शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

आठ गावांतील शेतकऱ्यांचा एल्गार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2019 00:00 IST

दूषित नीरा नदीचा प्रश्न : सर्व राजकीय पदाधिकारी, ग्रामस्थांसह शेतकऱ्यांनी केले रास्ता रोको आंदोलन; १५० जणांवर गुन्हा दाखल

सांगवी : नीरा नदीकाठच्या परिसरातील आठ गावातील नदीच्या दूषित पाण्याचा तिढा कायमचा सोडवण्यासाठी आता सर्व राजकीय पक्षांतील पदाधिकारी, शेतकरी आणि ग्रामस्थ रस्त्यावर उतरले. गेंड्याची कातडी अवतरून बसलेल्या प्रशासनाच्या विरोधात आवाज उठविण्यासाठी आंदोलनात सहभागी झाले होते.

‘बंद करा, बंद करा दूषित पाणी बंद करा, शेतकरी एकजुटीचा विजय असो, प्रदूषण विभागाच्या अधिकाऱ्यांना निलंबित करा’ अशा घोषणांनी परिसर आज पुरता हादरला. नदीच्या प्रदूषणामुळे त्रस्त झालेले शेतकरी झोपी गेलेल्या शासनाला जागे करण्यासाठी आज मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले. या वेळी आठ गावांतील हजारो शेतकºयांनी बारामती-फलटण रास्ता रोको आंदोलन केले. या वेळी नदीच्या प्रदूषणाबाबत उपस्थितांनी अडचणी मांडत प्रशासनाविरोधात आक्रोश व्यक्त केला. बारामतीचे तहसीलदार विजय पाटील यांना निवेदन देण्यात आले. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर या वेळी नीरा नदीवर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त होता.

सांगवी, कांबळेश्वर, शिरवली, खांडज, नीरावागज, मेखळी, सोनगाव (सांगवी फलटण) येथील ग्रामस्थांनी प्रदूषण नियंत्रक मंडळाच्या असंवेदनशील कारभारावर ताशेरे ओढले. शेतकरी आक्र मक झाल्याने प्रशासनाच्या उरात धडकी भरली आहे. नीरा नदीत बारामती तालुक्यासह फलटण नगरपरिषदेचे ओढ्यामार्फत सांडपाणी, कारखान्याचे केमिकलयुक्त सांडपाणी, कत्तलखाण्याचे दूषित पाणी सोडण्यात येते. त्यामुळे एकेकाळात स्वच्छ, निर्मळ असणारी नीरानदी अस्वच्छ झाली आहे. दूषित पाण्यामुळे जनावरांसह लोकांच्या आरोग्य व शेतीवर देखील मोठ्या प्रमाणात परिणाम होऊ लागला आहे. यामुळे नदीकाठच्या ग्रामस्थांचे जगणे असह्य झाले आहे. याबाबत फलटण दौºयावर निघालेले माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनादेखील साकडे घातले आहे. पवार यांनी देखिल दूषित पाण्याची पाहणी करून मुखमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र देऊन चर्चा करण्याचे आश्वासन दिले आहे.

प्रशासनाला वारंवार कळवून नीरा नदीचे पाणी दूषित होण्यापासून रोखण्यासाठी अनेक दिवसांपासून सांगवीसह इतर गावांतीलग्रामस्थ झगडत आहेत. तोंडी, लेखी निवेदन देऊन याचा सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. तरीदेखील दूषित पाणी रोखू शकत नसल्याने प्रदूषण नियंत्रक मंडळाच्या कारभारावर शंका उपस्थित केली जात आहे. प्रशासनासह राजकीय मंडळीदेखील याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याने आक्रमक झालेल्या शेतकºयांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रक मंडळ जागे होणारका, असा सवाल शेतकरीवर्गातून व्यक्त होत आहे.

या वेळी संजय गांधी निराधार योजनेचे राहुल तावरे, किरण तावरे,राजेंद्र काळे, मदन देवकाते, शेतकरी संघटनेचे महेंद्र तावरे, विजय तावरे, उपसरपंच प्रमोद शिपकुले, युवराज तावरे, सुहास पोंदकुले, अनिल सोरटे, नितीन आटोळे, भानुदास जगताप यांच्यासह हजारो शेतकरी उपस्थित होते.नीरा नदीच्या पाण्याने अधिकाºयांना अंघोळ घालणार...दोन वर्षांपासून ग्रामस्थ नीरा नदीच्या दूषित पाण्यासाठी झगडत आले आहेत. मात्र, आता आठवडाभरात याची दखल घेतली गेली नाही तर पुणे येथील प्रदूषण विभागातील अधिकाºयांच्या कार्यालयात जाऊन नीरा नदीच्या दूषित पाण्याने अधिकाºयांना अंघोळ घालून निषेध करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे....मोठी किंमत मोजावी लागणार४अनेक दिवसांच्या लढाईनंतर आपल्या मागणीला कोणाकडूनही दाद मिळत नसल्याचे लक्षात येताक्षणी आपल्याकडे प्रशासनासह, राजकीय नेत्यांचे लक्ष वेधण्यासाठी नदीकाठच्या ग्रामस्थांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे तत्पूर्वी ग्रामस्थांच्या मागणीनुसार नीरा नदीच्या प्रदूषणाचा तिढा सुटला तर बरा; अन्यथा राजकीय नेते मंडळींना याची फार मोठी किंमत मोजावी लागणार एवढं मात्र नक्कीच आहे.देव्हाºयातील देवदेखील आंदोलनात...आंदोलनादरम्यान माजी उपसभापती डॉ. अनिल सोरटे यांनी नीरा नदीच्या दूषित पाण्यामुळे शेजारील विंधन विहिरीतील पाण्यामुळे घरातील देव, महिलांच्या पायातील पट्ट्या, जोडवे धुतल्यामुळे काळे पडू लागले आहे. या पाण्याचा परिणाम देवावरही होऊ लागला असल्याने काळे पडलेले चांदीचे देव हात उंचावून आंदोलनात सर्वांना दाखविण्यात आले.