शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे संपवली, पण कोणत्याही पंतप्रधानांनी मदत केली नाही," डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
2
वैभव खेडेकरांच्या BJP प्रवेशाचा मुहूर्त मिळेना; कार्यकर्त्यांसह मुंबई गाठली पण पक्षप्रवेश नाही
3
बिग सरप्राइज! थेट टीम इंडियाची कॅप्टन्सी मिळाली अन् दिनेश कार्तिक पुन्हा मैदानात उतरण्यास झाला तयार
4
लग्नानंतर वैवाहिक संबध ठेऊ शकला नाही पती, पत्नीनं नपुंसक असल्याचा आरोप करत केली 2 कोटींची मागणी अन् मग...
5
IND vs PAK: पाकिस्तानच्या 'चिल्लर पार्टी'ला हरभजनचा इशारा, म्हणाला- थोडे मोठे व्हा नि मग...
6
"देशी गाय कोणी विकायला निघालं, तर त्याला फाशी द्या"; सदाभाऊ खोत यांची सरकारकडे मागणी, नेमकं काय म्हणाले?
7
भारताने जिंकलेल्या १९८३ वर्ल्डकप फायनलमधील पंच डिकी बर्ड यांचे ९२व्या वर्षी निधन
8
पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...
9
“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ
10
GST कपातीनंतर आता एवढी स्वस्त झालीय ५ स्टार रेटिंग असलेली Tata Punch; जाणून घ्या, कोण कोणत्या कारला देते टक्कर?
11
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांमुळे इमॅन्युएल मॅक्रॉन अडकले ट्रॅफिकमध्ये; फ्रान्सच्या प्रमुखांनी थेट लावला ट्रम्प यांनी फोन
12
"कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका"; भाजपा खासदाराने ममता बॅनर्जींना सुनावले, म्हणाले- "सतत..."
13
"गर्भवती महिलांना पॅरासिटामॉल गोळीने..."; WHO ने फेटाळून लावला डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
14
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम? अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
15
चिंताजनक! लहानपणीच्या 'या' छोट्याशा निष्काळजीपणामुळे ५०% वाढतो हृदयरोगाचा धोका
16
गुंडांना आवरा अन्यथा धडा शिकवू, ज्येष्ठ कार्यकर्त्याशी झालेल्या गैरवर्तनावरून काँग्रेसचा भाजपाला इशारा
17
मुलीने पुण्यात मैत्रिणीसोबत बांधली लग्नाची गाठ; आई वडिलांनी लपवून दुसऱ्यांदा तरुणासोबत लावलं लग्न
18
महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांचा फोटो काढून जिंकू शकता ५ लाख ! कुठे करायचा अपलोड, काय आहे योजना?
19
"फरहानच्या AK47 वर अभिषेक-गिलचं 'ब्रह्मास्त्र' पडलं भारी.."; पाकिस्तानी क्रिकेटरनेच सुनावलं
20
जिच्याशी अफेअर त्या नर्सलाच डॉक्टरने ठार मारले, आधी नशेचं इंजेक्शन दिलं, मग कारखाली चिरडलं  

कुकडी नदीतील अतिक्रमण अखेर काढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2018 01:23 IST

कुकडी नदीतील डाव्या कालव्याचे पाणी पाईपच्या माध्यमातून घेणाऱ्या जागेवरील अतिक्रमण शुक्रवारी पोलीस बंदोबस्तात काढण्यात आले.

टाकळीहाजी : कुकडी नदीतील डाव्या कालव्याचे पाणी पाईपच्या माध्यमातून घेणाऱ्या जागेवरील अतिक्रमण शुक्रवारी पोलीस बंदोबस्तात काढण्यात आले. गेल्या महिनाभरात निघोज, कुंड (ता. पारनेर), होणेवाडी, टाकळीहाजी (ता. शिरूर) या परिसरातील शेतकºयांनी हे अतिक्रमण काढण्यासाठी दोन वेळा आंदोलन केले होते. मात्र, यातूनही या प्रश्नाला न्याय मिळत नसल्याने संदीप पाटील फाऊंडेशनचे संस्थापक सचिन पाटील वराळ यांच्या नेतृत्वाखाली शेतकºयांचे शिष्टमंडळ राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांना भेटले. विखे पाटील यांनी कुकडीच्या वरिष्ठ अधिकाºयांशी चर्चा केल्यानंतर अतिक्रमण काढण्यावर अधिकारी सक्रिय झाले. त्याची अंमलबजावणी शुक्रवारी करण्यात आली.तीन वर्षांपासून सहाशे हेक्टरपेक्षा जास्त पाण्याची मागणी करून रीतसर पाणीपट्टी भरून हे पाणी आम्ही घेत होतो. कुकडीच्या नियमानुसार हे पाणी रीतसर असल्याचा दावा मोरवाडी, रसाळवाडी, वडनेर (ता. पारनेर), तसेच भाकरेवाडी व माळवाडी (ता. शिरूर) या भागातील शेतकरी करीत होते. मात्र, हे पाणी अनधिकृतपणे घेतल्याने ते मिळत नसल्याचा आरोप करून निघोज, कुंड, होणेवाडी, टाकळीहाजी या भागातील शेतकºयांनी पाईपच्या माध्यमातून केलेले अतिक्रमण काढून टाकण्याची मागणी केली होती. मात्र, आंदोलन करूनही प्रशासन याची दखल घेत नव्हते. महिनाभरात कुंड व टाकळीहाजीच्या शेतकºयांनी दोन वेळा यासाठी आंदोलन केले. सचिन वराळ, मंगेश वराळ यांच्या नेतृत्वाखाली पाचशे शेतकºयांनी पहिल्यांदा ३१ तासांचा बैठा सत्याग्रह केला. त्यावेळी कुकडीच्या उपकार्यकारी अभियंता सुचिता डुंबरे यांनी हे पाईप काढण्याचे लेखी आश्वासन आंदोलनकर्त्यांना दिले.मात्र राजकीय दबाव वाढल्याने पोलीस बंदोबस्त मिळत नाही, ही सबब सांगून कुकडी अधिकाºयांनी अतिक्रमण काढण्यासाठी पळवाट पाहिली. मात्र त्यानंतर पुन्हा आठ दिवसांच्या अंतराने शेतकºयांनी तीन दिवसांचे उपोषण करीत शिष्टमंडळ विखे-पाटील यांच्याकडे नेल्यानंतर अधिकाºयांनी अतिक्रमण काढण्यासाठी तयार झाले व त्यानंतर कार्यवाही आज सुरू केली.> सध्या तीन पाईप काढण्यात आले असून उर्वरित पाईप लवकर काढण्यात येणार आहेत. या तीन पाईपमुळे पाणी वळवण्याचा मार्ग खुंटला असून कुंड, होणेवाडी, टाकळीहाजी या भागांतील शेतकºयांना पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.