शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

महात्मा गांधी रोजगार हमीतून वर्षभरात ११ हजार लोकांना रोजगार

By admin | Updated: April 12, 2016 04:21 IST

महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून जिल्ह्यात २०१५ -१६ या वर्षात ८ कोटी ३९ लाख १० हजारांची कामे झाली असून ११ हजार १२३ लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आला

पुणे : महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून जिल्ह्यात २०१५ -१६ या वर्षात ८ कोटी ३९ लाख १० हजारांची कामे झाली असून ११ हजार १२३ लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आला आहे. १२ हजार ३६५ लोकांनी काम मागितले होते. सध्या १ हजार १३७ लोकांच्या हाताला काम उपलब्ध झाले आहे. मात्र हे प्रमाण अत्यल्प आहे.१ हजार ४०७ ग्रामपंचायतींपैकी ९५४ ग्रामपंचायतींनी काहीही कामे केलेली नाहीत़ दुुष्काळ निवारण आणि हाताला काम मिळावे, या मूळ उद्देशाने रोजगार हमी योजना सुरू करण्यात आली. योजनेच्या १ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१६ या कालावधीतील कामांची माहिती घेतली असता हे चित्र स्पष्ट झाले आहे़ जो कोणी काम मागेल त्याला वर्षभरात किमान १०० दिवस काम देण्याची अट घालण्यात आली आहे़ जिल्ह्यात १४४ गावांत शासनाने दुष्काळ जाहीर केला आहे. आता ८७ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. पिण्याच्या पाण्याची समस्या, जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर झाली आहे़ त्याचबरोबर शेतकरी, शेतमजुरांना रोजगार पुरविण्याचे संकट आहे़ या पार्श्वभूमीवर मनरेगाचा आढावा घेतला असता, नागरीकरण वाढत असलेल्या हवेली, मावळ, मुळशी या तालुक्यातून अल्प प्रतिसाद असल्याचे दिसून आले. याचे कारण म्हणजे या योजनेतून गेल्या वर्षी फक्त १८१ रुपये मजुरी मिळत होती. नागरीकरण वाढत असलेल्या तालुक्यात यापेक्षा जास्त मजुरी मिळत असल्याने या योजनेकडे लोकांचे दुर्लक्ष होत आहे. या योजनेंतर्गत गेल्या वर्षात ७ हजार ६५ कुटंबांनी रोजगार मागितला. यापैकी ६ हजार ४५४ कुटंबांना रोजगार देण्यात आला, तर १२ हजार ३६४ लोकांनी मागणी केली, त्यापैकी ११ हजार १२३ लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आला.योजनेतून केली जाणारी कामेरोपवाटिका, शौचालय बांधकाम, नवीन विहिरी, शेततळे, रस्ता, वनराई बंधारा, वृक्षलागवड, वृक्षसंगोपन, फळबाग लागवड, गाळ काढणे, विहीर पुनर्भरण, गारगोटे, कुक्कुटपालन शेड, गांडूळखत आदीसध्या १ हजार १३७ लोकांना कामगेल्या आठवड्यातील चालू कामांचा आढावा घेतला असता आंबेगावमध्ये १३५ (२२), बारामतीत १५३ (१२), भोरमध्ये ४७ (१४), दौंडमध्ये २५८ (३०), हवेलीत (६२) ६, जुन्नर २९१ (३५), खेडला ६० (७), मुळशी ११ (१), पुरंदर ८५ (१७), शिरूर ३५ (१६) अशा १ हजार १३७ लोकांना सध्या रोजगार उपलब्ध झाला आहे. १६० कामे सुरू आहेत.मजुरी जास्त मिळत नसल्याने या योजनेकडे लोक दुर्लक्ष करतात, तरी लोकांनी याचा लाभ घ्यावा. ग्रामपंचायतीशी संपर्क साधून ग्रामसेवकाकडून जॉबकार्ड काढून घ्यावे. मागेल त्याला रोजगार दिला जाईल.- नितीन माने, उपमुख्य कार्यकारीअधिकारी, ग्रामपंचायत