शहरं
Join us  
Trending Stories
1
२०१४ मध्येच भाजपा शिवसेनेला हात दाखवणार होती,पण...; प्रफुल्ल पटेलांचा १० वर्षांनी गौप्यस्फोट
2
Russia Ukrain War : डोनाल्ड ट्रम्प युक्रेनचे दोन तुकडे करणार? क्रिमिया अन् दोन मोठी शहरे रशियाला मिळणार
3
तरुण वयात ₹१०० ची बचत वृद्धापकाळात देऊ शकते ३ कोटींची रक्कम; SIP मध्ये गुंतवणुकीसाठी वापरू शकता 'हा' फॉर्म्युला
4
Mumbai Local: मुंबईत मुसळधार पाऊस! हार्बर आणि मध्य मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत
5
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
6
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
7
परळी हादरलं! लग्नावरून परतताना जीप पुरात वाहून गेली; तिघे बचावले, एकाचा मृत्यू
8
School Holiday: मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
9
Video: टोलनाक्यावरील कर्मचारी की गुंड; लष्कराच्या जवानावर तुटून पडले, खांबाला बांधून दांडक्याने मारले
10
चेकच्या मागच्या बाजूला सही का करतात? ९०% लोकांना या प्रश्नाचे उत्तर माहित नसणार
11
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
12
Technology: ATM मधून पैसे काढल्यानंतर तुमचा PIN सुरक्षित राहतो का? 'अशी' घ्या काळजी!
13
Asia Cup India Squad : गंभीरनं 'फिल्डिंग' लावली तर गिल खेळणार; नाहीतर... आगरकर हे ३ मोठे निर्णय घेणार?
14
धक्कादायक! रणथंभोर व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांची गाडी अचानक पडली बंद आणि मग...
15
श्रावणातला शेवटचा आठवडा; 'या' दिशेला लावा बेलाचे झाड, घरात धन, समृद्धी, पैसा येईल अपार
16
"सिनेमाच्या नावाखाली अभिनेते मजा..." कमी वयाच्या अभिनेत्रींसोबत काम करण्यावर आर माधवनचं भाष्य
17
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
18
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
19
भाडे देऊन लाखोंचे नुकसान की EMI देऊन घर खरेदी करावे? ५० लाखांच्या घराचं आर्थिक गणित समजून घ्या
20
फ्लॉप शोचा सिलसिला संपेना! अन् म्हणे; सलमानचा पाक संघ आशिया कपमध्ये टीम इंडियासमोर हिट ठरेल

अकरावी प्रवेशाचे शिक्षण विभागासमोर आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:13 IST

पुणे : अकरावी प्रवेशासाठी राज्य मंडळातर्फे घेतली जाणारी सीईटी परीक्षा न्यायालयाने रद्द केल्याने माध्यमिक शिक्षण संचालक कार्यालयासमोर अकरावी प्रवेशाचा ...

पुणे : अकरावी प्रवेशासाठी राज्य मंडळातर्फे घेतली जाणारी सीईटी परीक्षा न्यायालयाने रद्द केल्याने माध्यमिक शिक्षण संचालक कार्यालयासमोर अकरावी प्रवेशाचा मोठा पेच निर्माण झाला आहे. राज्यातील तब्बल ९५७ विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण मिळाले आहेत. तर ६ लाख ४८ हजार ६८३ विद्यार्थ्यांना ७५ टक्के व त्यापेक्षा अधिक गुण मिळाले आहेत. त्यामुळे सीईटीऐवजी केवळ इयत्ता दहावीच्या गुणांवर प्रवेश देणे शिक्षण विभागासाठी आव्हानात्मक ठरणार आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतल्या जाणाऱ्या परीक्षेसाठी दहावीच्या २०२१ च्या परीक्षेचा निकाल ९९.९५ टक्के लागला आहे. इयत्ता नववी व दहावीच्या अंतर्गत गुणांच्या आधारे दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला. परिणामी बहुतांश विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळाले आहेत. त्यामुळेच राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता अकरावी प्रवेशासाठी येत्या २१ ऑगस्ट रोजी सीईटी परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला. सीईटी परीक्षेसाठी राज्यातील तब्बल ११ लाख ९६ हजार ५३२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. त्यामुळे सीईटीसाठी विद्यार्थ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र, परीक्षाच रद्द झाल्याने प्रवेशाबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर अनेक विद्यार्थी सीईटी परीक्षेची तयारी करत होते. काही विद्यार्थ्यांनी हजारो रुपये खर्च करून सीईटीसाठी खासगी शिकवणी लावली होती. मात्र, सीईटी रद्द झाल्याने काही विद्यार्थी व पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. सर्वोच्च न्यायालयात जाऊन बाजू मांडण्यात वेळ जाऊ शकतो. त्यामुळे शिक्षण विभागही न्यायालय निर्णयानुसार प्रवेश प्रक्रिया राबविण्याच्या मानसिकतेत आहे.

चौकट

कट ऑफ वाढल्याचा परिणाम

शेकडो विद्यार्थ्यांना दहावीत एकसारखे गुण मिळाले आहेत. त्यामुळे एखाद्या महाविद्यालयात ९९ ते ९५ टक्के गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांनाच प्रवेश मिळू शकतो. तसेच नामांकित कनिष्ठ महाविद्यालयांचा कट ऑफ वाढू शकतो. त्यामुळे विद्यार्थ्याला गणित, विज्ञान किंवा इंग्रजी विषयातील एकूण गुण विचारात घेऊन प्रवेश दिला जाऊ शकतो. विद्यार्थ्याची जन्मतारीखही लक्षात घेतली जाऊ शकते, असे शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

चौकट

विभागीय मंडळनिहाय १०० टक्के गुण मिळवणारे विद्यार्थी

पुणे : ७९ , नागपूर : २५, औरंगाबाद : २६१ ,मुंबई : ३२ ,कोल्हापूर : ९२, अमरावती : १०५, नाशिक : ६१, लातूर : २७८ , कोकण : २४.