शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

देवनामांमुळे पर्यावरणातील वृक्ष आजही सुरक्षित

By admin | Updated: May 10, 2017 03:44 IST

फार पूर्वीपासून पर्यावरणातील काही वृक्षांना देवांची नावे देऊन या वृक्षांचा ‘देववृक्ष’ म्हणून उल्लेख होऊ लागला तसेच या वृक्षांना

लोकमत न्यूज नेटवर्कखोडद : फार पूर्वीपासून पर्यावरणातील काही वृक्षांना देवांची नावे देऊन या वृक्षांचा ‘देववृक्ष’ म्हणून उल्लेख होऊ लागला तसेच या वृक्षांना देवासमान ‘स्थान’ही मिळाले. पूर्वीपासूनच पिंपळ, उंबर, वड, कडूनिंब आदी वृक्षांना जळाऊ लाकूड म्हणून न वापरता त्यांची पूजाअर्चा करून संरक्षण केले जाऊ लागले आणि तेव्हापासूनच पर्यावरणातील काही वृक्ष आजही सुरक्षित आहेत. नैसर्गिक दृष्टिकोन ठेवून आणि पर्यावरणाबाबत सकारात्मक विचार केल्यास वृक्षांना दिलेली देवांची जोड पर्यावरणाच्या दृष्टीने नक्कीच हितकारक ठरत आहे.सध्याच्या काळात औदुंबराचे स्थान असलेला उंबर, मुंजोबाचे स्थान असलेला पिंपळ, महादेवाचे प्रिय पर्ण असलेले बेलाचे झाड, गुढी पाडव्यासाठी कडूनिंब, शुभकायार्साठी अग्रस्थानी असलेला आंबा, वटपौर्णिमेला दीर्घायुषी म्हणून ओळखला जाणारा वड या सर्वच वृक्षांना मानवी जीवनात व सणावारांत महत्त्वाचे स्थान असल्याने व त्यांचे दैवतीकरण झाल्याने हे वृक्ष आजही काही प्रमाणात देवनामांमुळे सुरक्षित आहेत.अवघ्या विश्वाला शांततेचा, प्रेमाचा, मित्रत्वाचा, बंधुत्वाचा, समतेचानआणि संतुलित नैसर्गिक पर्यावरणाचा संदेश देणाऱ्या महामानव तथागत गौतम बुद्धांचा जन्म ज्या ‘जोडशालवृक्षा’खाली म्हणजेच ‘सालवृक्षा’खाली झाला, असा विशेष महत्त्व असणारा हा सालवृक्ष महाराष्ट्रात तरी दुर्मिळ आहे. तथागत बुद्धांनी जीवनप्रवासात वने व वनांमधील वृक्षांना महत्त्वाचे स्थान दिले आहे.सप्तपर्णी, पळस, पाटला, पिंपर्णी, मोई, नागचाफा, अर्जुन, शोण (टेटू), सरल, कडूनिंब, वेळू, सोनचाफा, मुचकंद, बीजा (बिवला), आवळा, आंबा, जोडशाल (साल), शिरीष, उंबर, वड, पिंपळ, कदंब, जांभूळ हे सर्व वृक्ष पक्षी, प्राणी व मानव यांना उपयुक्त व औषधी आहेत. या वृक्षांमुळे पक्षी, प्राणी व मानवाची अन्न व निवारा गरजा भागत होत्या; मात्र अलीकडच्या काळात हे वृक्ष पर्यावरणातून कमी होऊ लागले आहेत, ही चिंतेची व गंभीर बाब आहे.तथागत गौतम बुद्धांचा जन्म, त्यांचा संपूर्ण जीवनप्रवास आणि त्यांचे महापरिनिर्वाण या सर्व महत्त्वपूर्ण घटना वनांमध्येच घडल्या आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे तथागतांचा जन्म व महापरिनिर्वाण देखील याच ‘सालवृक्षा’खालीच झाले. तथागत गौतम बुद्धांच्या जीवनात पर्यावरणाला आणि वृक्षांना अनन्यसाधारण महत्त्व आहे.