शहरं
Join us  
Trending Stories
1
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
2
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
3
जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
4
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
5
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
6
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
7
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
8
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
9
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
10
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
11
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
12
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
13
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
14
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
15
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
16
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
17
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
18
भारतातील या मुख्यमंत्र्यांनी भारत-पाकिस्तान युद्धावेळी चालवलं होतं विमान, सैनिकांना पोहोचवलं होतं श्रीनगरला
19
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी
20
एजाज खान अडचणीत, महिला आयोगाची कारवाई; ULLU ने 'हाउस अरेस्ट'चे सर्व एपिसोड हटवले

कल्पनाशक्तीला वाव देऊन अभियंत्यांनी भविष्याचा वेध घ्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:14 IST

बेल्हा: अभियंत्यांनी कल्पनाशक्तीला वाव देऊन भविष्याचा वेध घ्यावा, असे प्रतिपादन आयएएस अधिकारी रवींद्र खताळ यांनी केले. येथील समर्थ संकुलात ...

बेल्हा: अभियंत्यांनी कल्पनाशक्तीला वाव देऊन भविष्याचा वेध घ्यावा, असे प्रतिपादन आयएएस अधिकारी रवींद्र खताळ यांनी केले.

येथील समर्थ संकुलात अभियंता दिनानिमित्त ऑनलाईन वेबिनारचे आयोजन केले होते. समर्थ संकुलात भारतातील प्रख्यात स्थापत्य अभियंता भारतरत्न सर डॉ. विश्वेश्वरय्या मोक्षगुंडम यांचा जन्मदिन ''इंजिनियर्स डे'' म्हणून साजरा करण्यात आला. या वेळी अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. अनिल पाटील, प्राचार्य डॉ. लक्ष्मण घोलप, प्राचार्य राजीव सावंत, प्राचार्य डॉ. संतोष घुले, डॉ.सुभाष कुंभार, पॉलिटेक्निकचे प्राचार्य अनिल कपिले, प्राचार्य पांडुरंग हाडवळे तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने या वेबिनारसाठी ऑनलाईन सहभागी झाले होते.

विद्यार्थ्यांशी संवाद साधताना रवींद्र खताळ म्हणाले की, मी स्वतः एक इंजिनिअर आहे. इंजिनिअरच्या कामामध्ये लवचिकता, प्रत्येक गोष्ट जुळवून घेण्याची क्षमता व कला, ऐनवेळचे व्यवस्थापन इ. बाबी अंतर्भूत असतात. या क्षेत्रात प्रत्येक दिवस वेगळा, विषय वेगळा, समस्या वेगळ्या आणि आव्हानात्मक असतो. विद्यार्थीदशेत असताना विशेष करून इंजिनिअरिंग अभ्यासक्रम शिकताना विद्यार्थ्यांनी जिज्ञासू वृत्तीने शिक्षण घेतले पाहिजे. सामाजिक भान असले पाहिजे. वेगवेगळे प्रश्न विचारले पाहिजेत. त्यासाठी अभियंत्यांनी कल्पनाशक्तीला वाव देऊन भविष्याचा वेध घ्यावा. ही सर्व खासियत मुळातच इंजिनिअरमध्ये असते, गरज आहे ती योग्य मार्गदर्शनाची आणि कठोर परिश्रमाची. फावल्या वेळेत आपण काय करतो? यावर भविष्यातील बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात असेही त्यांनी सांगितले..

ऑनलाईन वेबिनारचे नियोजन प्रा. भूषण बोऱ्हाडे यांनी, तर डॉ. अनिल पाटील यांनी आभार मानले. या वेळी संस्थेचे उपाध्यक्ष माऊली शेळके, सचिव विवेक शेळके, विश्वस्त वल्लभ शेळके,डॉ.महेश भास्कर, प्रा.रुस्तुम दराडे, प्रा.शशिकांत ताजने आदी उपस्थित होते.

१६ बेल्हा

समर्थ शैक्षणिक संकुलात डॉ. विश्वेश्वरय्या यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पणप्रंसगी उपस्थित असलेले संस्थेचे पदाधिकारी.

160921\img-20210916-wa0134.jpg

बेल्हा(ता.जुन्नर)येथील समर्थ शैक्षणिक संकुलात पुष्पहार अर्पण करताना संस्थेचे पदाधिकारी दिसत आहेत.