शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
4
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
5
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
6
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
7
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
8
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
9
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
10
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
11
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
12
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
13
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
14
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
15
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
16
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
17
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
18
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
19
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
20
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
Daily Top 2Weekly Top 5

काळाच्या ओघात ‘वाघबारस’ उरला केवळ नैवेद्यापुरता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2016 01:17 IST

वाघासारख्या हिंस्त्र श्वापदापासून गाईगुरांचे संरक्षण व्हावे म्हणून पौष महिन्यात ग्रामीण भागात वाघबारस साजरी करण्याची प्रथा आहे.

नीलेश काण्णव,  भीमाशंकरवाघासारख्या हिंस्त्र श्वापदापासून गाईगुरांचे संरक्षण व्हावे म्हणून पौष महिन्यात ग्रामीण भागात वाघबारस साजरी करण्याची प्रथा आहे. पण, काळाच्या ओघात वाघबारस ही प्रथा नेवेद्यापुरती मर्यादित राहण्याची परिस्थिती आहे. सध्या वाघबारसच्या दिवशी जुने -जाणते ग्रामस्थ वाघदेवाच्या मंदिरात खिरीचा नैवेद्य दाखवतात. रानात जनावरे चरत असताना हिंस्त्र श्वापदांपासून आपल्या गाईगुरांचे संरक्षण व्हावे, यासाठी वाघोबाच्या मंदिरात पौष महिन्याच्या शुद्ध आणि वद्य १२ या दिवशी ‘वाघबारस’ म्हणून साजरी केली जाते. या वर्षी आज (दि. २१) वाघबारस आहे. आदिवासी भागात अनेक ठिकाणी वाघदेवाची मंदिरे आहेत. आंबेगाव तालुक्यात पोखरीजवळ वैदवाडी येथे, तर पिंपरगणे गावाजवळ वाघोबाची मंदिरे आहेत. कोकणातही वाघोबाची मंदिरे आहेत. पण वाघबारस साजरी करण्याची प्रथा आता लोप पावत चालली आहे. वाघ संपले, भीती राहिली नाही. भीती गेल्यामुळे वाघबारसही आदिवासी विसरू लागले. आदिवासींनी वाघाला देव मानले आहे. म्हणूनच काही भागांत वाघोबाची मंदिरे पाहावयास मिळतात. अनेक ग्रामदैवतांच्या मंदिराच्या बाहेर वाघांच्या मूर्ती आहेत. या सणाच्या आधी एक महिना आदिवासींचे सारे देव रानात पारध करण्यासाठी गेलेले असतात. ते वाघबारसेला घरी येतात. त्यामुळे या दिवसाला आदिवासी जीवनात एक वेगळे महत्त्व आहे. वाघबारसच्या निमित्ताने लोक शेतकाम बंद ठेवतात. पूर्वी बहुसंख्य आदिवासी कुटुंबात पन्नासपेक्षा जास्त पाळीव जनावरे असत. त्यांच्या निगराणीसाठी गुराखी असत. नवीन कपडे परिधान करून गुराखी आनंदोत्सव साजरा करत. आता जनावरे फार कमी झाली. या निमित्ताने होणारे पारंपरिक कार्यक्रम मात्र विस्मरणात गेले आहेत. वाघबारसला गुराखी प्रत्येक घरातून तांदूळ, गूळ व थोडे पैसे गोळा करून संध्याकाळी गावातील सर्व गुरे वाघोबाच्या मंदिराजवळ एकत्र आणत. या ठिकाणी गावातील प्रमुख मंडळी, मुले, मुली एकत्र येत. गाईचे शेण, गोमूत्राने वाघोबाच्या मंदिराचा संपूर्ण परिसर शिंपडला जाई. खिरीचा नैवेद्य ठेवून सगळे प्रसाद खात असत. रात्री आठनंतर येथे कोणीही थांबत नसे. गावातील मारुती व गावदेवाच्या देवळासमोर शेकोटी पेटविली जाई. सगळे लोक तेथे जमत. गुराखी मुले वाघ, अस्वल, कोल्हा अशी रूपे घेऊन खेळ खेळत. उरलेली खीर खेळासाठी वापरली जाई. एखाद्याला वाघ बनवले जाई. या वाघाला पळायला लावून त्याच्या पाठीवर गरम खीर टाकली जाई. ‘आमच्या शिवेत येशील का’असे विचारले जाई. वाघ झालेला गुराखी ‘नाही नाही’म्हणत असे. असे खेळ होत होते. (वार्ताहर)