शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
2
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
3
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
4
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?
5
नासाला तगडे आव्हान; ISRO आणि रशियाची ROSCOSMOS एकत्र आली, 'या' मोहिमेवर करणार काम...
6
Nagpur Politics: भाजपची पकड 'मजबूत', १२० जागांचा आकडा आधीच जाहीर; ठाकरेंच्या नेतृत्वाची पुन्हा 'परीक्षा'
7
'नमामि गंगे'चा जगाला आदर्श; 'स्टॉकहोम वॉटर वीक'मध्ये नदी संवर्धनासाठी भारताचे कौतुक
8
'भारताने रशियाचे तेल घेणे बंद केले नाही तर...', ट्रम्प यांच्या सल्लागाराने भारत सरकारला आणखी टॅरिफ वॉरची धमकी दिली
9
Navi Mumbai Traffic: मराठा मोर्चा नवी मुंबईच्या वेशीवर, वाहतुकीत मोठे बदल; कोणते रस्ते बंद, कोणते खुले?
10
संजय गायकवाडांच्या आमदारकीचं काय होणार? ठाकरेंच्या नेत्याने ठोठावले उच्च न्यायालयाचे दार
11
पत्नीचा संताप अनावर झाला, पतीच्या तोंडावर फेकली उकळती चहा; नेमकं झालं तरी काय?
12
संभल समितीनं CM योगींना सादर केला अहवाल, करण्यात आले खळबळजनक खुलासे; जिल्ह्यात फक्त १५% हिंदू उरले!
13
निक्की भाटी प्रकरणात वृद्ध शेजाऱ्याने केला धक्कादायक खुलासा; म्हणाला, 'निक्की जळत होती तेव्हा विपिन...'
14
भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?
15
१ वर्षात केली स्पर्धा परीक्षेची तयारी, पहिल्याच प्रयत्नात यश; MBBS डॉक्टर बनली IAS अधिकारी
16
केस कलर करण्याची हौस बेतली जीवावर; तरुणीसोबत घडलं भयंकर, अवस्था पाहून बसेल धक्का
17
TCS-एचसीएलसह आयटी क्षेत्रात 'भूकंप'! बाजार ७०६ अंकांनी घसरला; या कारणामुळे मोठी घसरण
18
४ महिन्यांपूर्वी झाले होते लग्न, क्षणार्धात मोडले सुखी संसाराचे स्वप्न; वैष्णो देवी दुर्घटनेत चांदनीने गमावला जीव
19
"माझी एवढीच अपेक्षा आहे की कुठलेही..."; मनोज जरांगेंच्या आंदोलनावर CM फडणवीसांनी मांडली स्पष्ट भूमिका
20
'चिता' झेपावला, जवान बनले 'देवदूत'; मृत्यूच्या दाढेतून २७ जणांना बाहेर काढले, पूरग्रस्त भागात लष्कराची सेवा

७४ व्या वर्षातही ‘लालपरी’ मैदान खडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:15 IST

प्रसाद कानडे लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : केवळ एका बसवर सुरू झालेला एसटीचा प्रवास आता १८ हजारपर्यंत पोहोचला आहे. ...

प्रसाद कानडे

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : केवळ एका बसवर सुरू झालेला एसटीचा प्रवास आता १८ हजारपर्यंत पोहोचला आहे. खेड्यापाड्यात एसटी पोहोचली असून, आता ती ७४ वर्षांची झाली आहे. कोरोना काळातही एसटी धावली आणि प्रवाशांना दिलासा दिला. दररोज ६० लाख प्रवाशांची ने-आण करणारी एसटी कोरोना काळात १२ ते १३ लाख प्रवाशांची वाहतूक करीत आहे.

एसटी बस १ जून १९४८ साली झाली. तेव्हा केवळ एका बसवरून सुरू झालेला एसटीचा प्रवास आता १८ हजार गाड्यांपर्यंत पोहोचला. डिसेंबर १९४८ पर्यंत एसटीकडे ५५ गाड्या उपलब्ध होत्या. यात सर्वाधिक गाड्या ह्या पुणे विभागाच्या होत्या. पुणे विभागात ३६ गाडया गाड्या. तेव्हा रोज वीस ते तीस हजार प्रवासी वाहतूक होत असे.

१९३२ साली मुंबई प्रातांत खासगी व्यावसायिकाकडून सार्वजनिक वाहतूक सुरू झाली. १९४८ साली बॉम्बे स्टेट ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन या सरकारी कंपनीची स्थापना होऊन त्याद्वारे सार्वजनिक प्रवासी वाहतूक करण्यात येऊ लागली. त्यावेळी राष्ट्रीयीकरणाची सुरुवात त्या वेळच्या मुंबई प्रांतातील अहमदाबाद येथून झाली. १ जून १९४८ साली पुणे-अहमदनगर दरम्यान पहिली बस बॉम्बे स्टेट ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशनची धावली. नंतर याचे रूपांतर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळमध्ये झाले.

बॉक्स 1

असा होता सुरुवातीचा काळ :

एसटी सुरू झाल्यावर पहिल्या तीन महिन्यांतच २२ गाडया दाखल झाल्या. त्यानंतर डिसेंबर १९४८ अखेरीस ५० गाड्या उपलब्ध झाल्या. या काळात पुणे-नाशिक, पुणे-सोलापूर, पुणे-मुंबई, पुणे-नागपूर अशा गाड्या धावू लागल्या. १९४९ साली १२३ गाड्या घेण्यात आल्या. सुरुवातीला एसटीने शहर एकमेकांना जोडण्याचे काम केले. त्यानंतर राज्यात ज्या प्रमाणात रस्ताची कामे होऊ लागली त्या प्रमाणात एसटीचा विस्तार वाढत गेला. रस्ता तिथे एसटी असे ब्रीद अंगिकारुन शहरापुरती मर्यादित राहिलेली एसटी तालुक्यात पोहोचली आणि नंतर गावा-गावांत मार्च १९५२ पर्यत एसटीचे ११ विभाग तयार झाले होते.

--------------------------

एसटीचा होता सुवर्णकाळ :

१९७५ साली खासगी प्रवासी वाहतूक बंद झाली. आणि हळूहळू एसटीला चांगले दिवस येऊ लागले. १९७८ ते १९८८ हा काळ एसटीचा हा सुवर्णकाळ म्हणून इतिहासात नोंद आहे. त्याकाळी एसटीने प्रवास करणाऱ्यांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली. एसटीचे भारमान हे ८४ इतके राहिले. १२ हजार एसटी संख्या होती आणि त्यातून रोज ६० ते ६२ लाख प्रवासी प्रवास करीत.

--------------------------