शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

अतिक्रमण जैसे थे; पोलिसच हटविले

By admin | Updated: July 15, 2016 00:42 IST

अतिक्रमणविरोधी विभागाला संरक्षण म्हणून नियुक्त असलेल्या पोलिसांची संख्या महापालिकेने अचानक कमी केली आहे. तब्बल ३० सहायक फौजदारांना परत पाठविण्यात आले आहे.

पुणे : अतिक्रमणविरोधी विभागाला संरक्षण म्हणून नियुक्त असलेल्या पोलिसांची संख्या महापालिकेने अचानक कमी केली आहे. तब्बल ३० सहायक फौजदारांना परत पाठविण्यात आले आहे. अतिक्रमण हटविण्याबाबत महापालिका प्रशासन उदासीन आहेच; पण फक्त त्याच कामासाठी म्हणून नियुक्त असलेल्या पोलिसांना आवश्यक सुविधा देण्याबाबतही त्यांनी चालढकल चालविली आहे.राज्य सरकारच्या आदेशाप्रमाणे काही वर्षांपूर्वी महापालिकेसाठी म्हणून स्वतंत्र पोलीस बळ देण्यात आले. त्यात एक सहायक पोलीस आयुक्त, ३ पोलीस निरीक्षक, ६ सहायक पोलीस निरीक्षक, ३० सहायक पोलीस फौजदार व उर्वरित पोलीस शिपाई असे तब्बल ८० पेक्षा जास्त मनुष्यबळ देण्यात आले. या सर्वांचे वेतन महापालिका अदा करीत असते. त्यासाठी मासिक काही लाख रुपये खर्च येतो. पालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयांच्या गरजेनुसार त्यांना पोलीस बल पुरविण्यात येते. महापालिकेची हद्द विचारात घेता आहे तीच संख्या अपुरी असतानाही तब्बल ३० सहायक फौजदारांना पालिका प्रशासनाने परत पाठविले आहे. त्याचे वेतन देणे परवडत नसल्याचे कारण त्यासाठी देण्यात आले आहे.शिल्लक राहिलेल्या ५० जणांमध्ये सुमारे १० वरिष्ठ अधिकारी आहेत. ते प्रत्यक्ष कारवाईत कधीही भाग घेत नाहीत. उर्वरित ४० पैकी किमान ५ जण कार्यालयीन कामकाजासाठी म्हणून पालिकेच्या मुख्य इमारतीमध्ये त्यांना दिलेल्या एका दालनात बसलेले असतात. राहिलेल्या ३५ पैकी किमान १० जण साप्ताहिक सुटी, रजा यामुळे उपलब्ध नसतात. फक्त २५ पोलिसांमध्ये अतिक्रमणविरोधी विभागाला संरक्षण कसे देता येईल, याचा विचारच प्रशासनाने केलेला नाही. क्षेत्रीय कार्यालयांकडून पोलीस संरक्षणाची मागणी झाली की कार्यालयातील पोलिसांकडून मनुष्यबळ नाही असे सांगितले जाते व अतिक्रमणविरोधी विभाग तेच कारण देत विनाकारवाई बसून राहतात. (प्रतिनिधी)