शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगे राहुल गांधींना म्हणाले 'दिल्लीचा लाल्या', काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया, पाटलांना दिलं असं नाव  
2
VIDEO: पंतप्रधान मोदी नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनावेळी मराठीत काय बोलले? ऐका...
3
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
4
रोहित शर्मा पुन्हा बनला कर्णधार, मिळाला नवा 'ओपनिंग पार्टनर'; Playing XI मध्ये आणखी कोण?
5
नवी मुंबई विमानतळाचा उदघाटन सोहळा मंत्री राममोहन नायडूंनी गाजवला, केलं मराठीतून भाषण, म्हणाले... 
6
AUS W vs PAK W : वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलिया टॉपला; पराभवाच्या हॅटट्रिकसह पाकिस्तान रसातळाला!
7
VIDEO: शत्रूवरही अशी वेळ नको रे देवा... नवरदेवाची भर लग्नमंडपात होणाऱ्या बायकोसमोर 'फजिती'
8
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
9
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
10
‘मेस्मा’ लागू, सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर
11
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
12
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
13
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
14
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
15
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
16
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
17
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
18
पाकिस्तानची जिरवल्यावर कुणाला सुचली 'ती' भन्नाट आयडिया? वरुण चक्रवर्तीन शेअर केली त्यामागची स्टोरी
19
ऑटो क्षेत्र सुसाट! नवरात्रीदरम्यान दर तासाला 1,000 हून अधिक गाड्यांची विक्री
20
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?

खेड-कनेरसर रस्त्यावर फळविक्रेत्यांचे अतिक्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:09 IST

राजगुरुनगर: खेड-कनेरसर रस्त्यावर पाबळ रोड येथे फळविक्रेत्यांनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण झाला ...

राजगुरुनगर: खेड-कनेरसर रस्त्यावर पाबळ रोड येथे फळविक्रेत्यांनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण झाला आहे. या अतिक्रमणांकडे नगरपरिषद दुर्लक्ष करत असून यावर कारवाई करण्याची मागणी नागरिकांतून जोर धरु लागली आहे.

खेड ते कनेरसर हा रस्ता काही वर्षांपूर्वी प्रशस्त करण्यात आला. खेडच्या पूर्व भागात सेझ प्रकल्प आल्याने काही दिवसांतच पुणे-नाशिक महामार्गालगतचा पाबळ रोड हा मुख्य चौक बनला आहे. मुख्य चौकात रस्ता प्रशस्त करताना पादचारी यांना जाण्यासाठी फुटपाथ तयार करण्यात आला. मात्र, या फुटपाथ फळविक्रेते दुकानदारांनी व्यापून टाकला आहे. मोबाईल शॉपी, पानटपरी, चिकन दुकानदारांनी फुटपाथवर दुकाने थाटली आहेत. तसेच काही फळविक्रेत्यांनी फुटपाथ सोडून थेट रस्त्यावर हातगाडी उभ्या केल्या आहेत. त्यामुळे अर्धा रस्ता व्यापून गेला आहे. त्यातच काही खासगी वाहनचालक या रस्त्यावर बिनधास्तपणे चारचाकी वाहने या ठिकाणी वाहने लावतात. त्यामुळे रहदारीस प्रंचड अडथळा निर्माण होतो. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना हॉटेल, किराणा दुकान व इतर दुकाने असल्यामुळे नागरिक रस्त्यावरच दुचाकी उभ्या करून हॉटेल व किराणा दुकानांत खरेदी करण्यासाठी जात असतात.

खेडच्या पूर्व भागात सेझ प्रकल्प आल्याने त्या दृष्टीने हा रस्ता बनविण्यात आला होता. दिवसेंदिवस या रस्त्यावर पाबळ चौक ते चव्हाणमळा या १ किलोमीटर अंतराच्या रस्त्यावर सर्रास दिवसरात्र वाहने उभी असतात. त्यामुळे पादचारी व वाहनचालकांना मोठी कसरत करून वाट काढावी लागत असल्याचे चित्र दिसत आहे. दोन वर्षांपूर्वी तत्कालीन उपविभागीय अधिकारी तथा प्रांत आयुष प्रसाद व राजगुरुनगर नगर परिषेदेने या रस्त्यावरील अतिक्रमणे काढून टाकली होती. दरम्यान, रस्त्याने काही दिवस मोकळा श्वास घेतला होता. नंतर हळूहळू या पुन्हा जैसे थे परिस्थिती निर्माण झाली आहे. नगरपरिषद व पोलिसांनी लक्ष रस्त्यावर उभ्या केलेल्या हातगाड्या व स्टॉल हटवावे व रस्ता वाहतुकीस खुला करावा, अशी मागणी वाहनचालक व नागरिकांनी केली आहेे.

दुकानदारांनी रस्त्यावर हातगाडी व इतर स्टॉल लावल्याने रस्ता अरुंद झाला आहे. त्यामुळे अपघात होण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. काही पोलीस या फळविक्रेते, पानटपरीधारक, वडापाव हातगाडीवाले यांच्याकडून दर महिन्याला चिरीमिरी घेत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळेच हे विक्रेते रस्त्यावर हातगाड़ी स्टॉल उभे करण्याचे धाडस करत आहे.

०८ राजगुरुनगर