शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
5
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
6
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
7
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
8
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
9
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
10
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
11
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
12
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
13
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
14
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
15
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
16
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
17
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
18
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
19
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
20
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

कोंदणाशिवाय तरुणाईची ऊर्जा असहिष्णू

By admin | Updated: December 25, 2015 01:57 IST

सांस्कृतिक शहरातील महोत्सवांतून तरुणांच्या ऊर्जेला वाट मिळत आहे. या ऊर्जेला कोंदण न मिळाल्यास, ती असहिष्णू होईल.

पुणे : सांस्कृतिक शहरातील महोत्सवांतून तरुणांच्या ऊर्जेला वाट मिळत आहे. या ऊर्जेला कोंदण न मिळाल्यास, ती असहिष्णू होईल. त्यामुळे कलेचे शिक्षण देणाऱ्या संस्थांना शासनातर्फे अनुदान मिळायला हवे. पायाभूत सुविधांसाठीही शासनाने पुढाकार घ्यायला हवा, असे मत ज्येष्ठ रंगकर्मी सतीश आळेकर यांनी व्यक्तकेले. कला, गायन, वादन, संगीत नाट्य यांचा मनोहारी मिलाप असणाऱ्या शनिवारवाडा कलामहोत्सवास दिमाखात प्रारंभ झाला. या महोत्सवाचे उद्घाटन सतीश आळेकर व ज्येष्ठ व्हायोलिनवादक प्रभाकर जोग यांच्या हस्ते पार पडले. त्या वेळी आळेकर बोलत होते. याप्रसंगी आमदार विजय काळे उपस्थित होते.ते म्हणाले, ‘१९६१ मध्ये झालेल्या पडझडीतून पुण्याला पुनरुज्जीवित करण्याची संधी राजकीय पक्षांना मिळाली होती; मात्र त्यांनी ती दवडली. पूर्वी पुणे हे पेन्शनरांचे शहर म्हणून ओळखले जायचे. आता ते शैक्षणिक संस्थांचे, तरुणांचे शहर बनले आहे. तरुणांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी ललित कला केंद्रासारख्या संस्था कार्यरत आहेत; मात्र ही प्रशिक्षण केंद्रे विनाअनुदानित तत्त्वावर चालवली जातात. त्यांना सरकारचे कोणतेही पाठबळ मिळत नाही. त्यासाठी शासनाने धोरण आखून, अनुदान आणि पायाभूत सुविधांसाठी प्रयत्न करायला हवेत.आळेकर म्हणाले, ‘शहरामध्ये अनेक सभागृहे, प्रेक्षागृहे उभी राहत आहेत. चित्रपट, लघुपट, नृत्य, संगीत महोत्सव दिमाखदारपणे साजरे होत आहेत. प्रेक्षागृहांची देखभालही व्यवस्थित झाली पाहिजे. प्रत्येक तिकिटातला एक रुपया खर्च केला, तरी निधी जमा होऊ शकेल. विंगेतील व्यवस्था चोख असेल, तर नाटक रंगते. त्याचप्रमाणे सर्व सोयीसुविधा पुरवल्या, तर महोत्सव आणि प्रयोग अधिक रंगतील. प्रत्येक प्रयोग अथवा कार्यक्रम झाला की, स्वच्छता व्हायला हवी. कला ६० टक्के लोकाश्रयावर, तर ४० टक्के शासनाच्या पाठिंब्यावर टिकते. त्यामुळे कला उजळण्यासाठी प्रयत्न होण्याची गरज आहे.’ प्रभाकर जोग यांनी कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. मंगेश वाघमारे यांनी सूत्रसंचालन केले.या सोहळ्यात गायिका अनुराधा मराठे, तबलावादक राजू जावळकर; तसेच संगीतक्षेत्रात कार्यरत असणाऱ्या श्रीसंत दर्शन मंडळ संस्थेच्या श्रीराम राठे यांचा मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. या वेळी अनुराधा मराठे म्हणाल्या, ‘केवळ गुरूंमुळे संगीताची अनेक वर्षे सेवा करण्याची संधी मिळाली आहे. कठोर परिश्रमाशिवाय कला साध्य होत नाही.’ (प्रतिनिधी)