शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
2
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
3
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
4
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या निवासस्थानाजवळ मोठा स्फोट
5
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार ट्विटर अकाऊंट बंद
6
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
7
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
8
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
9
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
10
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
11
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
12
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले
13
भारत-पाकिस्तान तणाव: BCCI ची मोठी कारवाई; खेळाडूंना धर्मशालामधून बाहेर काढण्यासाठी विशेष ट्रेन
14
भारताकडून पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्यास सुरुवात, लाहोरवर केला ड्रोन हल्ला, तणाव वाढला!
15
India Pakistan War: पाकिस्तानचा रडीचा डाव, अंधार पडताच केला हल्ला; काय काय घडलं, पहा व्हिडीओ
16
युद्धाची घोषणा होणार? राजनाथ सिंह सीडीएस, तिन्ही आर्मी प्रमुखांच्या भेटीला; मोदी डोवाल एकत्र...
17
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला; पाकने राजस्थान बॉर्डरच्या दिशेने पाठवले रणगाडे, भारतीय सैन्यही सज्ज
18
पाकिस्तानचा मोठा हल्ला उधळला, एफ-१६ जेटच्या उडवल्या ठिकऱ्या, आयएल-१७ एअर डिफेन्स गन सीमेवर तैनात
19
ऑपरेशन सिंदूरबाबत मोठी अपडेट! भारताने हल्ल्यात दोन पाकिस्तानी लढाऊ विमाने पाडली
20
भारताने हाणून पाडला 'नापाक' हल्ल्याचा प्रयत्न! 'या' ठिकाणी पाकिस्तानची मिसाईल्स केली नष्ट

ग्रंथांमध्ये दडले जीवनाचे सार

By admin | Updated: February 6, 2015 00:30 IST

ग्रंथांमध्ये जीवनाचे सार दडलेले आहे. त्याचा प्रसार करीत ज्ञानाचे दान केल्यास मानवता धर्म अधिक समृद्ध होईल आणि विश्वात शांतता प्रस्थापित होईल’’,

पुणे : ‘‘ग्रंथांमध्ये जीवनाचे सार दडलेले आहे. त्याचा प्रसार करीत ज्ञानाचे दान केल्यास मानवता धर्म अधिक समृद्ध होईल आणि विश्वात शांतता प्रस्थापित होईल’’, असे प्रतिपादन माईर्स एमआयटी शिक्षण संस्था समूहाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विश्वनाथ कराड यांनी केले.डॉ. विश्वनाथ कराड यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त एमआयटी संस्थेच्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांतर्फे त्यांची ग्रंथतुला करण्यात आली. त्या वेळी ते बोलत होते. ज्ञानेश्वरी, भगवद्गीता, कुराण, बायबल, तुकारामगाथा, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यासह स्वामी विवेकानंदांनी लिहिलेल्या ग्रंथांचा या तुलेमध्ये समावेश होता. तुला केलेले ग्रंथ एमआयटी समूहातील सर्व संस्थांच्या प्रमुख, प्राचार्य, विभागप्रमुखांना देण्यात आले. या प्रसंगी ऊर्मिला कराड, पंडित वसंतराव गाडगीळ, उषा कराड, नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. एस. एन. पठाण, काशीराम कराड, प्रभू घुले, डॉ. चंद्रकांत पांडव, प्रा. शरदचंद्र दराडे पाटील, एमआयटीचे कुलसचिव एस.व्ही. कुलकर्णी, कार्यकारी संचालक डॉ. मंगेश कराड, प्रा. राहुल कराड उपस्थित होते. (प्रतिनिधी)पुढील पिढीने ज्ञानदान सुरू ठेवावे४वसंतराव गाडगीळ म्हणाले, ‘‘प्रा. डॉ. विश्वनाथ कराड यांची झालेली ग्रंथतुला ही त्यांनी केलेल्या ज्ञानदानाच्या कार्याची पूजा आहे. या ग्रंथतुलेतील ग्रंथ ज्ञानदीप आहेत. त्यामुळे या ग्रंथांचे सर्वांनी वाचन करून त्यातला मथितार्थ समजून घ्यायला हवा. एमआयटीतील पुढील पिढीने कराड यांचा वारसा पुढे नेत ज्ञानदानाचे कार्य नियमितपणे चालू ठेवावे. अध्यात्माचा अर्थ समजला४प्रा. कराड म्हणाले, ‘‘वडिल भगिनी प्रयागअक्कांनी मला जगण्याची प्रेरणा दिली. अध्यात्माचा खरा अर्थ समजून सांगितला. दुसऱ्यासाठी कायम झीजत राहाण्याची शिकवण मोठ्या भावाने दिली. ४महापौर दत्तात्रय धनकवडे, ज्येष्ठ संगणकतज्ज्ञ डॉ. विजय भटकर, ज्येष्ठ विधिज्ञ डॉ. उज्ज्वल निकम, ज्येष्ठ अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. के. एच. संचेती, उद्योजक अरुण फिरोदिया, ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल, श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, डॉ. सुरेश घैसास, डॉ. चंद्रकांत पांडव, एमआयटीचे उपाध्यक्ष राहुल कराड, कार्यकारी संचालक डॉ. मंगेश कराड आदी उपस्थित होते.समाजासाठी झिजणे आनंददायी ४धार्मिक वृत्तीचा आणि अंधश्रद्धा जोपासणारा देश अशी भारताची प्रतिमा पाश्चिमात्य देशांनी केल्याची खंत माझ्या मनात आहे. ही प्रतिमा बदलण्यासाठी विज्ञान आणि अध्यात्माचा संगम करण्याचा माझा प्रयत्न आहे. एका जागी बसून गंजण्यापेक्षा समाजासाठी कार्य करीत झिजणे अधिक आनंददायी आहे. त्यामुळे भविष्यातही मी जिद्दीने काम करीत राहणार आहे, अशी कृतज्ञापूर्वक भावना माईर्स एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विश्वनाथ कराड यांनी व्यक्त केली.४एमआयटी शिक्षणसंस्था समूहातील संचालक, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि समाजातील प्रतिष्ठित मंडळींतर्फे कराड यांचा अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सत्कार करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते.