शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
3
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
4
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
5
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
6
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
7
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
8
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
9
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
10
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
11
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
12
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
13
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
14
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
15
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
16
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
17
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
18
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
19
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
20
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!

जातीय सलोखा महत्त्वाचा

By admin | Updated: March 6, 2016 01:10 IST

फिर्याद दाखल करणाराचा उद्देश व वस्तुस्थिती समजून घेऊनच प्रशासन व कार्यकर्त्यांनी पावले उचलावीत, असे आवाहन आमदार दत्तात्रय भरणे यांनी शुक्रवारी केले.

इंदापूर : फिर्याद दाखल करणाराचा उद्देश व वस्तुस्थिती समजून घेऊनच प्रशासन व कार्यकर्त्यांनी पावले उचलावीत, असे आवाहन आमदार दत्तात्रय भरणे यांनी शुक्रवारी केले.तालुक्यात मागील काही काळापासून दलित अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हे दाखल झाले. जातीय तेढ निर्माण होईल असे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर जातीय सलोखा टिकून रहावा. विधायक चर्चा घडावी या करीता आयोजित करण्यात आलेल्या शांतता कमिटीच्या बैठकीत अध्यक्षस्थानावरुन भरणे बोलत होते.ते म्हणाले की,बऱ्याचदा गैरसमजातून पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल होतात. व्यक्तीगत भांडणाचे जातीयवादी खटल्यात रुपांतर होते. घटनांचा विपर्यास होतो. आंदोलने छेडली जातात. किरकोळ कारणांवरुन शहर, गावे बंद ठेवली जातात. बाजारपेठा बंद ठेवल्या जातात. ज्यांची रोजीरोटी व्यवसायावर चालते. ज्यांचा दिनक्रम दैनंदिन मिळकतीवर अवलंबून आहे, अशांची त्यामुळे गैरसोय होते,हे लक्षात घेऊनच बंद गरजेचा असेल तरच तो पुकारला जावा.जातीय जोडे बाजूला ठेवून एकत्र यावे.बारामतीचे विभागीय पोलीस अधिकारी बापू बांगर म्हणाले की,आम्ही लोकसेवक आहोत. प्रशासन जनताभिमुख पध्दतीने चालवण्याचा आमचा प्रयत्न असतो. तक्रार आल्यानंतर शहानिशा केल्याशिवाय गुन्हा दाखल करण्यात येत नाही. प्रशासनाकडून रास्त कारवाईची अपेक्षा असेल तर प्रशासनाला नि:पक्षपातीपणे तटस्थपणाने आपले काम करण्याची संधी दिली जावी.याबैठकीस पोलीस निरीक्षक मधुकर शिंदे, तहसीलदार सूर्यकांत येवले, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रदिप गारटकर, रत्नाकर मखरे, शिवसेनेचे विशाल बोंद्रे, संभाजी व्यवहारे, प्रवीण माने, अ‍ॅड. राहुल मखरे, प्रा. कृष्णा ताटे, शिवाजीराव मखरे, बाळासाहेब सरवदे, संदिपान कडवळे, अंकुश जाधव, जिल्हा परिषदेचे सदस्य देवराज जाधव, प्रताप पाटील, कॉग्रेस तालुकाध्यक्ष अ‍ॅड कृष्णाजी यादव, मंगेश पाटील, शेखर पाटील, बाळासाहेब करगळ, अशोक चोरमले, ज्ञानदेव चवरे, दत्ता मिसाळ, नंदकुमार गुजर, बाबजी भोंग, संजय दोशी, नितीन कदम, नितीन आरडे, वसंत आरडे, रमेश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.