शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

कारखान्यांचे इथेनॉल ऑईल कंपन्यांच्या दारात पडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : केंद्र सरकारच्या आदेशावरून साखर कारखान्यांनी तयार केलेल्या इथेनॉलचे टँकर ऑईल कंपन्यांच्या प्रवेशदारात अडकून पडले ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : केंद्र सरकारच्या आदेशावरून साखर कारखान्यांनी तयार केलेल्या इथेनॉलचे टँकर ऑईल कंपन्यांच्या प्रवेशदारात अडकून पडले आहेत. देशभरात हीच स्थिती आहे.

पेट्रोलमध्ये मिसळण्यासाठी इथेनॉल लागते. पेट्रोलचे दर वाढल्यामुळे खप कमी झाला आहे. त्यामुळे ऑईल कंपन्यांकडील इथेनॉलचे साठे पडून आहेत. नव्याने इथेनॉल घेतले तर ते साठवायचे कुठे, असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. नेमकी हीच अडचण साखर कारखान्यांची आहे. केंद्र सरकारने कारखान्यांना इथेनॉल निर्मितीसाठी प्रोत्साहन दिले.

देशभरातील कारखान्यांना इथेनॉल प्रकल्प ‌उभा करण्यासाठी कर्जावरील व्याजावर अनुदान जाहीर केले. कारखान्यांनी ऑइल कंपन्यांबरोबर करार करून इथेनॉल तयार करण्यास सुरुवात केली. त्यांच्याकडेही आता इथेनॉल साठवण्यासाठी टाक्या नाहीत. त्यामुळे करार झाल्याप्रमाणे ते टँकर भरून इथेनॉल ऑईल कंपन्यांकडे पाठवत आहेत व कंपन्या ते घ्यायला तयार नाहीत.

थांबलेल्या टँकर्सचे भाडे व अन्य खर्च कारखान्यांना करावा लागतो आहे. आधीच आर्थिक अडचणीत आलेले राज्यातील इथेनॉलनिर्मिती करणारे कारखाने या नव्या समस्येने हैराण झाले आहेत. ऑईल कंपन्यांकडून रोख पैसे मिळाले तर किमान एफआरपी तरी भागवता येईल, या त्यांच्या विचारापुढेच आता प्रश्नचिन्ह लागले आहे.

कोट

राज्यातल्याच नाही तर देशातील सर्वच कारखान्यांसमोर हा प्रश्न निर्माण झाला आहे. पेट्रोलियम खात्याच्या सचिवांना याबाबत कळवले असून, ते कारखाने व ऑइल कंपन्या अशी संयुक्त बैठक आयोजित करत आहेत.

- जयप्रकाश दांडेगावकर, अध्यक्ष, राज्य साखर संघ

कोट

टँकर अनलोड व्हायला पाचसात दिवस लागत आहेत हे खरे आहे. पेट्रोलचा खप कमी झाला त्यातून ही समस्या तयार झाली. यंदाच्या हंगामातच उत्पादन वाढले आहे. कारखान्यांना त्यांच्याकडे साठवणूक क्षमता करण्यासाठी वेळ लागेल. यावर उपाय काढला जात आहे.

- संजय खताळ, व्यवस्थापकीय संचालक, साखर संघ