शहरं
Join us  
Trending Stories
1
"भाजपाशी अनैतिक संबंध तोडावेत, जसं 'वर्षा'वर हक्कानं जाता, तसं 'मातोश्री'वर यावं" 
2
मराठा आरक्षण सुनावणी होणार जलद; हायकोर्टात विशेष पूर्णपीठ स्थापन; SCच्या आदेशानंतर पाऊल
3
अफगाणिस्तानला भारताचा मदतीचा हात! अटारी मार्गे केली विशेष मदत; पाकिस्तानला दाखवून दिले
4
आजचे राशीभविष्य १७ मे २०२५ : नोकरदारांना नोकरीत लाभ होईल, जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस
5
भारताला हवेत हाफिज सईद, मसूद अझहर, दाऊद इब्राहिम; मोस्ट वाँटेडची यादी पाकला सोपवणार
6
‘सेलेबी’ला काम नको; आयबीचा होता इशारा, सुरक्षेविषयी नवीन प्रश्न निर्माण होण्याची भीती
7
भारत आता पाकिस्तानवर ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ करणार; ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती जगात पोहोचवणार
8
आगळीक करू नका, ‘ऑपरेशन सिंदूर’ हा फक्त ट्रेलर, गरज पडल्यास पूर्ण ‘पिक्चर’ दाखवू: राजनाथ सिंह
9
अफगाणिस्तानातून पाकची जलकोंडी होण्याची शक्यता; शाहतूत धरणास भारताचे आर्थिक, तांत्रिक सहकार्य
10
‘८६४७’ म्हणजे थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा संदेश? जेम्स कॉमी यांच्या पोस्टमुळे खळबळ
11
मध्य प्रदेशच्या मंत्र्यानंतर आता उपमुख्यमंत्र्यांचेही विधान चर्चेत; काँग्रेसची भाजपावर टीका
12
पाक समर्थक तुर्की, अझरबैजानशी  कोणताही व्यापार, पर्यटन नाही; भारतीय व्यापाऱ्यांचा बहिष्कार
13
“तणावाच्या पार्श्वभूमीवर तुर्की, अझरबैजानसोबत करार करू नका”; याआधीचे करार रद्द करायचा निर्णय
14
मुंबईत तळ ठोकून असणाऱ्या २५० बांगलादेशींना घरचा रस्ता; २ दिवसांत पोलिसांची मोठी धडक कारवाई
15
राजकीय नेत्यांना चढला महापालिका निवडणुकीचा ज्वर! स्थानिक प्रश्नांकडे लक्ष, भेटीगाठी सुरू
16
...आता सहपोलिस आयुक्त गुप्तवार्ता; आयपीएस डॉ. आरती सिंह यांच्याकडे जबाबदारी
17
तिन्ही मार्गावर मुंबईत उद्या ‘मेगा ब्लॉक डे’; पश्चिम, मध्य, हार्बरवरील वेळापत्रक कसे असेल?
18
मुंबई सेंट्रल स्थानकावर पहिले डिजिटल लाउंज; केवळ प्रवासी नाही तर नागरिकांनाही लाभ मिळणार
19
दारूच्या नशेत बेभान कंटेनर चालकाने वाहनांसह २० नागरिकांना उडविले; बीडमधील थरार, महिला ठार
20
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर

टंचाई मिटविण्यासाठी जिल्ह्यात ४२ कोटी ८७ लाखांना मंजुरी

By admin | Updated: September 29, 2015 02:21 IST

जलयुक्त शिवार योजनेमुळे यंदा दुष्काळी परिस्थितीतही काहीसा दिलासा मिळाल्यामुळे जिल्हा परिषदेमार्फत यंदा जिल्ह्यातील टंचाईग्रस्त गावांना पाणीदार करण्यासाठी

पुणे : जलयुक्त शिवार योजनेमुळे यंदा दुष्काळी परिस्थितीतही काहीसा दिलासा मिळाल्यामुळे जिल्हा परिषदेमार्फत यंदा जिल्ह्यातील टंचाईग्रस्त गावांना पाणीदार करण्यासाठी येत्या वर्षांत ४२ कोटी ८७ लाखांची कामे हाती घेण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रदीप कंद यांनी सांगितले. यात आंबेगाव तालुक्याला सर्वाधिक निधी, तर दौंड तालुक्यात सर्वाधिक कामे होणार आहेत.या वर्षी जूनची सरासरी ओलांडल्यानंतर पावसाने दोन महिने दडी मारली होती. त्यामुळे पाणीटंचाईची गंभीर समस्या निर्माण झाली होती. श्रावण महिन्यातही ४९ टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला. त्यानंतर सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात परतीचा चांगला पाऊस झाला. हा पाऊस प्राधान्याने जलयुक्तची ज्या भागात कामे सुरू आहेत त्या परिसरात झाल्याने येथे चांगला पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे या परिसराला काहीसा दिलासा मिळाला आहे. यामुळे जिल्हा परिषदेच्या पाटबंधारे विभागामार्फत २0१५-१६ या वर्षासाठी ४२ कोटी ८७ लाखांच्या कामांना मंजुरी दिली आहे. यातून को.प. बंधारे, साठवण बंधारे, वळण बंधारे, पाझर तलाव तसेच दुरुस्तीची कामे घेतली जाणार आहेत. यात ४0१.२५ लाखांचा सर्वाधिक निधी हा आंबेगाव तालुक्याला मिळाला असून, यातून १८ कामे हाती घेण्यात येणार आहेत. तर, सर्वांत कमी ११६.६२ लाखांचा निधी वेल्हे तालुक्याला मिळाला असून, ६ कामे घेण्यात येणार आहेत. गेल्या वर्षी जिल्हा परिषदेमार्फत जलयुक्त शिवारच्या माध्यमातून सुमारे ३ कोटी ९४ लाखांची कामे केली आहेत. जी गावे टंचाईग्रस्त आहेत, त्या गावांना जादाचा निधी देण्यात आला असून, तेथे नवीन कामे व पूर्वीच्या कामांची दुरुस्ती करण्यात येणार आहे. या कामांमुळे त्या भागातील भूजलाची पाण्याची पातळी वाढून तेथील पाणीटंचाई दूर होण्यास मदत होणार असल्याचे कंद यांनी सांगितले.