शहरं
Join us  
Trending Stories
1
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
2
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
3
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
4
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
5
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
6
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
7
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
8
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
9
अंधश्रद्धेचा कळस! ११ वर्षे मूल नाही, मांत्रिकाची महिलेला मारहाण; पाजलं घाणेरडं पाणी, झाला मृत्यू
10
नाशिकच्या सिडकोत भर रस्त्यात वृद्धाचा खुन; दहा दिवसांत दुसरी घटना 
11
Sonu Sood : बैल पाठवतो म्हटला होता, मदत केली का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर सोनू सूदनं बँक स्टेटमेंट केलं शेअर
12
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
13
'पंचायत'च्या प्रधानजींचे होते विवाहबाह्य संबंध, 'या' अभिनेत्याच्या पत्नीसोबत चाललं अफेअर
14
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?
15
“हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका दुटप्पी”: हर्षवर्धन सपकाळ
16
भाजप आमदाराच्या मुलाच्या गाडीची दुचाकीला धडक; रुग्णालयात नेईपर्यंत तरुणाने सोडले प्राण
17
"जनसुरक्षा कायदा हा हुकूमशाहीचा परमोच्च बिंदू, फडणविसांचे हुकूमशाही मनसुबे हाणून पाडा", जनसुरक्षा कायद्याला काँग्रेसचा विरोध
18
MS धोनीच्या मार्गात आला अडथळा! Captain Cool Trademark अर्जावर आक्षेप, कारण...
19
म्हणे, यांना इंग्रजी येत नाही, त्यांच्या देशात परत पाठवा; ब्रिटिश महिलेची भारतीय कर्मचाऱ्यांवर आगपाखड
20
ट्रम्प टॅरिफचा बाजारावर परिणाम नाही? कोटक महिंद्रात सर्वाधिक वाढ, तर घसरणाऱ्यांमध्ये टाटाचा शेअर

काळाच्या ओघात ‘वाघबारस’ उरला केवळ नैवेद्यापुरता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2016 01:17 IST

वाघासारख्या हिंस्त्र श्वापदापासून गाईगुरांचे संरक्षण व्हावे म्हणून पौष महिन्यात ग्रामीण भागात वाघबारस साजरी करण्याची प्रथा आहे.

नीलेश काण्णव,  भीमाशंकरवाघासारख्या हिंस्त्र श्वापदापासून गाईगुरांचे संरक्षण व्हावे म्हणून पौष महिन्यात ग्रामीण भागात वाघबारस साजरी करण्याची प्रथा आहे. पण, काळाच्या ओघात वाघबारस ही प्रथा नेवेद्यापुरती मर्यादित राहण्याची परिस्थिती आहे. सध्या वाघबारसच्या दिवशी जुने -जाणते ग्रामस्थ वाघदेवाच्या मंदिरात खिरीचा नैवेद्य दाखवतात. रानात जनावरे चरत असताना हिंस्त्र श्वापदांपासून आपल्या गाईगुरांचे संरक्षण व्हावे, यासाठी वाघोबाच्या मंदिरात पौष महिन्याच्या शुद्ध आणि वद्य १२ या दिवशी ‘वाघबारस’ म्हणून साजरी केली जाते. या वर्षी आज (दि. २१) वाघबारस आहे. आदिवासी भागात अनेक ठिकाणी वाघदेवाची मंदिरे आहेत. आंबेगाव तालुक्यात पोखरीजवळ वैदवाडी येथे, तर पिंपरगणे गावाजवळ वाघोबाची मंदिरे आहेत. कोकणातही वाघोबाची मंदिरे आहेत. पण वाघबारस साजरी करण्याची प्रथा आता लोप पावत चालली आहे. वाघ संपले, भीती राहिली नाही. भीती गेल्यामुळे वाघबारसही आदिवासी विसरू लागले. आदिवासींनी वाघाला देव मानले आहे. म्हणूनच काही भागांत वाघोबाची मंदिरे पाहावयास मिळतात. अनेक ग्रामदैवतांच्या मंदिराच्या बाहेर वाघांच्या मूर्ती आहेत. या सणाच्या आधी एक महिना आदिवासींचे सारे देव रानात पारध करण्यासाठी गेलेले असतात. ते वाघबारसेला घरी येतात. त्यामुळे या दिवसाला आदिवासी जीवनात एक वेगळे महत्त्व आहे. वाघबारसच्या निमित्ताने लोक शेतकाम बंद ठेवतात. पूर्वी बहुसंख्य आदिवासी कुटुंबात पन्नासपेक्षा जास्त पाळीव जनावरे असत. त्यांच्या निगराणीसाठी गुराखी असत. नवीन कपडे परिधान करून गुराखी आनंदोत्सव साजरा करत. आता जनावरे फार कमी झाली. या निमित्ताने होणारे पारंपरिक कार्यक्रम मात्र विस्मरणात गेले आहेत. वाघबारसला गुराखी प्रत्येक घरातून तांदूळ, गूळ व थोडे पैसे गोळा करून संध्याकाळी गावातील सर्व गुरे वाघोबाच्या मंदिराजवळ एकत्र आणत. या ठिकाणी गावातील प्रमुख मंडळी, मुले, मुली एकत्र येत. गाईचे शेण, गोमूत्राने वाघोबाच्या मंदिराचा संपूर्ण परिसर शिंपडला जाई. खिरीचा नैवेद्य ठेवून सगळे प्रसाद खात असत. रात्री आठनंतर येथे कोणीही थांबत नसे. गावातील मारुती व गावदेवाच्या देवळासमोर शेकोटी पेटविली जाई. सगळे लोक तेथे जमत. गुराखी मुले वाघ, अस्वल, कोल्हा अशी रूपे घेऊन खेळ खेळत. उरलेली खीर खेळासाठी वापरली जाई. एखाद्याला वाघ बनवले जाई. या वाघाला पळायला लावून त्याच्या पाठीवर गरम खीर टाकली जाई. ‘आमच्या शिवेत येशील का’असे विचारले जाई. वाघ झालेला गुराखी ‘नाही नाही’म्हणत असे. असे खेळ होत होते. (वार्ताहर)