यांच्या आकडेवारीनुसार घटस्फोटाचे दररोज ५ दावे दाखल होत आहेत. घटस्फोटाचे दावे दाखल झाल्यानंतर कौटुंबिक न्यायालयातील समुपदेशकांकडून जोडप्यांचे समुपदेशन केले जाते. काही प्रकरणांमध्ये जोडप्यातील वाद मिटवून त्यांचा संसार पूर्ववत करण्यास यश मिळाले आहे.

- अॅड. वैशाली चांदणे, अध्यक्ष, दि फॅमिली कोर्ट लॉयर्स असोसिएशन

---

आज जोडप्यांची जुळवून घेण्याची लवचिकता कमी झाली आहे. तरुण पिढीला जुळवणी आणि तडजोड यातला फरक समजून सांगितला पाहिजे. तसं झालं नाही तर त्यातून विवाह विच्छेद हा अटळ आहे. संसाराचा रथ हा दोन चाकांवर चालतो. तो एकत्रितपणे चालण्यासाठी ‘मी’पणाचा प्रवास ‘आम्ही’पर्यंत नेण्याची गरज आहे.

- लीना कुलकर्णी, विवाह समुपदेशक