शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
2
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
3
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
4
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
5
ऑटो क्षेत्र सुसाट! नवरात्रीदरम्यान दर तासाला 1,000 हून अधिक गाड्यांची विक्री
6
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?
7
निष्काळजीपणाचा बळी! इमारतीवरून वीट डोक्यात पडल्याने संस्कृतीचा करुण अंत, जोगेश्वरीतील घटनेने खळबळ
8
Nobel Prize: सुसुमू कितागावा, रिचर्ड रॉबसन आणि उमर याघी यांना रसायनशास्त्रातील नोबेल जाहीर
9
“पंतप्रधानांचा हात लागतो त्याचे सोने होते, नरेंद्र मोदी हे विकासाची आंधी”: DCM एकनाथ शिंदे
10
ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकत इतिहास रचला! त्या अमन सेहरावतला आखाड्यात उतरण्यावर बंदी; जाणून घ्या कारण
11
पुण्यातील विठ्ठल भक्तांवर पंढरपुरात हल्ला करणारे 'ते' तिघे कोण? वाद इतका विकोपाला का गेला?
12
पंतप्रधान मोदींच्या हस्ते नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन; मुंबई-पुणेकरांना मोठा दिलासा!
13
देशातल्या खासगी क्षेत्रातील सर्वात मोठ्या बँकेनं दिलं खास दिवाळी गिफ्ट, आपल्याला कसा होणार फायदा? जाणून घ्या
14
प्रीमियम लूक, इंटीरियरमध्ये लक्झरी आणि स्पोर्टी टच; टोयोटा फॉर्च्यूनर लीडर भारतात लॉन्च!
15
रशियात शिकायला गेला आणि सैन्यात भरती झाला, अखेर युक्रेनी सैन्यासमोर सरेंडर, गुजराती तरुणासोबत काय घडलं? 
16
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता एकाच App मध्ये मिळणार बस, ट्रेन आणि मेट्रोचे तिकीट...
17
बॉलिवूड हादरलं! 'झुंड' फेम अभिनेत्याची निर्घृण हत्या, अर्धनग्नावस्थेत आढळला प्रियांशूचा मृतदेह
18
"मी जेहच्या खोलीत आलो, चोर त्याच्या बेडवर...", सैफने सांगितला घटनाक्रम, काजोल झाली भावुक
19
लक्ष्मीपूजन २०२५: यंदा लक्ष्मीपूजन कधी? २० की २१ ऑक्टोबरला? पूजेसाठी मिळणार फक्त अडीच तास!
20
BMC ELection: मुंबईतील तरुणांना १८ वर्ष पूर्ण होऊनही BMC निवडणुकीत करता येणार नाही मतदान, कारण...

मे अखेर नदीकाठच्या गावांना मिळणार शुद्ध पाणी!

By admin | Updated: April 23, 2015 06:28 IST

पुणे व पिंपरी शहरातून विनाप्रक्रिया केलेले मैलापाणी नदीत सोडण्यात येत असल्याने नदीकाठच्या १२१ गावांना दूषित पाणीपुरवठा होत होता

पुणे : पुणे व पिंपरी शहरातून विनाप्रक्रिया केलेले मैलापाणी नदीत सोडण्यात येत असल्याने नदीकाठच्या १२१ गावांना दूषित पाणीपुरवठा होत होता, त्या ठिकाणी शुद्ध पाणीपुरवठा करण्याबाबत देण्यात आलेल्या निर्देशानुसार पुणे महापालिकेकडून ६ कोटी ८८ लाख रुपयांचा निधी जिल्हा परिषदेला देण्यात आला. मुख्य कार्यकारी अधिकारी कांतीलाल उमाप यांनी महापौर दत्तात्रय धनकवडे यांच्याकडून निधीचा धनादेश बुधवारी स्वीकारला.यामुळे या प्रकल्पाच्या कामांना गती मिळणार असून या गावांना मे अखेर शुद्ध पाणी देण्याचा आमचा प्रयत्न असणार असल्याचे कांतीलाल उमाप यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. नदीत सोडण्यात येत असलेल्या मैलापाण्यामुळे नदीकाठच्या गावांच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्याचबरोबर नदीतील हेच पाणी उजनी धरणामध्ये जाऊन मिळत असल्याने सोलापूर जिल्ह्यातसुध्दा अशुध्द पाण्याचा पाणीपुरवठा होत आहे. विधीमंडाळामध्ये यावर शासनाला सातत्याने जाब विचारला जात होता. यातून मार्ग काढण्यासाठी ३ आॅगस्ट २०१० रोजी विधानसभा अध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. बाधित गावांमध्ये रिव्हर्स आॅसमॉसिसच्या (आरओ) माध्यमातून प्रतिमाणशी १० लिटर शुध्द पाणी उपलब्ध करून देण्याची योजना सुरू करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले होते. त्याचा खर्च पुणे मनपा, पिंपरी चिंचवड मनपा यांनी समसमान करावा असे आदेश देण्यात आले होते. (प्रतिनिधी)