शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
2
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
3
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
4
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
5
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
6
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
7
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
8
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
9
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
10
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
11
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
12
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
13
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
14
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
15
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
16
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
17
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
18
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
19
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
20
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?

देवनामांमुळे पर्यावरणातील वृक्ष आजही सुरक्षित

By admin | Updated: May 10, 2017 03:44 IST

फार पूर्वीपासून पर्यावरणातील काही वृक्षांना देवांची नावे देऊन या वृक्षांचा ‘देववृक्ष’ म्हणून उल्लेख होऊ लागला तसेच या वृक्षांना

लोकमत न्यूज नेटवर्कखोडद : फार पूर्वीपासून पर्यावरणातील काही वृक्षांना देवांची नावे देऊन या वृक्षांचा ‘देववृक्ष’ म्हणून उल्लेख होऊ लागला तसेच या वृक्षांना देवासमान ‘स्थान’ही मिळाले. पूर्वीपासूनच पिंपळ, उंबर, वड, कडूनिंब आदी वृक्षांना जळाऊ लाकूड म्हणून न वापरता त्यांची पूजाअर्चा करून संरक्षण केले जाऊ लागले आणि तेव्हापासूनच पर्यावरणातील काही वृक्ष आजही सुरक्षित आहेत. नैसर्गिक दृष्टिकोन ठेवून आणि पर्यावरणाबाबत सकारात्मक विचार केल्यास वृक्षांना दिलेली देवांची जोड पर्यावरणाच्या दृष्टीने नक्कीच हितकारक ठरत आहे.सध्याच्या काळात औदुंबराचे स्थान असलेला उंबर, मुंजोबाचे स्थान असलेला पिंपळ, महादेवाचे प्रिय पर्ण असलेले बेलाचे झाड, गुढी पाडव्यासाठी कडूनिंब, शुभकायार्साठी अग्रस्थानी असलेला आंबा, वटपौर्णिमेला दीर्घायुषी म्हणून ओळखला जाणारा वड या सर्वच वृक्षांना मानवी जीवनात व सणावारांत महत्त्वाचे स्थान असल्याने व त्यांचे दैवतीकरण झाल्याने हे वृक्ष आजही काही प्रमाणात देवनामांमुळे सुरक्षित आहेत.अवघ्या विश्वाला शांततेचा, प्रेमाचा, मित्रत्वाचा, बंधुत्वाचा, समतेचानआणि संतुलित नैसर्गिक पर्यावरणाचा संदेश देणाऱ्या महामानव तथागत गौतम बुद्धांचा जन्म ज्या ‘जोडशालवृक्षा’खाली म्हणजेच ‘सालवृक्षा’खाली झाला, असा विशेष महत्त्व असणारा हा सालवृक्ष महाराष्ट्रात तरी दुर्मिळ आहे. तथागत बुद्धांनी जीवनप्रवासात वने व वनांमधील वृक्षांना महत्त्वाचे स्थान दिले आहे.सप्तपर्णी, पळस, पाटला, पिंपर्णी, मोई, नागचाफा, अर्जुन, शोण (टेटू), सरल, कडूनिंब, वेळू, सोनचाफा, मुचकंद, बीजा (बिवला), आवळा, आंबा, जोडशाल (साल), शिरीष, उंबर, वड, पिंपळ, कदंब, जांभूळ हे सर्व वृक्ष पक्षी, प्राणी व मानव यांना उपयुक्त व औषधी आहेत. या वृक्षांमुळे पक्षी, प्राणी व मानवाची अन्न व निवारा गरजा भागत होत्या; मात्र अलीकडच्या काळात हे वृक्ष पर्यावरणातून कमी होऊ लागले आहेत, ही चिंतेची व गंभीर बाब आहे.तथागत गौतम बुद्धांचा जन्म, त्यांचा संपूर्ण जीवनप्रवास आणि त्यांचे महापरिनिर्वाण या सर्व महत्त्वपूर्ण घटना वनांमध्येच घडल्या आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे तथागतांचा जन्म व महापरिनिर्वाण देखील याच ‘सालवृक्षा’खालीच झाले. तथागत गौतम बुद्धांच्या जीवनात पर्यावरणाला आणि वृक्षांना अनन्यसाधारण महत्त्व आहे.