शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
6
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
7
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
8
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
9
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
10
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
11
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
12
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

समुपदेशनानंतरही १००४ जोडप्यांचा नांदण्यास नकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:10 IST

पुणे : लॉकडाऊन काळात पगारात झालेली कपात आणि नोकऱ्या गेल्यामुळे आलेले नैराश्य, कुटुंबावर झालेला परिणाम, घरात काम ...

पुणे : लॉकडाऊन काळात पगारात झालेली कपात आणि नोकऱ्या गेल्यामुळे आलेले नैराश्य, कुटुंबावर झालेला परिणाम, घरात काम करण्यावरून सातत्याने होणारे शीतयुद्ध, एकमेकांचा अहंकार, मित्र-मैत्रिणींना चॅटिंग करण्यावरून संशयाचे वातावरण आदी कारणांमुळे वर्षभरात शिवाजीनगर कौटुंबिक न्यायालयात मार्च २०२० ते फेब्रुवारी २०२१ दरम्यान घटस्फोट मिळविण्यासाठी ११९२ दावे दाखल झाले. त्यापैकी १००४ दाव्यांत परस्पर संमतीने घटस्फोट घेतले आहेत, तर त्यातील ८१ जोडपी समुपदेशनानंतर पुन्हा नांदायला गेली आहेत.

लॉकडाऊन खरंतर कुटुंबाबरोबर वेळ घालवण्याची निवांत संधी होती. मात्र, या संधीचे सोने करण्याऐवजी अनेक जोडप्यांमध्ये खटके उडाल्याचे पाहायला मिळाले आणि त्याची परिणिती घटस्फोटांमध्ये झाली. याविषयी विवाह समुपदेशक लीना कुलकर्णी सांगतात, केवळ लॉकडाऊनमध्येच नव्हे तर गेल्या काही वर्षांमध्येच घटस्फोटाचे प्रमाण वाढले आहे. आपण ‘कुटुंबकेंद्रित’ रचनेकडून ‘व्यक्ती’केंद्रित समाजरचनेकडे चाललो आहोत. मी, माझी प्रगती झाली पाहिजे. जो प्रवास ‘आम्ही’कडे व्हायला हवा होता तो ‘मी’पणाकडे येऊन ठेपला आहे. यातच माणसाला स्वीकरण्याची आणि सहन करण्याची क्षमता पूर्णपणे कमी झाली आहे. शेअरिंग देखील कमी झालंय. सुना किंवा तरुण मंडळी जेव्हा नोकरीनिमित्त घराबाहेर पडतात. तेव्हा घरातील ज्येष्ठांनी स्वत:चं एक विश्व तयार केलेले असते. पण जेव्हा २४ तास एकमेकांबरोबर राहायची वेळ येते. तेव्हा त्यातील बारीक धागेदोरे समजून घेण्याची आणि सहन करण्याची क्षमताच कमी झाल्याचे पाहायला मिळते. आपण जेव्हा ‘स्पेस’ असे म्हणतो, तेव्हा त्याची व्याख्या प्रत्येकाच्या मनात पक्की झालेली असते. ज्या वेळी जोडपी अपरिहार्यतेने एकत्र आली, त्या वेळी ती एकमेकांच्या स्पेसमध्ये शिरकाव करायला लागली. त्यांचे एक रूटीन डिस्टर्ब झाले. अवकाशाचा संकोच व्हायला लागला. विशेष म्हणजे, लॉकडाऊनकाळात एकमेकांचे विवाहबाह्य संबंध खुले झाले. माझ्याकडे गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात लग्न झालेल्या तीन केसेस आल्या. लग्नानंतर लगेचच त्यांना टाळेबंदीचा सामना करावा लागला. तिन्हीही तरुणी करिअरिस्ट होत्या. त्या काळात त्यांना घरच्या कामाची सवय नसल्याचे कुटुंबाला कळून चुकले. तरुणींमध्ये ऐकण्याची वृत्ती राहिलेली नाही. काही तरुणींना समुपदेशनातून हे पटते.

------

काय व्हायला हवंय...

* एकमेकांशी पारदर्शी संवाद हवा.

* एकमेकांना निरपेक्षपणे स्वीकारण्याची वृत्ती हवी.

* एकमेकांवर विश्वास हवा.

* एकमेकांशी जुळवून घ्यायला हवं.

---

टाळेबंदीच्या काळात अनेक लोकांच्या विशेषत: आयटीमधील तरुण-तरुणींच्या नोकऱ्या गेल्या. पगारकपात झाली. त्यामुळे प्रापंचिक आणि पैशावरून वाद सुरू झाले. घरात काम कुणी करायचे? यावरून एकमेकांचा अहंकार आडवा यायला लागला. छोटी भांडणे देखील विकोपाला गेली. मुलीच्या कुटुंबाचा देखील नको तेवढा हस्तक्षेप वाढला. या कारणांमुळे परस्पर संमतीने घटस्फोट घेण्याचे प्रमाण वाढले आहे. गेल्या अडीच वर्षांत परस्परसंमतीने घटस्फोट मिळविण्यासाठी ३ हजार ३५२ दावे दाखल आहेत. त्यातील १ हजार ९१२ घटस्फोटांचे दावे पस्स्परसंमतीने निकाली काढले आहेत. दाव्यांच्या आकडेवारीनुसार घटस्फोटाचे दररोज ५ दावे दाखल होत आहेत. घटस्फोटाचे दावे दाखल झाल्यानंतर कौटुंबिक न्यायालयातील समुपदेशकांकडून जोडप्यांचे समुपदेशन केले जाते. काही प्रकरणांमध्ये जोडप्यातील वाद मिटवून त्यांचा संसार पूर्ववत करण्यास यश मिळाले आहे.

- अॅड. वैशाली चांदणे, अध्यक्ष, दि फॅमिली कोर्ट लॉयर्स असोसिएशन

---

आज जोडप्यांची जुळवून घेण्याची लवचिकता कमी झाली आहे. तरुण पिढीला जुळवणी आणि तडजोड यातला फरक समजून सांगितला पाहिजे. तसं झालं नाही तर त्यातून विवाह विच्छेद हा अटळ आहे. संसाराचा रथ हा दोन चाकांवर चालतो. तो एकत्रितपणे चालण्यासाठी ‘मी’पणाचा प्रवास ‘आम्ही’पर्यंत नेण्याची गरज आहे.

- लीना कुलकर्णी, विवाह समुपदेशक