शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान युद्धाच्या तोंडावर आयएमएफ देणार १ अब्ज डॉलर; पाकिस्तानच्या बेलआऊट पॅकेजला मंजुरी
2
Pakistan Drone Attack: बारामुल्लापासून भूजपर्यंत पाकिस्तानकडून २६ ठिकाणी ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, भारतीय सुरक्षा यंत्रणांनी उधळले मनसुबे 
3
पंतप्रधान नरेंद्र मोदींची अजित डोवाल यांच्यासोबत बैठक, परिस्थितीचा घेतला आढावा, पुढचा प्लॅन तयार?  
4
Video: 'नीच' पाकिस्तानचे भारतीय नागरिकांवर ड्रोन हल्ले; फिरोजपूरमध्ये संपूर्ण कुटुंब जखमी
5
रात्र वैऱ्याची! दोन्ही देश रात्रीचेच हल्ले का करत आहेत? मागे कारण काय... अंधार पडला की...
6
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
7
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
8
हे आहेत तुर्कीचे ड्रोन, ज्यांना पाकिस्तानने विध्वंस घडवण्यासाठी पाठवले होते भारतात, अशी आहेत वैशिष्टे
9
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
10
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
11
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
12
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
13
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
14
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
15
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
16
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
17
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
18
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
19
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
20
समसप्तक नीचभंग राजयोग: ९ राशींना सुवर्ण काळ, अडकलेले पैसे मिळतील; शेअर बाजारात नफा, शुभ-लाभ!

प्रवेशोत्सवाने विद्यार्थी भारावले

By admin | Updated: June 15, 2015 23:59 IST

महापालिकेच्या तसेच सर्व खासगी शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प, पुस्तके, गणवेश देऊन स्वागत केले.

पिंपरी : महापालिकेच्या तसेच सर्व खासगी शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प, पुस्तके, गणवेश देऊन स्वागत केले. विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले. पालिकेच्या पदाधिकाऱ्यांनीही विद्यार्थ्यांचे स्वागत केले. उन्हाळ्याची सुटी संपल्यानंतर सोमवारपासून शाळा सुरू झाल्या. शाळेचा पहिला दिवस असल्याने विद्यार्थ्यांची शाळेत जाण्याची लगबग सर्वत्र पाहायला मिळाली. गेले दीड महिना सुटीमुळे आळसावलेली मुले आज शाळेत येताना मोठ्या उत्साहात दिसत होती. अनेक दिवस मित्रांपासून दूर असल्यामुळे त्यांना भेटण्याची हुरहुर विद्यार्थ्यांना लागली होती. शाळा सुरू झाल्यामुळे मुलांना वेळेत शाळेत सोडविण्यासाठी पालकांचीही तारांबळ उडाली होती. सर्वच शाळांसमोर पालकांची गर्दी पाहायला मिळाली. सुटीत कुठे गेला होता, काय-काय मजा केली, असे उत्सुकतेपोटी मुले एकमेकांना विचारत होती. शाळा आवारात वेळेआधीच गर्दी झाली होती. राज्य शासनाच्या आदेशाप्रमाणे सर्वच शाळांमध्ये प्रवेशोत्सव कार्यक्रम साजरा करण्यात आला. महापालिकेच्या तळवडे, संत तुकारामनगर, पुनावळे, पिंपळे गुरव येथील शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे गणवेश, पुस्तके, गुलाबपुष्प आणि चॉकलेट देऊन महापौर शकुंतला धराडे यांनी स्वागत केले. या वेळी महापालिका आयुक्त राजीव जाधव, शिक्षण मंडळ सभापती धनंजय भालेकर, प्रशासन अधिकारी आशा उबाळे, शिक्षण मंडळाचे सदस्य उपस्थित होते. महापालिकेच्या इतर शाळांमध्ये स्थानिक नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गणवेश, पुस्तके, गुलाबपुष्प आणि चॉकलेट देऊन स्वागत करण्यात आले. (प्रतिनिधी)- शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना गोड पदार्थांची मेजवाणी मिळाली. अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या सर्वच कार्यक्रमांची विद्यार्थ्यांबरोबरच पालक व शिक्षक वर्गालाही उत्सुकता होती. त्यामुळे शाळेचा परिसर मुलांनी फुलून गेला होता. पालिकेच्या शाळांसह खासगी शाळांमध्येही स्वच्छता ठेवण्यात आली होती. विद्यार्थ्यांना पुस्तके आणि गणवेश देण्याचे नियोजन आधीच पूर्ण झाल्यामुळे गोंधळ उडाला नाही. शिशुवर्गामध्ये दाखल होणारी मुले पालकांनी बिलगुनच राहत होती. पालक सोडून जाताना रडून गोंधळ करीत होते. शिक्षक त्यांना समजावण्याचा प्रयत्न करीत होते. तरीही ते ऐकण्यास तयार नसल्याने परिसरात किलकिलाट सुरू होता.