शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

खेड-कनेरसर रस्त्यावर फळविक्रेत्यांचे अतिक्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:09 IST

राजगुरुनगर: खेड-कनेरसर रस्त्यावर पाबळ रोड येथे फळविक्रेत्यांनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण झाला ...

राजगुरुनगर: खेड-कनेरसर रस्त्यावर पाबळ रोड येथे फळविक्रेत्यांनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण झाला आहे. या अतिक्रमणांकडे नगरपरिषद दुर्लक्ष करत असून यावर कारवाई करण्याची मागणी नागरिकांतून जोर धरु लागली आहे.

खेड ते कनेरसर हा रस्ता काही वर्षांपूर्वी प्रशस्त करण्यात आला. खेडच्या पूर्व भागात सेझ प्रकल्प आल्याने काही दिवसांतच पुणे-नाशिक महामार्गालगतचा पाबळ रोड हा मुख्य चौक बनला आहे. मुख्य चौकात रस्ता प्रशस्त करताना पादचारी यांना जाण्यासाठी फुटपाथ तयार करण्यात आला. मात्र, या फुटपाथ फळविक्रेते दुकानदारांनी व्यापून टाकला आहे. मोबाईल शॉपी, पानटपरी, चिकन दुकानदारांनी फुटपाथवर दुकाने थाटली आहेत. तसेच काही फळविक्रेत्यांनी फुटपाथ सोडून थेट रस्त्यावर हातगाडी उभ्या केल्या आहेत. त्यामुळे अर्धा रस्ता व्यापून गेला आहे. त्यातच काही खासगी वाहनचालक या रस्त्यावर बिनधास्तपणे चारचाकी वाहने या ठिकाणी वाहने लावतात. त्यामुळे रहदारीस प्रंचड अडथळा निर्माण होतो. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना हॉटेल, किराणा दुकान व इतर दुकाने असल्यामुळे नागरिक रस्त्यावरच दुचाकी उभ्या करून हॉटेल व किराणा दुकानांत खरेदी करण्यासाठी जात असतात.

खेडच्या पूर्व भागात सेझ प्रकल्प आल्याने त्या दृष्टीने हा रस्ता बनविण्यात आला होता. दिवसेंदिवस या रस्त्यावर पाबळ चौक ते चव्हाणमळा या १ किलोमीटर अंतराच्या रस्त्यावर सर्रास दिवसरात्र वाहने उभी असतात. त्यामुळे पादचारी व वाहनचालकांना मोठी कसरत करून वाट काढावी लागत असल्याचे चित्र दिसत आहे. दोन वर्षांपूर्वी तत्कालीन उपविभागीय अधिकारी तथा प्रांत आयुष प्रसाद व राजगुरुनगर नगर परिषेदेने या रस्त्यावरील अतिक्रमणे काढून टाकली होती. दरम्यान, रस्त्याने काही दिवस मोकळा श्वास घेतला होता. नंतर हळूहळू या पुन्हा जैसे थे परिस्थिती निर्माण झाली आहे. नगरपरिषद व पोलिसांनी लक्ष रस्त्यावर उभ्या केलेल्या हातगाड्या व स्टॉल हटवावे व रस्ता वाहतुकीस खुला करावा, अशी मागणी वाहनचालक व नागरिकांनी केली आहेे.

दुकानदारांनी रस्त्यावर हातगाडी व इतर स्टॉल लावल्याने रस्ता अरुंद झाला आहे. त्यामुळे अपघात होण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. काही पोलीस या फळविक्रेते, पानटपरीधारक, वडापाव हातगाडीवाले यांच्याकडून दर महिन्याला चिरीमिरी घेत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळेच हे विक्रेते रस्त्यावर हातगाड़ी स्टॉल उभे करण्याचे धाडस करत आहे.

०८ राजगुरुनगर