शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

समुपदेशनानंतरही १००४ जोडप्यांचा नांदण्यास नकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:10 IST

पुणे : लॉकडाऊन काळात पगारात झालेली कपात आणि नोकऱ्या गेल्यामुळे आलेले नैराश्य, कुटुंबावर झालेला परिणाम, घरात काम ...

पुणे : लॉकडाऊन काळात पगारात झालेली कपात आणि नोकऱ्या गेल्यामुळे आलेले नैराश्य, कुटुंबावर झालेला परिणाम, घरात काम करण्यावरून सातत्याने होणारे शीतयुद्ध, एकमेकांचा अहंकार, मित्र-मैत्रिणींना चॅटिंग करण्यावरून संशयाचे वातावरण आदी कारणांमुळे वर्षभरात शिवाजीनगर कौटुंबिक न्यायालयात मार्च २०२० ते फेब्रुवारी २०२१ दरम्यान घटस्फोट मिळविण्यासाठी ११९२ दावे दाखल झाले. त्यापैकी १००४ दाव्यांत परस्पर संमतीने घटस्फोट घेतले आहेत, तर त्यातील ८१ जोडपी समुपदेशनानंतर पुन्हा नांदायला गेली आहेत.

लॉकडाऊन खरंतर कुटुंबाबरोबर वेळ घालवण्याची निवांत संधी होती. मात्र, या संधीचे सोने करण्याऐवजी अनेक जोडप्यांमध्ये खटके उडाल्याचे पाहायला मिळाले आणि त्याची परिणिती घटस्फोटांमध्ये झाली. याविषयी विवाह समुपदेशक लीना कुलकर्णी सांगतात, केवळ लॉकडाऊनमध्येच नव्हे तर गेल्या काही वर्षांमध्येच घटस्फोटाचे प्रमाण वाढले आहे. आपण ‘कुटुंबकेंद्रित’ रचनेकडून ‘व्यक्ती’केंद्रित समाजरचनेकडे चाललो आहोत. मी, माझी प्रगती झाली पाहिजे. जो प्रवास ‘आम्ही’कडे व्हायला हवा होता तो ‘मी’पणाकडे येऊन ठेपला आहे. यातच माणसाला स्वीकरण्याची आणि सहन करण्याची क्षमता पूर्णपणे कमी झाली आहे. शेअरिंग देखील कमी झालंय. सुना किंवा तरुण मंडळी जेव्हा नोकरीनिमित्त घराबाहेर पडतात. तेव्हा घरातील ज्येष्ठांनी स्वत:चं एक विश्व तयार केलेले असते. पण जेव्हा २४ तास एकमेकांबरोबर राहायची वेळ येते. तेव्हा त्यातील बारीक धागेदोरे समजून घेण्याची आणि सहन करण्याची क्षमताच कमी झाल्याचे पाहायला मिळते. आपण जेव्हा ‘स्पेस’ असे म्हणतो, तेव्हा त्याची व्याख्या प्रत्येकाच्या मनात पक्की झालेली असते. ज्या वेळी जोडपी अपरिहार्यतेने एकत्र आली, त्या वेळी ती एकमेकांच्या स्पेसमध्ये शिरकाव करायला लागली. त्यांचे एक रूटीन डिस्टर्ब झाले. अवकाशाचा संकोच व्हायला लागला. विशेष म्हणजे, लॉकडाऊनकाळात एकमेकांचे विवाहबाह्य संबंध खुले झाले. माझ्याकडे गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात लग्न झालेल्या तीन केसेस आल्या. लग्नानंतर लगेचच त्यांना टाळेबंदीचा सामना करावा लागला. तिन्हीही तरुणी करिअरिस्ट होत्या. त्या काळात त्यांना घरच्या कामाची सवय नसल्याचे कुटुंबाला कळून चुकले. तरुणींमध्ये ऐकण्याची वृत्ती राहिलेली नाही. काही तरुणींना समुपदेशनातून हे पटते.

------

काय व्हायला हवंय...

* एकमेकांशी पारदर्शी संवाद हवा.

* एकमेकांना निरपेक्षपणे स्वीकारण्याची वृत्ती हवी.

* एकमेकांवर विश्वास हवा.

* एकमेकांशी जुळवून घ्यायला हवं.

---

टाळेबंदीच्या काळात अनेक लोकांच्या विशेषत: आयटीमधील तरुण-तरुणींच्या नोकऱ्या गेल्या. पगारकपात झाली. त्यामुळे प्रापंचिक आणि पैशावरून वाद सुरू झाले. घरात काम कुणी करायचे? यावरून एकमेकांचा अहंकार आडवा यायला लागला. छोटी भांडणे देखील विकोपाला गेली. मुलीच्या कुटुंबाचा देखील नको तेवढा हस्तक्षेप वाढला. या कारणांमुळे परस्पर संमतीने घटस्फोट घेण्याचे प्रमाण वाढले आहे. गेल्या अडीच वर्षांत परस्परसंमतीने घटस्फोट मिळविण्यासाठी ३ हजार ३५२ दावे दाखल आहेत. त्यातील १ हजार ९१२ घटस्फोटांचे दावे पस्स्परसंमतीने निकाली काढले आहेत. दाव्यांच्या आकडेवारीनुसार घटस्फोटाचे दररोज ५ दावे दाखल होत आहेत. घटस्फोटाचे दावे दाखल झाल्यानंतर कौटुंबिक न्यायालयातील समुपदेशकांकडून जोडप्यांचे समुपदेशन केले जाते. काही प्रकरणांमध्ये जोडप्यातील वाद मिटवून त्यांचा संसार पूर्ववत करण्यास यश मिळाले आहे.

- अॅड. वैशाली चांदणे, अध्यक्ष, दि फॅमिली कोर्ट लॉयर्स असोसिएशन

---

आज जोडप्यांची जुळवून घेण्याची लवचिकता कमी झाली आहे. तरुण पिढीला जुळवणी आणि तडजोड यातला फरक समजून सांगितला पाहिजे. तसं झालं नाही तर त्यातून विवाह विच्छेद हा अटळ आहे. संसाराचा रथ हा दोन चाकांवर चालतो. तो एकत्रितपणे चालण्यासाठी ‘मी’पणाचा प्रवास ‘आम्ही’पर्यंत नेण्याची गरज आहे.

- लीना कुलकर्णी, विवाह समुपदेशक