शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

अकरावी प्रवेशाचे शिक्षण विभागासमोर आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:13 IST

पुणे : अकरावी प्रवेशासाठी राज्य मंडळातर्फे घेतली जाणारी सीईटी परीक्षा न्यायालयाने रद्द केल्याने माध्यमिक शिक्षण संचालक कार्यालयासमोर अकरावी प्रवेशाचा ...

पुणे : अकरावी प्रवेशासाठी राज्य मंडळातर्फे घेतली जाणारी सीईटी परीक्षा न्यायालयाने रद्द केल्याने माध्यमिक शिक्षण संचालक कार्यालयासमोर अकरावी प्रवेशाचा मोठा पेच निर्माण झाला आहे. राज्यातील तब्बल ९५७ विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण मिळाले आहेत. तर ६ लाख ४८ हजार ६८३ विद्यार्थ्यांना ७५ टक्के व त्यापेक्षा अधिक गुण मिळाले आहेत. त्यामुळे सीईटीऐवजी केवळ इयत्ता दहावीच्या गुणांवर प्रवेश देणे शिक्षण विभागासाठी आव्हानात्मक ठरणार आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतल्या जाणाऱ्या परीक्षेसाठी दहावीच्या २०२१ च्या परीक्षेचा निकाल ९९.९५ टक्के लागला आहे. इयत्ता नववी व दहावीच्या अंतर्गत गुणांच्या आधारे दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला. परिणामी बहुतांश विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळाले आहेत. त्यामुळेच राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता अकरावी प्रवेशासाठी येत्या २१ ऑगस्ट रोजी सीईटी परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला. सीईटी परीक्षेसाठी राज्यातील तब्बल ११ लाख ९६ हजार ५३२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. त्यामुळे सीईटीसाठी विद्यार्थ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र, परीक्षाच रद्द झाल्याने प्रवेशाबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर अनेक विद्यार्थी सीईटी परीक्षेची तयारी करत होते. काही विद्यार्थ्यांनी हजारो रुपये खर्च करून सीईटीसाठी खासगी शिकवणी लावली होती. मात्र, सीईटी रद्द झाल्याने काही विद्यार्थी व पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. सर्वोच्च न्यायालयात जाऊन बाजू मांडण्यात वेळ जाऊ शकतो. त्यामुळे शिक्षण विभागही न्यायालय निर्णयानुसार प्रवेश प्रक्रिया राबविण्याच्या मानसिकतेत आहे.

चौकट

कट ऑफ वाढल्याचा परिणाम

शेकडो विद्यार्थ्यांना दहावीत एकसारखे गुण मिळाले आहेत. त्यामुळे एखाद्या महाविद्यालयात ९९ ते ९५ टक्के गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांनाच प्रवेश मिळू शकतो. तसेच नामांकित कनिष्ठ महाविद्यालयांचा कट ऑफ वाढू शकतो. त्यामुळे विद्यार्थ्याला गणित, विज्ञान किंवा इंग्रजी विषयातील एकूण गुण विचारात घेऊन प्रवेश दिला जाऊ शकतो. विद्यार्थ्याची जन्मतारीखही लक्षात घेतली जाऊ शकते, असे शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

चौकट

विभागीय मंडळनिहाय १०० टक्के गुण मिळवणारे विद्यार्थी

पुणे : ७९ , नागपूर : २५, औरंगाबाद : २६१ ,मुंबई : ३२ ,कोल्हापूर : ९२, अमरावती : १०५, नाशिक : ६१, लातूर : २७८ , कोकण : २४.