शहरं
Join us  
Trending Stories
1
"साहेब, परप्रांतियांची दादागिरी वाढली, ठाकरे ब्रँड टिकला पाहिजे", कार्यकर्त्यांची 'मनसे' भावना; राज ठाकरे काय म्हणाले?
2
मनात आले तर डोनाल्ड ट्रम्प मस्कना अमेरिकेबाहेरही घालवू शकतात? बड्या हस्तीने वर्मावर बोट ठेवले...
3
“उद्धव यांनी एक फोन करावा, राज ठाकरे १०० पावले पुढे येतील, पण...”; मनसेची स्पष्ट भूमिका
4
IND vs ENG: आता रंगणार कसोटी मालिकेचा थरार! शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया इंग्लंडला रवाना
5
"अमावस्येला नारळ चुकला अन्...", ऋतुजा बागवेने सांगितला भयावह अनुभव
6
विजय मल्ल्याच्या लेकासोबत होतं दीपिकाचं अफेअर; अभिनेत्रीला ताज हॉटेलमध्ये घेऊन गेला अन्...
7
ऐतिहासिक! १३४ वर्षांनी स्वप्नपूर्ती; PM मोदींनी श्रीनगर वंदे भारत ट्रेनला दाखवला हिरवा झेंडा
8
Corona Virus : सावधान! कोरोना वाढवतोय टेन्शन; १५ दिवसांत २० पटीने वाढली एक्टिव्ह रुग्णांची संख्या
9
NEET-PG Exam Date: अखेर नीट पीजी परीक्षेची तारीख निश्चित, सर्वोच्च न्यायालयाने NBEला दिली परवानगी
10
आधी घाबरवलं, मग जज बनून व्हिडीओ कॉल केला, विलेपार्ल्यातील महिलेच्या खात्यातून चोरट्यांनी उडवले 'इतके' कोटी!
11
जमिनीचे आरक्षण रद्द करून मुलाच्या मद्यउद्योगाला जागा; इम्तियाज जलीलांचा शिरसाटांवर आरोप
12
Vijay Mallya: "मी प्रणव मुखर्जींकडे गेलो होतो..," बँक कर्जावर विजय मल्ल्याचा मोठा दावा
13
“दोन शिवराज्याभिषेक सोहळे होताच कामा नयेत, तुम्हाला जनतेला एक होऊ द्यायचे नाही”: मनोज जरांगे
14
ओरेश्निक मिसाइल म्हणजे ब्रह्मोसची कॉपी...? ज्याच्या सह्यायने रशियानं केला युक्रेनवर पलटवार, एकाच वेळी 6 ठिकाणी करू शकते हल्ला
15
युतीसाठी उद्धव ठाकरे-राज ठाकरे यांच्यात फोनवरून चर्चा झाली का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Raja Raghuvanshi : "माझी हत्या झालीय", भावाच्या स्वप्नात आला राजा; कुटुंबीयांनी केली CBI चौकशीची मागणी
17
आयफेल टॉवरपेक्षाही उंच, भव्यता पाहून विस्फारतील डोळे; चिनाब रेल्वे पूल पाहिलात का?
18
सिंधू पाणी कराराबाबत बिलावल भुट्टोंनी गरळ ओकली; भारताला पुन्हा दिली अणुयुद्धाची धमकी
19
RBI MPC Meeting : EMI चा भार आणखी कमी होणार, रिझर्व्ह बँकेचं सर्वसामान्यांना मोठं गिफ्ट; रेपो दरात केली कपात
20
चीनला धोबीपछाड, जगात सर्वाधिक पदवीधर भारतात; नव्या रिपोर्टमध्ये काय?

हेल्मेटसक्तीविरोधात एल्गार

By admin | Updated: February 6, 2016 01:51 IST

शहरातील गर्दीमध्ये वेगाने दुचाकी चालविता येत नाहीत, त्यामुळे पुणेकरांवर हेल्मेटसक्ती लादू नये. प्रबोधनातून हेल्मेट वापरण्याचे आवाहन करावे, मात्र सक्ती करू नये,

पुणे : शहरातील गर्दीमध्ये वेगाने दुचाकी चालविता येत नाहीत, त्यामुळे पुणेकरांवर हेल्मेटसक्ती लादू नये. प्रबोधनातून हेल्मेट वापरण्याचे आवाहन करावे, मात्र सक्ती करू नये, अशी भूमिका घेत हेल्मेटसक्तीविरोधात शनिवारपासून सर्वपक्षीय आंदोलन छेडण्याचा निर्णय हेल्मेटसक्तीविरोधी कृती समितीच्या बैठकीमध्ये घेण्यात आला. हेल्मेटसक्तीविरोधात मंडई येथील टिळक पुतळ््याजवळ शनिवारी सकाळी १०.३० वाजता सर्वपक्षीय आंदोलन करण्यात येणार आहे. हेल्मेटसक्तीविरोधी कृती समितीच्या बैठकीला माजी महापौर अंकुश काकडे, भाजपाचे पदाधिकारी संदीप खर्डेकर, शांतिलाल सुरतवाला, बाळासाहेब रुणवाल, भोला वांजळे, धीरज घाटे, श्रीकांत शिळीमकर उपस्थित होते. शिवसेनेचे शहरप्रमुख विनायक निम्हण, भाजपाच्या आमदार मेधा कुलकर्णी यांनीही या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.पुणे शहरातील रस्त्यांची स्थिती, ड्रेनेजच्या झाकणांची दुरवस्था, अरुंद रस्त्यांमुळे मोठ्या प्रमाणात होणारी गर्दी या पार्श्वभूमीवर दुचाकी चालविण्यासाठी वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागते. या कारणांमुळे रस्त्यावरील दुचाकी चालविताना वाहनाचा वेग खूपच कमी राहतो. या पार्श्वभूमीवर शहरामध्ये हेल्मेटसक्ती करण्यात येऊ नये, त्याऐवजी हेल्मेट घालण्याबाबत प्रबोधन करावे, अशी भूमिका या बैठकीमध्ये मांडण्यात आली. हेल्मेटसक्ती ही एका रात्रीतून राबविली जाणे चुकीचे आहे. सर्व दुचाकीचालकांसाठी हेल्मेटची उपलब्धता सध्या बाजारात नाही. त्यामुळे हेल्मेटसक्ती पूर्वसूचना न देता राबविणे चुकीचे आहे, अशी मते या वेळी मांडण्यात आली. सक्तीमुळे हेल्मेट कंपन्या मालामाल होतील, अशी टीकाही या वेळी करण्यात आली. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम नसल्याने नाइलाजास्तव दुचाकी वापरणाऱ्या पुणेकरांवर हेल्मेटसक्ती अन्यायकारक ठरणार असल्याने याविरोधात आंदोलन छेडण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला. मेधा कुलकर्णी यांनीही हेल्मेटसक्तीच्या निर्णयाला विरोध दर्शविला. त्यांनी सांगितले, ‘प्रत्येक शहराची परिस्थिती वेगळी असते, पुणे शहरामध्ये हेल्मेटसक्ती लागू करणे योग्य होणार नाही.’> हेल्मेट कारवाईचा आलेख चढताचपुणे : वाहतूक पोलिसांनी जोमाने सुरू केलेली हेल्मेट कारवाई शुक्रवारी दिवसभर सुरूच होती. वाहतूक पोलिसांच्या या कारवाईचा आलेख शुक्रवारीही चढताच राहिला. दिवसभरात वाहतूक पोलिसांनी ५ हजार ५४४ वाहनचालकांवर कारवाई करीत तब्बल ५ लाख ५८ हजारांचा दंड वसूल केल्याची माहिती उपायुुक्त सारंग आवाड यांनी दिली. शुक्रवारचा आकडा गुरुवारच्या तुलनेत ८२७ ने वाढला आहे, तर दंडाची रक्कम ८१ हजार १०० रुपयांनी वाढली आहे. काही वाहनचालकांसोबत पोलिसांचा वादही दिवसभर सुरूहोता.