शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्व भारतीयांचा DNA एकच; हिंदू राष्ट्र म्हणजे...', RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे विधान
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
3
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
4
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
5
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
6
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
7
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
8
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
9
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन् बाहेर फेका
10
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
11
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
12
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
13
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
14
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख
15
झाली का गणपती पूजेची तयारी? काय राहिलं, काय घेतलं? झटपट तपासून घ्या पूजा साहित्य 
16
Nikki Murder Case : "न्यायाच्या बदल्यात न्याय, रक्ताच्या बदल्यात रक्त, आम्ही मुलगी गमावली"; निक्कीच्या आईचा टाहो
17
संधी मिळताच मोलकरणीने मारला डल्ला, घरातून ३५ लाखांचे दागिने, १० लाखांची रक्कम लंपास
18
Yavatmal: 'ती' गोष्ट लपवण्यासाठी रात्रीस 'खेळ'?; ग्रामसभेच्या आदल्या दिवशीच फोडले ग्रामपंचायत कार्यालय अन्...
19
गणपती आगमनाला पाऊस येणं हे तर शुभ लक्षण; यंदाही मुसळधार कोसळण्याची शक्यता 
20
भारताला 'मृत अर्थव्यवस्था' म्हणणाऱ्या ट्रम्प यांची मोठी गुंतवणूक; दरमहा होते कोट्यवधीची कमाई...

प्रतिकूल परिस्थितीतही ३८ खांब उभे करून वीजपुरवठा केला सुरळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:10 IST

भोर : भोर तालुक्यात २२ व २३ जुलै रोजी मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. यात महावितरणचे १२ उच्चदाब ३७ लघुदाब ...

भोर : भोर तालुक्यात २२ व २३ जुलै रोजी मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. यात महावितरणचे १२ उच्चदाब ३७ लघुदाब वाहिनीचे पोल व दोन रोहित्र पडले. मोठ्या पावसाने अनेक ठिकाणी दरडी कोसळणे, रस्ते खचणे, पूल वाहून जाणे, तसेच रस्त्यावर पुलावर पाणी येण्याच्या घटना घडल्या. त्यामुळे अनेक भागांतील वाहतूक बंद होती. पाऊस कमी झाल्यावर व पाणी कमी होताच जिथे पोहोचता येत होते अशा ३८ ठिकाणी पोल उभे करून वीजपुरवठा काल (२४ जुलै) सुरळीत केला आहे.

हिर्डोशी शाखेत दरडी कोसळून, रस्ते वाहून गेल्याने वरंध घाट बंद आहे. त्यामुळे येथील ७ गावांचा अद्याप संपर्क तुटलेला आहे.या गावात पोहोचण्याचे पर्यायी मार्ग तीन आहेत. दुर्गाडी साळुंगण व महाड. मात्र त्यावरही दरडी कोसळल्या असल्याने ते ही मार्ग पूर्ण बंद आहेत.सार्वजनिक बांधकाम खात्यामार्फत व प्रशासकीय यंत्रणांना वाहतुक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या बाबत संबंधित प्रशासनासोबत चर्चा झाली असून, त्यांनी सदर घाटात ३३ ठिकाणी दरड कोसळल्याने रस्ता नादुरुस्त असल्याचे सांगितले आहे. तसेच हे रस्ते चालू होण्यास किमान २ दिवस लागतील असा प्राथमिक अंदाज आहे.शिरगाव पासून पुढील गावांचा संपर्क तुटला आहे.नीरा देवघर धरणाच्या डाव्या बाजूला वरची धानवली, अभेपुरी, दुर्गाडी, कुडली ,मानट वस्ती व वरंध घाटातील शिरगाव, अशिंपी, उंबरडे, शिळिंब, कुंड व राजीवडी या गावातील एकूण ११ रोहित्र व २९५ ग्राहक बंद आहेत.

काल व आज दि २५ जुलै रोजी वरंध घाटात पुढे चालत जाण्याचा प्रयत्न केला.शिरगाव पर्यंत चालत जाता आले त्यापुढे चालत जाणेही सध्या शक्य नाही. सदर वीज वाहिनी दरीतून असून दाट जंगल आहे, दोन्ही बाजूने दरड कोसळले आहेत, तसेच पडणारा पाऊस व धुके असल्याने नक्की आपल्या वाहिनीची काय स्थिती आहे, किती पोल पडले किंवा कसे ? याबाबत आत्ताच कोणतीही निश्चित माहिती नाही.त्यामुळे अद्याप या गावातील वीज पुरवठा सुरळीत करता आलेला नाही.जवळपास २० किमी उच्चदाब वीज वाहिनी सध्या बंद आहे.प्राथमिक अंदाजानुसार उच्चदाब वाहिनीचे किमान २० पोल व २ रोहित्र पडले असल्याचे समजले आहे.

आज दिवसभर दरडी दूर करण्याचे काम सुरू होते.२ किमी रस्ता मोकळा झाल्यास शिरगावच्या पुढे एक कटपॉईंट उभा करून अभेपुरी , दुर्गाडी व मानट वस्ती चे रोहित्र चालू करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.ज्यामुळे ६५ ग्राहकांचा वीज पुरवठा सुरू होईल.उद्या संध्याकाळपर्यंत किती रस्ता मोकळा होईल व पावसाचा अंदाज घेऊन उर्वरित गावे व वाहिनी चालू करण्याचे नियोजन करण्यात येत असल्याचे कार्यकारी अभियता अरविंद वनमोरे व उपकार्यकारी अभियंता संतोष चव्हाण यांनी सांगितले.

पावसाने पडलेले विजेचे खांब उभे करताना वीज वितरण कंपनीचे कर्मचारी