शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
2
मोठी बातमी! राज्यातील २४७ नगरपालिका, १४७ नगरपंचायतींसाठी आरक्षण जाहीर; कोण मिळवणार सत्तेची खुर्ची?
3
SIP की RD? दरमहा गुंतवणूक कुठे करावी? तज्ज्ञांच्या मते 'हा' आहे मोठा फरक, निर्णयापूर्वी वाचा महत्त्वाचे मुद्दे
4
"देशात पेरलं जाणारं विष आता...'; सरन्यायाधीशांवर हल्ल्याचा प्रयत्न, शरद पवारांनी व्यक्त केली चिंता
5
आयटी, फार्मा आणि बँकिंग क्षेत्रात तेजी! निफ्टी २५,००० च्या पुढे; गुंतवणूकदारांनी कमावले २.०१ लाख कोटी
6
“१९९४ला आमच्या हक्काचे १६ टक्के शरद पवारांनी ओबीसींना दिले, आमचे वाटोळे केले”: मनोज जरांगे
7
’प्रस्तावाची वाट कसली पाहता, अमित शाहांच्या दौऱ्याआधीच शेतकऱ्यांना पॅकेज जाहीर करायला हवे होते’, काँग्रेसचा टोला   
8
‘आनंदाचा शिधा’वर पुन्हा गदा! आर्थिक चणचणीमुळे योजनेसाठी निधीच नाही; गरिबांची दिवाळी फराळाविना
9
“मनोज जरांगेंना आता देव झाल्यासारखे वाटतेय, काही झाले तर चिठ्ठीत लिहिणार की...”: वडेट्टीवार
10
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारताने पाकिस्तानचे F-16 विमानाचे नुकसान केले होते, अमेरिकेने त्यांची दुरुस्ती केली
11
Flipkart: फ्लिपकार्टकडून ग्राहकांची फसवणूक? ५ हजारांचा पास घेऊनही आयफोन न मिळाल्यानं ग्राहक संतप्त
12
अंबानींच्या अँटिलियाला कडवी टक्कर! 'या' अब्जाधीश राजकारण्याची इमारत अँटिलियापेक्षा उंच आणि अलिशान
13
IAS Govind Jaiswal : लोकांनी खिल्ली उडवली पण 'तो' डगमगला नाही; रिक्षा चालकाच्या लेकाने IAS होऊन दिलं उत्तर
14
सरन्यायाधीशांवर बूट फेकण्याचा प्रयत्न; गोंधळ घालणाऱ्या 'त्या' वकिलाला काय शिक्षा होणार?
15
"गर्लफ्रेंडमुळे तीन वर्षे जगायला मिळाली, आता..."; नाशिकमध्ये विद्यार्थ्याने इंजिनिअरिंग कॉलेजमध्येच आयुष्य संपवलं
16
'बुर्का चलेगा तो घूंघट भी चलेगा...!', भाजप मंत्री कृष्णनंदन पासवान यांचं मोठं विधान; बिहारमध्ये राजकारण तापलं
17
सरन्यायाधीश बी.आर. गवई यांच्यावर वकिलाने वस्तू फेकली, सर्वोच्च न्यायालयात सुनावणीवेळी गोंधळ
18
फेस्टीव सीझनमध्ये ऑनलाईन खरेदी करताना सावधान! 'या' चुकांमुळे क्रेडिट स्कोअर होईल खराब
19
मोहम्मद सिराजने लावला 'पिंपल पॅच'? Gen Z ची लोकप्रिय स्किनकेअर हॅक, 'असं' होतं त्वचेचं संरक्षण
20
Gold Silver Price Today 6 October: सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले; एकाच दिवसात सोनं ₹२१०० पेक्षा अधिकनं वाढलं, चांदीत ४ हजारांची तेजी

ढोल-ताशांच्या गजरात भावपूर्ण निरोप

By admin | Updated: September 23, 2015 03:18 IST

‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या...’ असा जयघोष करीत मंगलमय वातावरणामध्ये पाच दिवसांच्या गणरायाला व गौरीला पवनानगर परिसरामध्ये वाजत-गाजत भावपूर्ण निरोप दिला.

पवनानगर : ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या...’ असा जयघोष करीत मंगलमय वातावरणामध्ये पाच दिवसांच्या गणरायाला व गौरीला पवनानगर परिसरामध्ये वाजत-गाजत भावपूर्ण निरोप दिला. पवनानगर परिसरामध्ये गणरायास मोठ्या आनंद आणि उत्साहामध्ये निरोप देण्यात आला. परंतु, ग्रामीण भागामध्ये गावातील प्रत्येक घरामध्ये गणरायाची भक्ती व सेवा करता यावी, म्हणून गणपती बसवला जातो. आज अनेक गावांमध्ये गणरायाला ढोल-ताशांच्या गजरात वाजत-गाजत निरोप देण्यात आला. शिवली, ठाकूरसाई, काले, पवनानगर, ब्राह्मणोली या गावांतील नागरिकांनी पवना धरणाच्या काठावर वाजत-गाजत नेऊन गणपतीचे विसर्जन करण्यात आले, तर कोथुर्णे, येळसे, शिवली, शेवती वसाहत, काले या गावातील नागरिकांनी पवना नदीच्या काठावर विसर्जन केले. तर महागाव, धालेवाडी, मालेवाडी या गावांमध्ये धालेवाडी तलावामध्ये विसर्जन करण्यात आले. यामध्ये लहान मुलांसह तरुण व मोठ्या नागरिकांनी मिरवणुकीत सहभाग घेतला होता. तर महिलांनी गौरींना निरोप दिला. या वेळी प्रत्येक गावातील महिलांना जागोजागी फेर धरला. फुगड्या खेळत, तसेच मंगळागौरीची गाणी म्हणत मिरवणुकीत सहभागी झाल्या होत्या. या परिसरातील अनेक गावांमध्ये ढोल-लेझीम पथके आहेत. या ढोलांना पुणे, मुंबई, ठाणे, कल्याण या भागातून गणपती विसर्जनासाठी मोठ्या प्रमाणावर मागणी असते. या ढोलामध्ये गावातील अनेक तरुण सहभागी असतात. त्यामुळे मिरवणुकीत तरुणांची संख्या कमी जाणवत होती.कार्ल्यातही उत्साहकार्ला : कार्ला परिसरातील पाटण वेहेरगाव दहिवली येथील गणपतीचे ढोल-ताशांच्या गजरात व तरुणांच्या थरकत्या तालावर पाच दिवसांच्या गणपतीचे व गौरींचे विसर्जन करण्यात आले.दुपारी चारला कार्ल्यात मारुती मंदिरापासून विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली. ढोल-ताशांच्या गजरात व बाप्पा मोरयाच्या जयघोषाने परिसर दणाणून गेला. विठ्ठल-रुक्मिणी, महादेव मंदिराला प्रदक्षिणा घालून मिरवणूक पुन्हा मारुती मंदिराजवळ आली. थोडा वेळ मारुती मंदिराजवळ मिरवणूक थांबली. या वेळी गावातील घराघरातील गौरींचे मंदिरासमोर आगमन झाले. या वेळी महिलांचा उत्साह मोठा होता. महिलांनी फेरधरून गौरीची गाणी म्हणायला सुरुवात केली. मंदिरासमोर अतिशय भावमय व भक्तिमय वातावरण पाहावयास मिळाले. या वेळी तरुणांचा उत्साहही वाखाणण्याजोगा होता. नंतर मिरवणूक इंद्रायणी नदीकडे निघाली. या वेळी गावातील सर्व आबालवृद्ध व महिला या मिरवणुकीत सामील झाले होते. (वार्ताहर)