शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
2
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
3
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
4
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
5
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
6
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
7
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
8
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
9
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
10
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
11
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
12
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
13
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
14
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा
15
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
16
मुख्य आरोपीचा 'खास' दोस्त अटकेत; दिल्ली स्फोटप्रकरणात वैद्यकीय क्षेत्रातील सहावी व्यक्ती ताब्यात!
17
एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांच्या तब्येतीची चौकशी केली; भावाला फोन करून प्रकृतीची विचारपूस
18
'सरकारने निर्दोषांना शिक्षा करू नये; पण...', दिल्ली बॉम्बस्फोटांवर अबू आझमींचे मोठे विधान
19
"पाकिस्तान युद्ध स्थितीत..." इस्लामाबादमध्ये आत्मघाती हल्ला, संरक्षण मंत्री संतापले, टार्गेटवर कोण? 
20
Suraj Tiwari : ट्रेन अपघातात एक हात आणि दोन्ही पाय गमावले; पण मानली नाही हार, जिद्दीने झाला अधिकारी

आळंदीसह अकरा गावांत उद्यापासून संचारबंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:09 IST

आळंदी : कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी यंदा संत ज्ञानेश्वर महाराज आषाढी वारी सोहळा व अन्य प्रमुख कार्यक्रम मर्यादित वारकऱ्यांच्या उपस्थितीत ...

आळंदी : कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी यंदा संत ज्ञानेश्वर महाराज आषाढी वारी सोहळा व अन्य प्रमुख कार्यक्रम मर्यादित वारकऱ्यांच्या उपस्थितीत पार पाडण्याचा आदेश राज्य सरकारने जारी केला आहे. यापार्श्वभूमीवर सोमवारपासून (दि.२८) आळंदीसह चऱ्होली खुर्द, केळगाव, डुडुळगाव, चिंबळी, वडगाव -घेनंद, कोयाळी, धानोरे, सोळू, मरकळ, चऱ्होली बुद्रुक, चोविसावाडी अशा अकरा गावांत ४ जुलैपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे परवानगी नसलेल्या एकाही भाविकाला या काळात आळंदीत प्रवेश मिळणार नाही.

आळंदीत माऊलींच्या आषाढी वारी प्रस्थान सोहळ्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम सुरू झाले आहेत. जेष्ठ वैद्य अष्टमी अर्थातच २ जुलैला संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांचे आषाढी वारीसाठी मुख्य समाधी मंदिरातून प्रस्थान होणार आहे. यापार्श्वभूमीवर आळंदी येथील प्रस्थान सोहळ्यात फक्त १०० वारकऱ्यांना सहभागी होता येणार आहे. मात्र, अनेकजण प्रस्थान सोहळ्याला आळंदीत येत असतात. परिणामी खबरदारीचा उपाय म्हणून प्रस्थान सोहळा कालावधीत संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

या कालावधीत आळंदीकडे येणारी खाजगी तसेच सरकारी प्रवाशी वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. तर शहरातील धर्मशाळा, भक्तनिवास, यात्रीभवन, लॉज, हॉटेल व मठात वारकरी आणि इतर मनुष्यास निवासास प्रतिबंध करण्यात आला आहे. तर पवित्र इंद्रायणी घाटावर २० जुलैपर्यंत फिरण्यास तसेच स्नान करण्यास मज्जाव केला आहे. अत्यावश्यक सेवा तसेच सोहळा पासधारकांना संचारबंदीतून वगळण्यात आले आहे. प्रशासनाच्या नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश व आळंदीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांनी दिली.

फोटो : माऊलींची समाधी.