शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
3
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
4
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
5
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
6
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
7
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
8
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
9
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
10
Amravati: मेहुणाच निघाला अतुल पुरींच्या हत्येचा मास्टरमाईंड; ५ लाखांत दिली खुनाची सुपारी, हत्येसाठी अल्पवयीन मुलांचा वापर
11
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?
12
नासाला तगडे आव्हान; ISRO आणि रशियाची ROSCOSMOS एकत्र आली, 'या' मोहिमेवर करणार काम...
13
Nagpur Politics: भाजपची पकड 'मजबूत', १२० जागांचा आकडा आधीच जाहीर; ठाकरेंच्या नेतृत्वाची पुन्हा 'परीक्षा'
14
'नमामि गंगे'चा जगाला आदर्श; 'स्टॉकहोम वॉटर वीक'मध्ये नदी संवर्धनासाठी भारताचे कौतुक
15
'भारताने रशियाचे तेल घेणे बंद केले नाही तर...', ट्रम्प यांच्या सल्लागाराने भारत सरकारला आणखी टॅरिफ वॉरची धमकी दिली
16
Navi Mumbai Traffic: मराठा मोर्चा नवी मुंबईच्या वेशीवर, वाहतुकीत मोठे बदल; कोणते रस्ते बंद, कोणते खुले?
17
संजय गायकवाडांच्या आमदारकीचं काय होणार? ठाकरेंच्या नेत्याने ठोठावले उच्च न्यायालयाचे दार
18
पत्नीचा संताप अनावर झाला, पतीच्या तोंडावर फेकली उकळती चहा; नेमकं झालं तरी काय?
19
संभल समितीनं CM योगींना सादर केला अहवाल, करण्यात आले खळबळजनक खुलासे; जिल्ह्यात फक्त १५% हिंदू उरले!
20
निक्की भाटी प्रकरणात वृद्ध शेजाऱ्याने केला धक्कादायक खुलासा; म्हणाला, 'निक्की जळत होती तेव्हा विपिन...'

टंचाई मिटविण्यासाठी जिल्ह्यात ४२ कोटी ८७ लाखांना मंजुरी

By admin | Updated: September 29, 2015 02:21 IST

जलयुक्त शिवार योजनेमुळे यंदा दुष्काळी परिस्थितीतही काहीसा दिलासा मिळाल्यामुळे जिल्हा परिषदेमार्फत यंदा जिल्ह्यातील टंचाईग्रस्त गावांना पाणीदार करण्यासाठी

पुणे : जलयुक्त शिवार योजनेमुळे यंदा दुष्काळी परिस्थितीतही काहीसा दिलासा मिळाल्यामुळे जिल्हा परिषदेमार्फत यंदा जिल्ह्यातील टंचाईग्रस्त गावांना पाणीदार करण्यासाठी येत्या वर्षांत ४२ कोटी ८७ लाखांची कामे हाती घेण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रदीप कंद यांनी सांगितले. यात आंबेगाव तालुक्याला सर्वाधिक निधी, तर दौंड तालुक्यात सर्वाधिक कामे होणार आहेत.या वर्षी जूनची सरासरी ओलांडल्यानंतर पावसाने दोन महिने दडी मारली होती. त्यामुळे पाणीटंचाईची गंभीर समस्या निर्माण झाली होती. श्रावण महिन्यातही ४९ टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला. त्यानंतर सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात परतीचा चांगला पाऊस झाला. हा पाऊस प्राधान्याने जलयुक्तची ज्या भागात कामे सुरू आहेत त्या परिसरात झाल्याने येथे चांगला पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे या परिसराला काहीसा दिलासा मिळाला आहे. यामुळे जिल्हा परिषदेच्या पाटबंधारे विभागामार्फत २0१५-१६ या वर्षासाठी ४२ कोटी ८७ लाखांच्या कामांना मंजुरी दिली आहे. यातून को.प. बंधारे, साठवण बंधारे, वळण बंधारे, पाझर तलाव तसेच दुरुस्तीची कामे घेतली जाणार आहेत. यात ४0१.२५ लाखांचा सर्वाधिक निधी हा आंबेगाव तालुक्याला मिळाला असून, यातून १८ कामे हाती घेण्यात येणार आहेत. तर, सर्वांत कमी ११६.६२ लाखांचा निधी वेल्हे तालुक्याला मिळाला असून, ६ कामे घेण्यात येणार आहेत. गेल्या वर्षी जिल्हा परिषदेमार्फत जलयुक्त शिवारच्या माध्यमातून सुमारे ३ कोटी ९४ लाखांची कामे केली आहेत. जी गावे टंचाईग्रस्त आहेत, त्या गावांना जादाचा निधी देण्यात आला असून, तेथे नवीन कामे व पूर्वीच्या कामांची दुरुस्ती करण्यात येणार आहे. या कामांमुळे त्या भागातील भूजलाची पाण्याची पातळी वाढून तेथील पाणीटंचाई दूर होण्यास मदत होणार असल्याचे कंद यांनी सांगितले.