शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

कुकडी नदीतील अतिक्रमण अखेर काढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2018 01:23 IST

कुकडी नदीतील डाव्या कालव्याचे पाणी पाईपच्या माध्यमातून घेणाऱ्या जागेवरील अतिक्रमण शुक्रवारी पोलीस बंदोबस्तात काढण्यात आले.

टाकळीहाजी : कुकडी नदीतील डाव्या कालव्याचे पाणी पाईपच्या माध्यमातून घेणाऱ्या जागेवरील अतिक्रमण शुक्रवारी पोलीस बंदोबस्तात काढण्यात आले. गेल्या महिनाभरात निघोज, कुंड (ता. पारनेर), होणेवाडी, टाकळीहाजी (ता. शिरूर) या परिसरातील शेतकºयांनी हे अतिक्रमण काढण्यासाठी दोन वेळा आंदोलन केले होते. मात्र, यातूनही या प्रश्नाला न्याय मिळत नसल्याने संदीप पाटील फाऊंडेशनचे संस्थापक सचिन पाटील वराळ यांच्या नेतृत्वाखाली शेतकºयांचे शिष्टमंडळ राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांना भेटले. विखे पाटील यांनी कुकडीच्या वरिष्ठ अधिकाºयांशी चर्चा केल्यानंतर अतिक्रमण काढण्यावर अधिकारी सक्रिय झाले. त्याची अंमलबजावणी शुक्रवारी करण्यात आली.तीन वर्षांपासून सहाशे हेक्टरपेक्षा जास्त पाण्याची मागणी करून रीतसर पाणीपट्टी भरून हे पाणी आम्ही घेत होतो. कुकडीच्या नियमानुसार हे पाणी रीतसर असल्याचा दावा मोरवाडी, रसाळवाडी, वडनेर (ता. पारनेर), तसेच भाकरेवाडी व माळवाडी (ता. शिरूर) या भागातील शेतकरी करीत होते. मात्र, हे पाणी अनधिकृतपणे घेतल्याने ते मिळत नसल्याचा आरोप करून निघोज, कुंड, होणेवाडी, टाकळीहाजी या भागातील शेतकºयांनी पाईपच्या माध्यमातून केलेले अतिक्रमण काढून टाकण्याची मागणी केली होती. मात्र, आंदोलन करूनही प्रशासन याची दखल घेत नव्हते. महिनाभरात कुंड व टाकळीहाजीच्या शेतकºयांनी दोन वेळा यासाठी आंदोलन केले. सचिन वराळ, मंगेश वराळ यांच्या नेतृत्वाखाली पाचशे शेतकºयांनी पहिल्यांदा ३१ तासांचा बैठा सत्याग्रह केला. त्यावेळी कुकडीच्या उपकार्यकारी अभियंता सुचिता डुंबरे यांनी हे पाईप काढण्याचे लेखी आश्वासन आंदोलनकर्त्यांना दिले.मात्र राजकीय दबाव वाढल्याने पोलीस बंदोबस्त मिळत नाही, ही सबब सांगून कुकडी अधिकाºयांनी अतिक्रमण काढण्यासाठी पळवाट पाहिली. मात्र त्यानंतर पुन्हा आठ दिवसांच्या अंतराने शेतकºयांनी तीन दिवसांचे उपोषण करीत शिष्टमंडळ विखे-पाटील यांच्याकडे नेल्यानंतर अधिकाºयांनी अतिक्रमण काढण्यासाठी तयार झाले व त्यानंतर कार्यवाही आज सुरू केली.> सध्या तीन पाईप काढण्यात आले असून उर्वरित पाईप लवकर काढण्यात येणार आहेत. या तीन पाईपमुळे पाणी वळवण्याचा मार्ग खुंटला असून कुंड, होणेवाडी, टाकळीहाजी या भागांतील शेतकºयांना पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.