शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
2
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
3
India Pakistan: एटीएम २-३ दिवस बंद राहणार? व्हायरल मेसेजबद्दल सरकारने केला खुलासा
4
Operation Sindoor Live Updates: राज्यांना आपत्कालीन अधिकारांचा वापर करण्याची परवानगी, गृह मंत्रालयाचा निर्णय
5
हा दिग्गज १०८ अब्ज डॉलर्सची संपत्ती दान करणार; ठरणार आजवरचं सर्वात मोठं परोपकारी कार्य
6
भारतीय सेनेचा 'सुपर हीरो', पाकिस्तानच्या नाकीनऊ आणलं! काय आहे 'आकाश'मध्ये खास?
7
'सर, मला फक्त एकदा परवानगी द्या, मी पाकिस्तानविरूद्ध..."; बिहारच्या शिक्षकाचे पत्र व्हायरल
8
जगा आणि जगू द्या..; मेहबूबा मुफ्तींचे रडत-रडत भारत आणि पाकिस्तानच्या प्रमुखांना आवाहन
9
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर RSSची मोदी सरकारच्या पाठीवर कौतुकाची थाप, भारतीय सैन्याचे केले अभिनंदन
10
Gold Price 9 May : भारत-पाक तणावादरम्यान सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर?
11
India Pakistan War: 'आमचे पंतप्रधान भित्रे, ते मोदींचे नाव घ्यायला घाबरतात'; पाकिस्तानी खासदाराने त्यांच्याच सरकारला सुनावले
12
"सत्याला अभिनय करु नको असं सांगितलंय", महेश मांजरेकरांचा लेकाबद्दल खुलासा, म्हणाले- "ट्रोल केल्यावर मी..."
13
India Pakistan Vidoe: पाकिस्तानने डागलेली उखळी तोफ थेट घरावर, क्षणात दिसेनासं झालं, बघा काय घडलं?
14
यशस्वी जैस्वालचा यू-टर्न ! गोवा नव्हे, मुंबई संघाकडूनच क्रिकेट खेळणार... काय दिलं कारण?
15
हसतं-खेळतं कुटुंब उद्ध्वस्त! पाकिस्तानच्या गोळीबारात जुळ्या भावंडांचा मृत्यू
16
पाक लष्कर प्रमुखाला मिळाली विशेष 'पॉवर'; पाकिस्तानी सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
17
लग्नाच्या अवघ्या १५व्या दिवशीच नवरीनं उडवली सासरची झोप; नवरदेवालाही लावला चुना अन्...  
18
Mumbai: टाटा मेमोरियल हॉस्पिटलला बॉम्बने उडवून देण्याची धमकी; भारत- पाकिस्तान तणावादरम्यान मेल
19
उद्यापासून महाराष्ट्रातील या ठिकाणी पेट्रोल पंपावर UPI पेमेंट बंद; कारण काय? जाणून घ्या...
20
तुमच्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी आर्थिक नियोजन कसे करावे? महागाई लक्षात घेऊन 'या' टिप्स फॉलो करा

अतिक्रमणांचा भरलाय बाजार

By admin | Updated: January 18, 2017 01:50 IST

शहराची बाजारपेठ असलेल्या शिवाजी चौकासह मावळा पुतळा ते भांगरवाडी दरम्यान रस्त्याला मोठ्या प्रमाणात अतिक्रमणाचा विळखा बसला

लोणावळा : शहराची बाजारपेठ असलेल्या शिवाजी चौकासह मावळा पुतळा ते भांगरवाडी दरम्यान रस्त्याला मोठ्या प्रमाणात अतिक्रमणाचा विळखा बसला असल्याने या रस्त्यावर प्रवास करताना नागरिकांना मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.पर्यटनाचे मध्यवर्ती केंद्र असलेल्या लोणावळा शहरातील वाहतूककोंडी ही सर्वश्रुत आहे. या वाहतूक कोंडीला वाहनांच्या वाढत्या प्रमाणासोबत शहरातील रस्त्यावर झालेली अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणे जबाबदार आहेत. लोणावळा नगर परिषदेने शहरातील ११३ अतिक्रमणांची यादी तयार केली असून, लवकरच ही अतिक्रमणे हटविण्यात येणार आहे. दिवसागणिक शहराची लोकसंख्या वाढत आहे. त्यातच वाहनांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने शहरातील रस्ते वाहतुकीला कमी पडत आहे. त्यातच शहरात लहान-मोठ्या व्यावसायकांची अतिक्रमणे वाढली आहेत. दुकानांचा माल रस्त्यावर ठेवला जातो. बाजारपेठेत हातगाडी, पथारीवाल्यांनी अतिक्रमणे करत रस्त्याची रुंदी निम्मी केली आहे. फळविक्रेते व भाजी विक्रेते यांनी गाड्या थेट रस्त्यावर लावल्या असल्याने शिवाजी चौकातून चालणे मुश्कील होते. शिवाजी चौक ते भांगरवाडी दरम्यान रस्त्यावरील अतिक्रमणांची संख्या जास्त असल्याने या भागातून वाहने चालविताना नागरिकांना वाहतूककोंडीचा मोठा त्रास सहन करावा लागतो आहे. शहरात कोठेही वाहनतळाची सुविधा नसल्याने वाहने सर्रास रस्त्यावर उभी केली जात असल्याने वाहतूककोंडीत भर पडत आहे. राजकीय वरदहस्त व हितसंबंधामुळे नगर परिषद प्रशासन वा पोलीस प्रशासन त्यावर कारवाई करण्यास धजावत नाहीत. मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील चहा वडापावच्या टपऱ्यांचे अतिक्रमण काही दिवसांपूर्वी आयआरबीने हटवले. पण मोठे व्यावसायिक, हॉटेल व दुकानदार, धाबे यांची अतिक्रमणे तशीच असल्याने एलआयसी बिल्डिंग ते अंबरवाडी गणपती मंदिर रोड परिसरात हायवेवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण कायम आहे. (वार्ताहर)।दुर्लक्ष : वाहतूक पोलिसांनी करावे नियोजनवाहतूक पोलीस कुमार चौक वगळून शहरात कोठेही वाहतूक नियोजनासाठी दिसत नाही. वर्षभरापूर्वी शिवाजी चौक ते भांगरवाडी इंद्रायणी पूल दरम्यान रस्ता वनवे करण्यात आला होता. तेव्हा काही प्रमाणात वाहतूककोंडी कमी झाली होती. मात्र त्यामध्ये सातत्य न राहिल्याने हा वनवेचा प्रयत्न बंद झाल्याने वाहतूक समस्या गंभीर बनली आहे. लहान विक्रेत्यांप्रमाणे गवळीवाडा परिसरातील हॉटेल व्यावसायिक व शहरातील मॉलधारकांनी पार्किंगच्या जागांवर अतिक्रमणे करत ती बंद केल्याने वाहने रस्त्यावर उभी राहू लागली आहेत.