शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

सातारा रस्त्यावर अतिक्रमण हटविले

By admin | Updated: June 2, 2017 02:39 IST

पुणे-सातारा रस्त्यावर कात्रज डेअरीच्या बाजूला कामठे गॅरेजसमोरील अतिक्रमण, पथ विभाग, मालमत्ता भूमी जिंदगी विभाग

लोकमत न्यूज नेटवर्ककात्रज : पुणे-सातारा रस्त्यावर कात्रज डेअरीच्या बाजूला कामठे गॅरेजसमोरील अतिक्रमण, पथ विभाग, मालमत्ता भूमी जिंदगी विभाग यांनी सयुक्तपणे केलेल्या कारवाईमुळे रुंदीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे.पुणे-सातारा महामार्गावर राजीव गांधी प्राणिसंग्रहालयासमोर ‘स्वारगेट ते कात्रज’ या रस्त्यावरील बीआरटी, सायकल ट्रॅक, पदपथ व रस्तारुंदीकरण काम सुरू आहे. या वेळी पथ विभागाचे उप अभियंता अर्धापुरे, राहुल सोरटे, बांधकाम विभाग कनिष्ठ अभियंता डी. एन. जगताप, भूमी जिंदगीचे रमेश कांबळे आदींसह पालिका अधिकारी या वेळी उपस्थित होते. सुमारे १२०१ चौ. मी. अतिक्रमण मोकळे करण्यात आले आहे; तसेच पुढील १८०० चौ. मी. जागेसंदर्भात विषय न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे कारवाई केली नाही, असे या वेळी अधिकाऱ्यांनी सांगितले.ज्या जागेवर कारवाई करण्यात आलेली आहे, त्या जागेचे मालक हनुमंत कामठे व रमेश कदम यांनी सांगितले की, ही जागा अजून आम्ही पालिकेला सुपूर्द केलेली नाही. याचा विषय न्यायालयात चालू असताना ही कारवाई करण्यात आलेली आहे. त्यामुळे न्यायालयाचा अवमान झाला आहे.२४ एप्रिल रोजी कात्रजच्या विविध प्रश्नांवर राष्ट्रवादी काँग्रेसने आंदोलन केले होते. त्यापैकी कामठे गॅरेजच्या समोरील जागा हस्तांतरण करून रस्तारुंदीकरण करावे, ही प्रमुख मागणी आयुक्तांकडे केली होती. या समस्येबाबत पालिका पथ विभाग, भूमी जिंदगी या अधिकाऱ्यांचा पाहणी दौरा घडून आणला. आयुक्तांनी घटनेचे गांभीर्य ओळखून कारवाईचे आदेश दिल्यामुळे रस्तारुंदीकरणाचा विषय मार्गी लागला आहे. त्यामुळे रस्त्यावर उतरलेल्या कात्रजकरांना न्याय मिळाल्याचे समाधान वाटते.- अमृता बाबर, नगरसेविका‘स्वारगेट ते कात्रज’ या रस्त्याचे काम मार्गी लागावे म्हणून गेल्या अनेक महिन्यांपासून मनपा अधिकारी व जागामालक यांच्यात समन्वय घडून आणण्यासाठी बैठक घेतल्या आहेत; तसेच हा विषय २० मेच्या सर्वसाधारण सभेत घेतला होता. १९९६ मध्ये ताब्यात आलेल्या जागा ताब्यात घेण्यास उशीर केला. हा विषय शहराच्या विकासासाठी योगदान देणाऱ्या रस्त्याचा आहे. त्यामुळे सामोपचाराने मिटवण्याची आवश्यकता आहे.- वसंत मोरे, नगरसेवकपुणे शहर व कात्रज उपनगराला जोडणारा महत्त्वाचा रस्ता असून, तो पूर्णपणे विकसित व्हावा, यासाठी संबंधित विभागाशी पत्र व्यवहार केला आहे. पालिका अधिकारी व जागामालक यांनी एकत्र बसून विषय मार्गी लावावा. जागामालकाच्या उर्वरित जागेच्या विकसनासाठी सहकार्य करू, त्यामुळे मात्र जागामालकांनी नागरिकांचे हित लक्षात घेता, न्यायालयाचा आधार घेऊन विकासाच्या आड येऊ नये.- युवराज बेलदरे, नगरसेवक