शहरं
Join us  
Trending Stories
1
Shiv Sena: पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील संशयितांची माहिती देणाऱ्याला १० लाख रुपयांचे बक्षीस
2
भारताचा तुर्कीला दणका, विमानतळांवर सेवा देणाऱ्या सेलेबी कंपनीची सुरक्षा मंजुरी केली रद्द!
3
बिहार दौऱ्यात राहुल गांधी यांच्याविरोधात दोन गुन्हे दाखल, पोलिसांनी शंभराहून अधिक जणांना केलं आरोपी
4
India Pakistan Ceasefire: "भारत-पाकिस्तान यांच्यात १८ मेपर्यंत शस्त्रसंधी"; पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री डार यांचे विधान
5
आधी ट्रम्प यांच्यावर भडकली, नंतर पोस्ट डिलीट; कंगना म्हणाली, "जेपी नड्डांनी डिलीट करायला सांगितली"
6
ED Raid: 23 कोटींचं सोनं, 8 कोटी रोख; वसई विरार मनपाचे नगररचना उपसंचालक रेड्डीकडे सापडली कोट्यवधींची माया
7
Donald Trump : "मी असं म्हणत नाही की..."; भारत-पाकिस्तान युद्धविरामावर मोठे दावे करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांची पलटी
8
सुटी रद्द झाल्याने कामावर परतणाऱ्या मेजरवर काळाचा घाला; डोळ्यादेखत पत्नीचा मृत्यू, लेक गंभीर जखमी
9
'पाकिस्तानशी फक्त दहशतवाद अन् PoK वर चर्चा होईल; तिसऱ्याचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही'
10
'गदर'मधला दरम्यान सिंग आठवतोय का? एका आजारामुळे झालं होत्याचं नव्हतं, अभिनेत्याचा झाला दुर्देवी शेवट
11
व्यापाऱ्यांनी कोणाच्या धमकीला भीक घालू नये; आम्ही तुमच्या पाठीशी आहोत - देवेंद्र फडणवीस
12
इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; 'लेडी सेहवाग'ला मिळाली कमबॅकची संधी
13
अटक करण्याची धमकी देत मागितली खंडणी: उल्हासनगर पोलीस ठाण्यातील दोन पोलीस निलंबित
14
Crime: निवृत्त न्यायाधीशाच्या दोन मुले आणि सुनेला जन्मठेपेची शिक्षा; 2007 मधील प्रकरण काय?
15
Motivational Story: वडिलांचं सायकल दुरूस्तीचं दुकान, कष्टाची जाणीव ठेवून मुलानं दहावीत मिळवले घवघवीत यश
16
आश्चर्यकारक! आरोपीने बलात्कार पिडितेला भरकोर्टात केलं 'प्रपोज'; सर्वोच्च न्यायालयातील प्रसंग
17
"बेटा, सरेंडर कर", दहशतवाद्याने चकमकीआधी आईला केलेला Video कॉल; तिने समजावलं पण...
18
Shahapur: डोंगरावरून उडणारा ड्रोन अचानक कोसळला अन् गावात उडाली खळबळ; तो ड्रोन कोणाचा?
19
Nagpur: संधी मिळताच प्रवाशांना लुटायचे, रेल्वे स्थानकांवर चोऱ्या करणारी टोळी अटकेत
20
Ganeshotsav 2025: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील मूर्तिकारांसाठी बीएमसीची महत्त्वाची पोस्ट

राम नदीला अतिक्रमणाचा विळखा

By admin | Updated: May 23, 2015 00:37 IST

राम नदीच्या पात्रात येथील बांधकाम व्यावसायिकांनी मोठ्या प्रमाणात राडारोडा व भराव टाकला आहे, तसेच काही ठिकाणी वॉल कंपाऊंड टाकून नदीचा नैसर्गिक प्रवाह अडविण्यात आला आहे.

पुणे : राम नदीच्या पात्रात येथील बांधकाम व्यावसायिकांनी मोठ्या प्रमाणात राडारोडा व भराव टाकला आहे, तसेच काही ठिकाणी वॉल कंपाऊंड टाकून नदीचा नैसर्गिक प्रवाह अडविण्यात आला आहे. त्यामुळे येणाऱ्या पावसाळ्यात बावधन परिसराला पुन्हा पुराचा धोका निर्माण होऊ शकतो, असा अहवाल मुळशी तहसीलदार व पाटबंधारे विभागाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आला आहे. या अहवालाची गंभीर दखल घेऊन ही अतिक्रमणे त्वरित काढून टाकण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. जागेच्या वाढत्या भावामुळे पुणे शहर आणि परिसरात मोठ्या प्रमाणात टेकड्या, ओढे-नाले आणि नद्यांवरदेखील अतिक्रमणे झाली आहेत. पुणे शहराच्या पश्चिमेला असलेल्या राम नदीवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली आहेत. स्थानिक राजकर्त्यांच्या आशीर्वादाने राम नदीवर अनेक लहान-मोठ्या बिल्डरांनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे राम नदीचे अस्तित्व नाहीसे झाले असून, केवळ कागदोपत्री येथे नदी असल्याचे दिसत आहे. नदीच्या दोन्ही तीरावर बांधण्यात आलेल्या सिमेंटच्या भिंती आणि मोठ्या प्रमाणात टाकण्यात आलेल्या राडारोड्यामुळे नदीचे ओढ्यात रूपांतर झाले आहे.1राम नदीच्या पात्रामध्ये अतिक्रमण करून राडारोडा टाकल्यामुळे २०१० मध्ये झालेल्या पावसाळ्यात पूरस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे येथील रानवारा सोसायटीसह अन्य काही सोसायट्यांमध्ये ६ ते ७ फुटांपर्यंत पाणी शिरले होते. या पार्श्वभूमीवर मुळशी तहसीलदार, उपअधीक्षक भूमिअभिलेख विभागाचे अधिकारी, पाटबंधारे विभाग आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दहा दिवसांपूर्वी राम नदीपात्रात झालेल्या अतिक्रमणांची प्रत्यक्ष पाहणी केली. 2यात अनेक मोठ्या व नामांकित बिल्डरांसह हॉटेल व्यावसायिकांनी राम नदी पात्रात अतिक्रमण केल्याचे निदर्शनास आले. यात प्रामुख्याने एका डेव्हलपर्सने नदीच्या पात्रातच डबर आणि मातीचा भराव टाकल्याचे निदर्शनास आले. याशिवाय काही व्यावसायिकांनी नदीपात्रातच संरक्षक भिंत बांधल्याचे निदर्शनास आले. ही अतिक्रमणे न हटविल्यास येणाऱ्या पावसाळ्यात पूरस्थिती निर्माण होऊन निवासी प्रकल्पामध्ये पाणी शिरण्याचा मोठा धोका निर्माण होऊ शकतो, असा अहवाल दिला आहे.3या अहवालाची गंभीर दखल घेऊन जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी राष्ट्रीय आपत्ती निवारण कायदा २००५ नुसार अतिक्रमण केलेल्या सर्व लोकांना नोटिसा दिल्या असून, अतिक्रमणे त्वरित काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत. पावसाळ्यापूर्वी येत्या पंधरा दिवसांत अतिक्रमण न काढल्यास कडक कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.